शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

अंबाजोगाई जिल्हा निर्मितीला पुन्हा खो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 23:58 IST

अविनाश मुडेगावकर । लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : महाविकास आघाडीने नवीन जिल्हा निर्मितीची यादी प्रस्तावित केली आहे. या प्रस्तावित ...

ठळक मुद्देलोकप्रतिनिधींचा प्रभाव नाही : जिल्ह्यासाठी पूरक कार्यालये असूनही प्रस्ताव नाही

अविनाश मुडेगावकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : महाविकास आघाडीने नवीन जिल्हा निर्मितीची यादी प्रस्तावित केली आहे. या प्रस्तावित यादीत अंबाजोगाईला स्थान न मिळाल्याने जिल्हा निर्मितीच्या मागणीला पुन्हा खो बसला आहे. शासनाकडून सातत्याने अंबाजोगाईकरांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम वर्षानुवर्ष सुरु आहे.अंबाजोगाई जिल्हा निर्मितीची मागणी मागील ३५ वर्षांपासून शासन दरबारी आहे. या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी सातत्याने जनआंदोलनाचा रेटा विविध माध्यमातून सुरुच आहे. जिल्हा निर्मितीला पूरक असणारी सर्व कार्यालये अंबाजोगाईत सज्ज आहेत. अपर जिल्हाधिकारी कार्यालय, अपर पोलीस अधीक्षक कार्यालय, प्रादेशिक परिवहन कार्यालय, भूसंपादनाची तीन कार्यालये अशी शासकीय यंत्रणा स्वतंत्र व अद्ययावत इमारतीत सज्ज आहे. तरीही अंबाजोगाईकरांना सातत्याने डावलले जाते. दिवंगत माजीमंत्री डॉ. विमल मुंदडा यांनी त्यांच्या कार्यकाळात जिल्हा निर्मितीसाठी आवश्यक असणारी सर्वच कार्यालये अंबाजोगाईत कार्यान्वित केली. नवीन अत्यावश्यक असणाऱ्या कार्यालयासाठी शासकीय जमीन मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. अंबाजोगाई जिल्ह्याची निर्मिती झाल्यास अत्यंत कमी खर्चात कार्यान्वित होऊ शकतो याचे अहवाल विभागीय आयुक्तांनी अनेकवेळा वरिष्ठ प्रशासनाला पाठवलेले आहेत. गेल्या बारा वर्षांपासून अंबाजोगाईत सर्व कार्यालये सुरु झालेली आहेत. अशी सर्व सकारात्मक स्थिती असतानाही अंबाजोगाईला जिल्हा निर्मितीबाबत वारंवार डावलले जाते, हे नित्याचे ठरले आहे.अंबाजोगाई जिल्हा निर्मितीसाठी गेल्या ३५ वर्षात हिंसक आंदोलनासह शांततामय तथा लोकशाही मार्गाने आंदोलने सुरुच आहेत. आजतागायत सह मुख्यमंत्र्यांनी अंबाजोगाई जिल्हा निर्मितीचे आश्वासन दिले आहेत. (कै. सुधाकरराव नाईक, शरद पवार, मनोहर जोशी, कै.विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, देवेंद्र फडणवीस) तरीही अंबाजोगाईकरांची मागणी पूर्ण झालेली नाही. ज्या ज्या वेळी विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांचा प्रचार सुरु झाला की अंबाजोगाई जिल्हा निर्मिती हा मुद्दा कळीचा ठरतो. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जिल्हा निर्मितीच्या प्रश्नावर सोयीचे राजकारण केलेले आहे. निवडणुका संपल्या की हा प्रश्न पुन्हा प्रलंबित राहतो. केवळ राजकीय इच्छाशक्तीच्या अभावी अंबाजोगाई जिल्हा निर्मितीचा प्रश्न रखडत पडला आहे. महाविकास आघाडीने नवीन प्रस्तावित जिल्ह्यांची यादी जाहीर केली. त्या प्रस्तावित यादीत अंबाजोगाईला स्थान न मिळाल्याने अंबाजोगाईकरांची घोर निराशा झाली आहे.दोन पिढ्यांचा लढा, नाही सुटला तिढाअंबाजोगाई जिल्हा निर्मितीच्या मागणीसाठी सातत्याने सर्वपक्षीय आंदोलन झाले. राजकारण बाजुला ठेवून जिल्हा निर्मितीच्या मागणीसाठी अंबाजोगाईकरांचा लढा सुरुच आहे. कै. डॉ. द्वारकादास लोहिया, कै. डॉ. विमल मुंदडा, कै. अरुण पुजारी, अमर हबीब, अशोक गुंजाळ, प्रा. नानासाहेब गाठाळ, कॉ. काशीनाथ कापसे, कै. संभाजीराव जोगदंड यांच्यासह अनेकांच्या पहिल्या फळीने तर नंदकिशोर मुंदडा, राजकिशोर मोदी, राजेसाहेब देशमुख, बबन लोमटे, विद्यमान आ. संजय दौंड यांच्या दुसºया फळीनेही जिल्हा निर्मितीचा प्रश्न साततत्याने तेवत ठेवला आहे. गेल्या ३५ वर्षांपासून जिल्हा निर्मितीसाठी अंबाजोगाईकरांचा लढा विविध माध्यमातून सुरुच आहे. मात्र हा तिढा सुटता सुटेना.

टॅग्स :BeedबीडState Governmentराज्य सरकारAmbajogaiअंबाजोगाई