शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

परतीच्या पावसाने रान उद्ध्वस्त,आता दुबार पेरणीचे संकट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 16:21 IST

९६० हेक्टरवरील पिकांचे परतीच्या पावसाने केले वाटोळे

- नितीन कांबळे 

कडा (जि. बीड) : परतीच्या पावसाने आम्हाला उद्ध्वस्त केलंय. समदा पावसाळा गेला, पण शेतीला पाहिजे तसा पाऊस नाही झाला आणि पुन्हा परतीचा पाऊस सुरू झाला.  उसनवारी करून शेतीत गाडलेले बी उगवून वर येताच या पावसाने सगळे उद्ध्वस्त केले.  

परतीच्या पावसाने आमची रान उपाळली,  आता दुबार पेरणीचे संकट आमच्या नशिबी आल्याची कैफियत आनंदवाडी सराटेवडगाव येथील शेतकरी उत्तम कापरे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. आष्टी तालुक्यातील आनंदवाडी, सराटेवडगाव येथे प्रस्तुत प्रतिनिधीने प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केली.     

आष्टी तालुक्यात  शेतात मोठ्या मेहनतीने कांदा, ज्वारी, हरभरा, मठ , कपाशी, तुरीची लागवड केली होती. पण   परतीच्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जेव्हा पावसाची खरी गरज होती तेव्हा पाण्याविना पिके कोमात गेली आणि आता पाण्यामुळे पिके धोक्यात आली, अशी अवस्था  आहे. आनंदवाडी येथील ४३१ हेक्टर  व  सराटेवडगाव येथील ५३०  हेक्टर क्षेत्र अशा एकूण ९६० हेक्टर क्षेत्रातील पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे अमोल सुंबरे, राजाराम ननवरे यांनी सांगितले. तर परतीचा पाऊस चांगला झाला आणि रान उपळून मनस्ताप झाल्याचे येथील शेतकरी रामदास तरटे म्हणाले. 

शासनाने तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी. कारण दुबार पेरणीसोबतच आर्थिक संकटदेखील ओढावल्याचे येथील सरपंच प्रा.राम बोडखे यांनी सांगितले. ४० हजार हेक्टरातील पिकांचे नुकसान झाले आहे.  कांदा, सोयाबीन, कापूस, बाजरी या पिकांची माती झाली आहे. पंचनामा करून नुकसानभरपाई मिळावी, यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे प्राथमिक नुकसान झालेल्या चाळीस हजार हेक्टर क्षेत्राचा अहवाल सादर केल्याचे तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांनी सांगितले. 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीRainपाऊसBeedबीड