शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
3
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
4
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
5
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
6
रक्षा बंधन २०२५: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
7
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
8
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
9
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
10
अभिमानास्पद! वडिलांची मित्रांनी उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवते फुटबॉलचं मैदान
11
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
12
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
13
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
14
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...
15
लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पुढील १५ दिवसांत...
16
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
18
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
19
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
20
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान

परतीच्या पावसाने रान उद्ध्वस्त,आता दुबार पेरणीचे संकट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 16:21 IST

९६० हेक्टरवरील पिकांचे परतीच्या पावसाने केले वाटोळे

- नितीन कांबळे 

कडा (जि. बीड) : परतीच्या पावसाने आम्हाला उद्ध्वस्त केलंय. समदा पावसाळा गेला, पण शेतीला पाहिजे तसा पाऊस नाही झाला आणि पुन्हा परतीचा पाऊस सुरू झाला.  उसनवारी करून शेतीत गाडलेले बी उगवून वर येताच या पावसाने सगळे उद्ध्वस्त केले.  

परतीच्या पावसाने आमची रान उपाळली,  आता दुबार पेरणीचे संकट आमच्या नशिबी आल्याची कैफियत आनंदवाडी सराटेवडगाव येथील शेतकरी उत्तम कापरे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. आष्टी तालुक्यातील आनंदवाडी, सराटेवडगाव येथे प्रस्तुत प्रतिनिधीने प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केली.     

आष्टी तालुक्यात  शेतात मोठ्या मेहनतीने कांदा, ज्वारी, हरभरा, मठ , कपाशी, तुरीची लागवड केली होती. पण   परतीच्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जेव्हा पावसाची खरी गरज होती तेव्हा पाण्याविना पिके कोमात गेली आणि आता पाण्यामुळे पिके धोक्यात आली, अशी अवस्था  आहे. आनंदवाडी येथील ४३१ हेक्टर  व  सराटेवडगाव येथील ५३०  हेक्टर क्षेत्र अशा एकूण ९६० हेक्टर क्षेत्रातील पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे अमोल सुंबरे, राजाराम ननवरे यांनी सांगितले. तर परतीचा पाऊस चांगला झाला आणि रान उपळून मनस्ताप झाल्याचे येथील शेतकरी रामदास तरटे म्हणाले. 

शासनाने तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी. कारण दुबार पेरणीसोबतच आर्थिक संकटदेखील ओढावल्याचे येथील सरपंच प्रा.राम बोडखे यांनी सांगितले. ४० हजार हेक्टरातील पिकांचे नुकसान झाले आहे.  कांदा, सोयाबीन, कापूस, बाजरी या पिकांची माती झाली आहे. पंचनामा करून नुकसानभरपाई मिळावी, यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे प्राथमिक नुकसान झालेल्या चाळीस हजार हेक्टर क्षेत्राचा अहवाल सादर केल्याचे तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांनी सांगितले. 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीRainपाऊसBeedबीड