शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

कारखान्याकडून पैसे देण्यास टाळाटाळ; संतप्त शेतकऱ्याने बुलेट टाकली थेट उसाच्या गव्हाणीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2024 18:10 IST

ऊस घेऊन पैसे देण्यास गुळ पावडर कारखान्याची चाल ढकल

माजलगाव: तालुक्यातील रोषणपुरी येथे गुळपावडर उत्पादन करणाऱ्या रूपामाता कारखान्याने शेतकऱ्यांचा ऊस नेला परंतु ते पैसे देण्यास चालढकल करत असल्याने एका शेतकऱ्यांनी मंगळवारी रात्री स्वतःची बुलेट गव्हाणीत सोडली. यापूर्वीही एका शेतकऱ्याने गव्हाणीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

तालुक्यातील रोशनपुरी येथे गुळ पावडर उत्पादन करणाऱा रूपामाता नावाने कारखाना उभा करण्यात आला. हा कारखाना सुरू झाल्यापासून शेतकऱ्यांना वेळेत पैसे देत नसल्याच्या तक्रारी होत्या. या कारखान्याने शेतकऱ्यांकडुन १५ दिवसाच्या मुदतीवर ऊस घेऊन गेले होते. परंतु दीड ते दोन महिने झाले असताना संबंधित कारखान्याकडून शेतकऱ्यांना उसाचे बिल मिळत नाही. यामुळे पंधरा दिवसांपूर्वी एका शेतकऱ्याने गव्हाणी मध्ये उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

तर शिंपेटाकळी येथील लक्ष्मण गवळी याचा या कारखान्यास दिड दोन महिन्यापूर्वी ऊस गेला होता. अनेक वेळा कारखान्याकडे उसाचे बिल मागून देखील कारखान्याकडून बिलासाठी चालढकल केली जात असल्याचा आरोप लक्ष्मण गवळी यांनी केला आहे. त्याचबरोबर संबंधित शेतकऱ्यास सोमवारी पैसे देतो म्हणून एका बँकेत दिवसभर बसवून घेण्यात आले, परंतु त्यास पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे आज गवळी यांनी कारखान्यात येत पैशांची मागणी करत बुलेट गाडी थेट उसचा रस काढण्यात येतो त्या गव्हाणीत टाकली. काही वेळाने कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी बुलेट बाहेर काढली. 

आम्ही नोव्हेंबर अखेरपर्यंतचे उसाचे बिल आता शेतकऱ्यांना दिले आहे. लवकरच शेतकऱ्यांना बाकीची रक्कम देण्यात येईल.- भाऊसाहेब गुंड,संचालक, रूपामाता कारखाना

अत्यल्प पाऊस त्यात मालाला भाव नसल्याने शेतकरी आधीच तणावात आहे. रूपामाता कारखान्याकडून शेतकऱ्यांची अडवणूक केली जात आहे. यापूर्वी अनेक शेतकऱ्यांनी या कारखान्याच्या गव्हाणीमध्ये उड्या घेतलेल्या आहेत. येथे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या कारखान्याचा परवाना रद्द करण्यात यावा.-अॅड नारायण गोले ,शेकाप नेते

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रBeedबीड