शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

नाफेडच्या ९ केंद्रांवर केवळ ६७ शेतकऱ्यांकडून नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 23:54 IST

खरीप हंगामातील पिके हाती आलेली असतानाच अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले. कोंब फुटल्याने व काळवंडल्याने ही पिके नाफेडच्या निकषात पात्र ठरणार नसल्याची मानिसकता बनल्याने जिल्ह्यातील शेतक-यांनी माल विकण्यासाठी नोंदणीदेखील केली नाही.

ठळक मुद्देमुगासाठी ५५ , सोयाबीनसाठी १० शेतकऱ्यांची नोंदणी : दोन महिन्यांत अल्प नोंदणी; १५ डिसेंबरपर्यंत नोंदणीसाठी मिळाली मुदतवाढ

बीड : खरीप हंगामातील पिके हाती आलेली असतानाच अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले. कोंब फुटल्याने व काळवंडल्याने ही पिके नाफेडच्या निकषात पात्र ठरणार नसल्याची मानिसकता बनल्याने जिल्ह्यातील शेतक-यांनी माल विकण्यासाठी नोंदणीदेखील केली नाही. दोन महिन्यात केवळ ६७ शेतक-यांनी नोंदणी केली आहे. यात ५६ शेतकºयांनी मूग विक्रीसाठी नोंदणी केली आहे. यावरु न सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाल्याचे स्पष्ट होत आहे. तर आहे तो माल विकण्याची चिंता शेतकºयांना आहे.शाासकीय हमीदराने खरेदीसाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून नाफेडच्या वतीने खरीप हंगामातील मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी केंद्र निश्चित करण्यात आले होते. जिल्ह्यातील ९ केंद्रांवर यासाठी १५ सप्टेंबरपासून नोंदणी सुरु केली होती. जून ते सप्टेंबर कालावधीत अनियमित पाऊस झाला तरी पिके जोमात होती. दरम्यान आॅक्टोबरमध्ये जिल्ह्यात सर्वच तालुक्यात अवेळी आणि मुसळधार पाऊस झाला. या पावसाने हाती आलेला घास हिरावला. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले. यात सोयाबीनचे नुकसान मोठ्या प्रमाणात आहे. पावसाच्या तडाख्यानंतर शेतीाकामात शेतकरी आहेत. भिजलेली, काळवंडलेली पिके असल्याने हा माल कोणी घेणार नाही अशी स्थिती आहे. त्यात ही पिके आता नाफेडचे निकष पूर्ण करु शकणार नाहीत. त्यामुळे शेतक-यांनी नोंदणीकडे पर्यायाने नाफेडला माल विकण्याकडे पाठ फिरविल्याचे दिसत आहे. जिल्ह्यातील ९ केंद्रांवर दोन महिन्यात केवळ ६७ शेतकºयांनी नोंदणी केली आहे. सर्वत्र प्रतिसाद कमी मिळाल्याने तसेच शेतक-याच्या अडचणी लक्षात घेऊन नाफेडने खरेदीसाठी १५ डिसेंबरपर्यंत नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. परंतु खरीप हंगामातील उत्पादनाची एकूण परिस्थिती लक्षात घेता शेतकरी मोठ्या संख्येने नोंदणी करतील असे चित्र सध्यातरी नाही.मुगासाठी बीडमध्ये सर्वाधिक नोंदणीमूग विक्रीसाठी नाफेडच्या बीड केंद्रावर ४४ शेतक-यांनी नोंदणी केली आहे. अंबाजोगाई, माजलगाव, धारुर येथे प्रत्येकी एक तर परळीत ९ शेतक-यांनी नोंदणी केली आहे.चार तालुक्यातील नोंदणी निरंकसोयाबीनसाठी बीडमधून ८ तर माजलगावात २ अशा १० शेतक-यांनी नोंदणी केली आहे. तर केवळ परळीत उडीद विक्रीसाठी एका शेतक-याची नोंदणी आहे. गेवराई, शिरुर, आष्टी, पाटोदा येथे एकाही शेतक-याची नोंदणी झालेली नाही.सोयाबीनचा दर्जा खराबपावसामुळे सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणात भिजले आहे. आर्द्रता, डागी आणि माती या शर्तीवर २२०० ते ३५०० पर्यंत भाव असलातरी खरेदीदार सावधतेने खरेदी करत आहेत. सध्या धुळे, लातूर, सोलापूर, सांगली भागातील प्लान्टकडून चांगल्या प्रतीच्या सोयाबीनला ३८०० रुपयांपर्यंत भाव मिळत असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र