शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
3
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
4
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
5
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
6
जातगणना : मॅजिक की मंडल?
7
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
8
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
9
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
10
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
11
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
12
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
13
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
14
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
15
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
16
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
17
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
18
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
19
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
20
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा

सडक सुरक्षा जीवन रक्षा- रामराव आघाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:25 IST

बीड : आपण नियमांचे पालन केले, सुरक्षित प्रवास केला तर अपघात होणार नाहीत, कोणाचे प्राण जाणार नाहीत, सडक सुरक्षा ...

बीड : आपण नियमांचे पालन केले, सुरक्षित प्रवास केला तर अपघात होणार नाहीत, कोणाचे प्राण जाणार नाहीत, सडक सुरक्षा हीच जीवन रक्षा आहे असे प्रतिपादन गोपनीय शाखेचे रामराव आघाव यांनी केले.

येथील स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालयात रस्ते सुरक्षा अभियाना अंतर्गत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर हे होते. व्यासपीठावर शहर ठाण्याचे पोनि रवि सानप, उपप्राचार्य डॉ. राजेश ढेरे, रासेयोचे कार्यक्रमाधिकारी डॉ. ओमप्रकाश झंवर, जिल्हा समन्वयक डॉ. सोपान सुरवसे, कार्यालयीन अधिक्षक डॉ. प्रशांत तालखेडकर, यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना आघाव म्हणाले की सरकारने वाहतुकीचे नियम घालून दिलेले आहेत, त्याची अंमलबजावणी करणे अत्यंत आवश्यक आहे. वाहन चालवताना सर्व कागदपत्रे सर्व आवश्यक कागदपत्रे आपल्या जवळ ठेवा, डाव्या बाजूने वाहन चालवा, नियमांचे पालन करून आपण आणि दुसऱ्यांना सुरक्षित ठेवा.

वाहतूक पोलीस शाखेचे सय्यद अशफाक यांनी सांगितले की गाडीवर शासनाच्या नियमात योग्य पद्धतीने नंबर असायला पाहिजे. ओव्हरटेक करताना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. नियम पाळणे तर आपण सुरक्षित राहू असे ते म्हणाले.

अध्यक्षीय समारोपात उपप्राचार्य डॉ. बाहेगव्हाणकर यांनी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त संस्थेने विमोचन केलेल्या ‘प्रेरक बापू’ या पुस्तिकेचा उल्लेख करत स्वच्छता, स्वावलंबन, आणि स्वदेशी या गांधीजींच्या त्रिसूत्रीचा अवलंब करणे गरजेचे आहे, असे सांगून रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त जनजागृती ती करण्यासाठी सर्वांनी पुढे येण्याचे आवाहन केले .

सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक डॉ. ओमप्रकाश झंवर, सूत्रसंचालन डॉ. संगीता ससाने यांनी केले. कार्यक्रमाला भागवत घोडके, सय्यद इलियास यांच्यासह रासेयो स्वयंसेवक विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.