शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

एकमेकांकडे बोट न दाखवता शेतकऱ्यांच्या तक्रारी 'ऑन दि स्पॉट' सोडवा - खा. प्रीतम मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 15:23 IST

MP Pritam Munde या मार्गावरील अतिरिक्त संपादनातील घरे, विहर, फळबाग, पाईपलाईन यांची शहानिशाकरून तातडीने मावेजा द्यावा

आष्टी : रेल्वेसह महसूल, कृषी अधिकार्‍यांनी एकत्रित येऊन शेतकऱ्यांच्या तक्रारी आॅन दि स्पाॅट सोडवाव्यात. एका खात्याने दुसऱ्या खात्याकडे बोट न दाखवता ठरवून दिलेली कामे जबाबदारीने पूर्ण करून महिनाभरात तक्रारी दूर कराव्यात अशा सूचना खा. प्रितम मुंडे यांनी आज अहमदनगर-बीड-परळी रेल्वेच्या मावेजाबाबत येथील तहसील कार्यालयात आढावा बैठकीत दिल्या. तसेच या मार्गावरील अतिरिक्त संपादनातील घरे, विहर, फळबाग, पाईपलाईन यांची शहानिशाकरून तातडीने मावेजा शेतकऱ्यांना देण्याची सूचना देखील  खा. मुंडे यांनी केली. ( MP Pritam Munde on Beed Railway Issue )

सोमवारी खा.डॉ.प्रीतम मुंडे व माजी.आ.भीमसेन धोंडे यांनी अहमदनगर- बीड - परळी या रेल्वेमार्गाचे आष्टी तालुक्यात सुरु असलेल्या कामाची पाहणी करुन आष्टी (चिंचाळा) येथील रेल्वेस्टेशन कामाची पाहणी केली. तसेच आष्टी तहसील कार्यालयात आढावा बैठकी घेऊन थकीत मावेजा प्रकरणी पुढे खा. मुंडे म्हणाल्या की, सध्या ४४ हेक्टर भूसंपादन राहिले असून सर्वात जास्त आष्टी तालुक्यात राहिले आहे. तालुक्याचा १५ दिवसांत प्रश्न मार्गी लावा. रेल्वे, भूसंपादन, कृषी अधिका-यांनी आॅन दि स्पाॅट ८ दिवसांत शेतक-यांचे प्रश्न मार्गी लावा. यावेळी शेतक-यांनी रेल्वे ब्रीज आॅप्शन रोड हे अत्यंत निकृष्ट व लेवल मध्ये न केल्याने जाण्या येण्याची अडचण निर्माण झाली आहे. अशी तक्रार करताच आॅप्शन रोड दुरुस्त करण्याच्याही सूचना त्यांनी अधिका-यांना दिल्या आहेत. बैठकीला आ. बाळासाहेब आजबे,माजी. आ.भिमसेन धोंडे, उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, तहसिलदार राजाभाऊ कदम, सविता,गोल्हार, अॅड वाल्मिक निकाळजे, विजय गोल्हार, सभापती सुवर्णा लाबरूड, शंकर देशमुख, शैलेजा गर्जे, अशोक पोकळे, उपसरपंच सुग्रीव नागरगोजे,अंकुश नागरगोजे,संदिप नागरगोजे हे उपस्थित होते.

गैरप्रकारामुळे काम लांबले शेतकऱ्यांच्या बोगस विहिरी, फळबाग आणि घरे यांची नोंद केल्याच्या तक्रारी येत आहेत. यामुळे रेल्वे येण्यासाठी वेळ लागत आहे. सोलापूरवाडीपर्यंत टेस्टिंग झाली आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी तक्रारी तात्काळ सोडवल्या तर थोड्याच दिवसात रेल्वेचे काम पूर्ण होईल    - आ. बाळासाहेब आजबे 

रेल्वेचे काम संथ गतीने सुरू आहेभूसंपादन काम स्लो चालले असल्यामुळे रेल्वेचे काम रखडले आहे.आष्टी पर्यंत रेल्वे येण्यास काम जलदगतीने केल्यास अडचण नाही शेतक-यांना नियमाप्रमाणे मावेजा द्या - माजी आ.भिमसेन धोंडे 

टॅग्स :Pritam Mundeप्रीतम मुंडेBeedबीड