शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
2
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
3
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
4
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
5
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
6
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
7
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
8
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
9
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
10
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
11
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
12
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
13
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
14
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
15
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
17
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
18
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
19
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
20
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित

गेवराई तालुक्यात पाण्यासाठी दाही दिशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 00:23 IST

तालुक्यात सन १९७२ पेक्षाही भयानक परिस्थिती उद्भवल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांनी ज्वारीऐवजी सोयाबीन, कापसाचा पेरा जास्त केल्याने जनावरांच्या चारा, पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मजुरांच्या हाताला काम नसल्याने कामाच्या शोधात मजुरांची भटकंती तर नागरिकांची पाण्यासाठी आतापासूनच भटकंती सुरू असल्याचे विदारक चित्र गेवराई तालुक्यात पहावयास मिळत आहे.

ठळक मुद्देमजुरांच्या कामाच्या शोधार्थ भटकंती : खाजगी टँकरचा भाव पाचशेवर; ५० ते ६० हजार पशुधन जगविण्याची कसरत

विष्णू गायकवाड।लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : तालुक्यात सन १९७२ पेक्षाही भयानक परिस्थिती उद्भवल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांनी ज्वारीऐवजी सोयाबीन, कापसाचा पेरा जास्त केल्याने जनावरांच्या चारा, पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मजुरांच्या हाताला काम नसल्याने कामाच्या शोधात मजुरांची भटकंती तर नागरिकांची पाण्यासाठी आतापासूनच भटकंती सुरू असल्याचे विदारक चित्र गेवराई तालुक्यात पहावयास मिळत आहे.यावर्षी पर्जन्यमान सरासरीपेक्षा निम्मेच झाले. त्यामुळे पिकांबरोबर पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. शहरात पाण्याच्या टँकर्सचा भाव ५०० रुपयांवर गेला आहे तर ग्रामीण भागात वाडी, तांङयावर पाण्यासाठी रानोमाळ भटकंती सुरू आहे. यावर्षी खरीप हंगामाची सुगी नावापुरतीच झाली असून ऐन पावसाळ्यात शिवार उघड झाला आहे.तालुक्यातील लोक मोठ्या प्रमाणात उसतोडीसाठी स्थलांतर करीत आहेत. मुले कडेवर, मजूर फडावर, असे चित्र असून मजुरांची संख्या शासन दरबारी ५० हजार झाली आहे. मात्र हजारो मजूर कामाच्या शोधात मुंबई, पुणे, हैदराबाद , औरंगाबाद, सोलापूर, अहमदनगर व कारखाना परिसरात स्थलांतरीत होत आहेत.तालुक्यात जनावरांची संख्या ५० ते ६० हजारांपेक्षा अधिक असून त्याप्रमाणात चारा उपलब्ध नाही. सर्वच समाजाचा पारंपरिक व्यवसाय पशुपालन शेती हा आहे. त्यामुळे प्रत्येकाकडे एक ते दोन खंडी गुरेढोरे असतात. तसेच अदालीच्या बोलीने शेतकºयांची जनावरे पाळली जातात. त्यामुळे जनावरांची संख्या लक्षणीय आहे. या गुरांच्या चाºयाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तथापि वैरणच नसल्याने चारा व पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. पशु संगोपन गेवराई, शिरसदेवी, उमापूर, मादळमोही, तलवाडा, चकलंबा, पाचेगाव, गढी या गावात छावण्या उघडणे आवश्यक आहे.टँकरसाठी ४६ गावांचा प्रस्तावनागरिकांना दुष्काळाचे चटके मोठया प्रमाणात जाणवू लागले आहेत. सध्या नागरिकांना विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत असल्याचे चित्र तालुक्यात आहे. अशा परिस्थितीत गावात पाण्याचे टँकर सुरू करण्यासाठी आतापर्यंत तालुक्यातील ४६ ग्रामपंचायतींनी ठराव घेऊन पंचायत समिती कार्यालयात दाखल केले आहेत.पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाकडे १९ नोव्हेंबरपर्यंत ४६ गावाचे टँकर सुरू करण्यासाठीचे प्रस्ताव आले आहेत, असे गटविकास अधिकारी के.एम. बागुल यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Beedबीडwater shortageपाणीटंचाई