शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

गेवराई तालुक्यात पाण्यासाठी दाही दिशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 00:23 IST

तालुक्यात सन १९७२ पेक्षाही भयानक परिस्थिती उद्भवल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांनी ज्वारीऐवजी सोयाबीन, कापसाचा पेरा जास्त केल्याने जनावरांच्या चारा, पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मजुरांच्या हाताला काम नसल्याने कामाच्या शोधात मजुरांची भटकंती तर नागरिकांची पाण्यासाठी आतापासूनच भटकंती सुरू असल्याचे विदारक चित्र गेवराई तालुक्यात पहावयास मिळत आहे.

ठळक मुद्देमजुरांच्या कामाच्या शोधार्थ भटकंती : खाजगी टँकरचा भाव पाचशेवर; ५० ते ६० हजार पशुधन जगविण्याची कसरत

विष्णू गायकवाड।लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : तालुक्यात सन १९७२ पेक्षाही भयानक परिस्थिती उद्भवल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांनी ज्वारीऐवजी सोयाबीन, कापसाचा पेरा जास्त केल्याने जनावरांच्या चारा, पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मजुरांच्या हाताला काम नसल्याने कामाच्या शोधात मजुरांची भटकंती तर नागरिकांची पाण्यासाठी आतापासूनच भटकंती सुरू असल्याचे विदारक चित्र गेवराई तालुक्यात पहावयास मिळत आहे.यावर्षी पर्जन्यमान सरासरीपेक्षा निम्मेच झाले. त्यामुळे पिकांबरोबर पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. शहरात पाण्याच्या टँकर्सचा भाव ५०० रुपयांवर गेला आहे तर ग्रामीण भागात वाडी, तांङयावर पाण्यासाठी रानोमाळ भटकंती सुरू आहे. यावर्षी खरीप हंगामाची सुगी नावापुरतीच झाली असून ऐन पावसाळ्यात शिवार उघड झाला आहे.तालुक्यातील लोक मोठ्या प्रमाणात उसतोडीसाठी स्थलांतर करीत आहेत. मुले कडेवर, मजूर फडावर, असे चित्र असून मजुरांची संख्या शासन दरबारी ५० हजार झाली आहे. मात्र हजारो मजूर कामाच्या शोधात मुंबई, पुणे, हैदराबाद , औरंगाबाद, सोलापूर, अहमदनगर व कारखाना परिसरात स्थलांतरीत होत आहेत.तालुक्यात जनावरांची संख्या ५० ते ६० हजारांपेक्षा अधिक असून त्याप्रमाणात चारा उपलब्ध नाही. सर्वच समाजाचा पारंपरिक व्यवसाय पशुपालन शेती हा आहे. त्यामुळे प्रत्येकाकडे एक ते दोन खंडी गुरेढोरे असतात. तसेच अदालीच्या बोलीने शेतकºयांची जनावरे पाळली जातात. त्यामुळे जनावरांची संख्या लक्षणीय आहे. या गुरांच्या चाºयाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तथापि वैरणच नसल्याने चारा व पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. पशु संगोपन गेवराई, शिरसदेवी, उमापूर, मादळमोही, तलवाडा, चकलंबा, पाचेगाव, गढी या गावात छावण्या उघडणे आवश्यक आहे.टँकरसाठी ४६ गावांचा प्रस्तावनागरिकांना दुष्काळाचे चटके मोठया प्रमाणात जाणवू लागले आहेत. सध्या नागरिकांना विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत असल्याचे चित्र तालुक्यात आहे. अशा परिस्थितीत गावात पाण्याचे टँकर सुरू करण्यासाठी आतापर्यंत तालुक्यातील ४६ ग्रामपंचायतींनी ठराव घेऊन पंचायत समिती कार्यालयात दाखल केले आहेत.पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाकडे १९ नोव्हेंबरपर्यंत ४६ गावाचे टँकर सुरू करण्यासाठीचे प्रस्ताव आले आहेत, असे गटविकास अधिकारी के.एम. बागुल यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Beedबीडwater shortageपाणीटंचाई