शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

Remdesivir Shortage : नोंदणीनंतर १० दिवसांनी मिळते रेमडेसिविर इंजेक्शन; या काळात रेफर रुग्णांचे इंजेक्शन जातात कुठे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 19:39 IST

Remdesivir Shortage : कोरोना रुग्णांना उपचारासाठी रेमडेसिविर इंजेक्शनचा उपयोग सध्या महत्त्वाचा ठरत आहे. त्यामुळे या इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत आहे

ठळक मुद्देशासकीय पुरवठा मागणीच्या तुलनेत अत्यंत कमी प्रमाणात होत आहे.तहसील कार्यालयात रुग्णांच्या नातेवाइकांना इंजेक्शनची मागणी नोंदवावी लागते.

माजलगाव ( जि. बीड ) : गंभीर कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असलेले रेमडेसिविर इंजेक्शन मागणी नोंदविल्यानंतर १० दिवसांनी मिळत असल्याने मोठी अडचण होत आहे. दरम्यान, या कालावधीत रुग्ण बरा होऊन घरी गेला किंवा अन्य ठिकाणी त्याला उपराचार्थ हलविण्यात आले अथवा एखाद्याचा दुर्दैवाने मृत्यू झाला तर त्याच्या नावे मागविलेले रेमडेसिविर जाते कुठे, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

कोरोना रुग्णांना उपचारासाठी रेमडेसिविर इंजेक्शनचा उपयोग सध्या महत्त्वाचा ठरत आहे. त्यामुळे या इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत आहे, तर दुसरीकडे शासकीय पुरवठा मागणीच्या तुलनेत अत्यंत कमी प्रमाणात होत आहे. तहसील कार्यालयात रुग्णांच्या नातेवाइकांना इंजेक्शनची मागणी नोंदवावी लागते. त्यानंतर वेटिंग लिस्ट लागते व त्याप्रमाणे इंजेक्शन मिळते, अशी परिस्थिती आहे. रुग्णास इंजेक्शन द्यावे लागणार, असे सांगताच इंजेक्शन नोंदणी केली जाते. मात्र, तब्बल दहा दिवस प्रतीक्षा करावी लागते. वेळेवर ते उपलब्ध होत नाही. मोठ्या संख्यने बाधित बरे होऊन घरी परतले, काहींना अन्य ठिकाणी हलविले असेल आणि दहा दिवसांनी नोंदणी केलेले इंजेक्शन मिळत असतील तर त्याचा उपयोग काय, असा प्रश्न बाधितांच्या नातेवाइकांतून उपस्थित केला जात आहे. माजलगाव तहसील कार्यालयात २३ एप्रिलपासून १२ मेपर्यंत ९५४ रुग्णांनी नोंदणी केली आहे. आतापर्यंत आरोग्य विभागाकडून २ मेपर्यंत नोंदणी केलेल्यांचेच रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध झाले आहेत. १२ मेपर्यंत केवळ ३२९ रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध होऊ शकले.

रेमडेसिविर इंजेक्शन जातात कुठे?नोंदणी केलेले रेमडेसिविर इंजेक्शन १० दिवसांनंतर उपलब्ध होत आहे. तोपर्यंत संबंधित रुग्ण दगावतो किंवा रेफर केला जातो किंवा सुटी मिळाल्यानंतर घरी जातो. मात्र, अशा रुग्णांसाठी नोंदणी केलेले इंजेक्शन आल्यानंतर त्यांना दिले जात नाही, किंवा जिल्हा आरोग्य विभागाकडे त्या नावाचे इंजेक्शन परत जमादेखील केलेले नाहीत. मग हे इंजेक्शन जातात कुठे, याचीदेखील चौकशी होणे आवश्यक असल्याचे मत रुग्णांच्या नातेवाइकांतून व्यक्त होत आहे.

आम्ही इंजेक्शन नोंदणीची माहिती आरोग्य विभागास पाठवतो. त्यास मंजुरी मिळून ते ग्रामीण रुग्णालयात पाठवले जाते. रुग्ण मृत्यूनंतर किंवा रुग्ण डिस्चार्ज-रेफर झाल्यावर त्याच्या नावाचे शिल्लक इंजेक्शन परत आरोग्य खात्याकडे पाठवायला पाहिजे, असा शासनाचा आदेश आहे.- वैशाली पाटील, तहसीलदार, माजलगाव.

रेमडेसिविर इंजेक्शन वरूनच कमी येत आहेत. त्यामुळे आम्हाला वाटपात अडचणी येत आहेत. शिल्लक इंजेक्शन वेटिंग लिस्टप्रमाणे रुग्णांना देण्यात येतात.- डॉ. सुरेश साबळे, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, माजलगाव.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBeedबीडremdesivirरेमडेसिवीर