शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

ठाण मांडून बसलेल्यांना दणका; आरोग्यातील अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय पुन्हा ६२ वरून ५८

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2021 14:32 IST

सर्वोच्च न्यायालयात वय वाढीविरोधात बीडच्या सहा अधिकाऱ्यांनी दिले होते आव्हान

- सोमनाथ खताळबीड : राज्यातील आरोग्य विभागातील ठरावीक अधिकाऱ्यांच्या हितासाठी राज्यशासनाने सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६२ वर नेले होते. याला बीडच्या सहा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने बीडच्या अधिकाऱ्यांच्या बाजुने निकाल दिल्यावर वय वाढलेल्या अधिकाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. याप्रकरणी उच्च न्यायालयाचे आदेश कायम ठेवण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने २९ नोव्हेंबर रोजी निकाल दिला आहे. यामुळे ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांसह राज्य शासनाला चांगलीच चपराक बसली आहे.

२०१५ सालापासून ठरावीक अधिकाऱ्यांनी राज्य शासनातील काही लोकप्रतिनिधींना हाताशी धरून सेवानिवृत्तीचे वय वाढविण्याचा घाट घातला. यामुळे पदोन्नतीस पात्र असणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर अन्याय होत होता. ३० मे २०१५ रोजीच्या शासन निर्णयानुसार १ महिन्यासाठी वय वाढविले, नंतर ३० जून २०१५ च्या निर्णयानुसार ३ वर्षासाठी मंत्रीमंडळाच्या मान्यतेनंतर निवृत्तीचे वय ५८ वरून ६० केले. यावर ३ सप्टेंबर २०१५ रोजी शिक्कामोर्तब झाले. हा निर्णय ३१ मे २०१८ पर्यंत लागू होता. या कालावधीतील अधिकाऱ्यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रमही अनेक ठिकाणी झाला. परंतु अचानक त्यांना सोशल मीडियातून पुन्हा वय वाढविल्याचे आदेश टाकले. त्यामुळे हे अधिकारी पुन्हा त्याच जागेवर ठाण मांडून बसले. याच आदेशाला बीडच्या डॉ.संजय कदम, डॉ.संजीवनी गव्हाणे, डॉ.विकास आठवले, डॉ. ज्ञानेश्वर निपटे, डॉ.मनीषा काळे, डॉ.सतीश शिंदे, डॉ.महादेव चिंचाेळे यांनी मे २०१८ मध्ये उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ॲड.संजय भोसले व ॲड. अविनाश देशमुख यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती. याला २० मार्च २०२० ला न्यायालयाने निकाल देत वाढविलेले वय नियमबाह्य असून ते रद्द करावे. तसेच यापुढे शासनाने असे निर्णय घेऊ नये, असे सुनावले. या निर्णयाविरोधात पुन्हा डॉ.यशवंत चव्हाण, डॉ.एकनाथ माले, डॉ.गोवर्धन गायकवाड, डॉ.रत्ना रावखंडे यांनी आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. यावर न्यायालयाने २९ नोव्हेंबर रोजी निकाल दिला. यात त्यांनी उच्च न्यायालयाचा निकाल योग्य असून तोच कायम ठेवण्याबाबत सांगितले. न्या.एस. अब्दुल नझीर, न्या.कृष्णा मुरारी यांनी हा निकाल दिला. याचिकाकर्त्यांच्या बाजूने ॲड.शिरीष देशपांडे, ॲड.विनय नवरे, ॲड.श्रेयश उदयललीत, ॲड.राहुल चिटणीस, ॲड.सचिन पाटील, ॲड. आदित्य पांडे, ॲड.जीओ जोसेफ यांनी काम पाहिले.

यांच्या नोकऱ्यांवर येणार गदा?वय वाढीमध्ये संचालिका डॉ.अर्चना पाटील, डॉ.साधना तायडे, अतिरिक्त संचालक डॉ.सतीश पवार, उपसंचालक डॉ.एकनाथ माले, सहसंचालक डॉ.गोवर्धन गायकवाड यांच्यासह जवळपास २० वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तसेच राज्यातील २०० पेक्षा जास्त अधिकारी या वय वाढीमुळे सेवेत कायम आहेत. कोरोनाच्या नावाखाली या अधिकाऱ्यांनी आतापर्यंत ठाण मांडलेले आहे.

अन्याय दूर, आम्ही समाधानी आहोत जिल्हा आरोग्य अधिकारी संघटनेचे राज्याध्यक्ष डाॅ.राधाकिशन पवार यांचे मार्गदर्शनानुसार राज्य शासनाच्या नियमबाह्य कृतीबाबत उच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार संघटनेचे कायदेशीर सल्लागार ॲड. संजय भोसले यांचेमार्फत २०१८ मध्ये याचिका दाखल केलेली होती. यावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल देऊन आमच्यावरील अन्याय दूर केल्याने आम्ही समाधानी आहोत. आता शासनाने पदोन्नतीबाबत तत्काळ कार्यवाही करावी.- डॉ.संजय कदम, याचिकाकर्ते वैद्यकीय अधिकारी बीड

टॅग्स :doctorडॉक्टरBeedबीडSupreme Courtसर्वोच्च न्यायालयState Governmentराज्य सरकार