शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

रमेश आडसकरांचा विरोधकांना ‘हाबाडा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 00:24 IST

उमेदवारी अर्ज दाखल करताना भव्य रॅली काढून भाजपाचे उमेदवार रमेश आडसकर यांनी सलामीलाच विरोधकांना ‘हाबाडा’ दिला आहे.

ठळक मुद्देराष्टÑवादी काँग्रेसमधील अनेक दिग्गजांचा भाजपत प्रवेश : भाजपाच्या विराट रॅलीचीच अजूनही होतेय माजलगाव मतदारसंघात चर्चाच चर्चा

पुरुषोत्तम करवा।लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : माजलगाव विधानसभा निवडणुकीच्या अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी २५ एवढे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात शिल्लक राहिले. वंचितच्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज छाननीत बाद झाल्याने या निवडणुकीत आता भाजपाराष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांमध्येच खरी लढत होणार असल्याने येथील निवडणूक अटीतटीची होईल, असे चित्र आज तरी दिसून येत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना भव्य रॅली काढून भाजपाचे उमेदवार रमेश आडसकर यांनी सलामीलाच विरोधकांना ‘हाबाडा’ दिला आहे. भाजपाच्या या विराट रॅलीचीच माजलगाव मतदारसंघात जिकडे तिकडे चर्चाच चर्चा चालू आहे.माजलगाव मतदार संघात माजलगावसह धारूर व वडवणी तालुका येतो. माजलगाव तालुक्यातील १२१, धारूर तालुक्यातील ४५ व वडवणी तालुक्यातील ६८ गावांचा समावेश आहे. या मतदारसंघात ३ लाख ३१ हजार १० एवढे मतदार आहेत. लोकसभा निवडणुकीपेक्षा २ हजार ८४६ नवीन मतदारांची संख्या वाढली. यासाठी विधानसभा निवडणुकीसाठी ६४ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी १४ उमेदवारी अर्ज छाननीत बाद झाले होते.अपक्ष उमेदवारांचा आपल्याला किंवा विरोधकांना फायदा-तोटा होईल हे पाहुन अपक्षांची मनधरणी दोन दिवसांपासून भाजप - राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांकडून करण्यात येत होती. त्यात अनेक अपक्षांचे उमेदवारी अर्ज काढण्यात ते यशस्वी देखील झाले. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर या मतदारसंघात एवढे उमेदवार शिल्लक राहिले.या मतदारसंघात मुख्य लढत भाजप - शिवसेना व मित्र पक्षाचे उमेदवार रमेश आडसकर व राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाचे उमेदवार प्रकाश सोळंके यांच्यातच होईल, असे चित्र आज तरी पहावयास मिळत आहे. आडसकर हे मोहन जगताप व ओमप्रकाश शेटे यांचे मन वळविण्यात यश्स्वी झाले आहेत. भाजपाची जुनी फळी आ. आर.टी. देशमुख यांच्यापासून दुरावली होती, आता त्यांना सोबत घेऊन फिरत असल्याने त्याचा फायदा आडसकरांना होऊ शकतो. विरोधकांना आडसकर यांच्या विरोधात पाहिजे, असा ठोस मुद्दा मिळालेला नाही तर राष्ट्रवादीच्या दुसऱ्या फळीतील अनेक जण भाजपासोबत गेल्याने तसेच आडसकर यांचा धारूर तालुक्यात संपर्क चांगला असल्याचा फायदा आडसकरांना होऊ शकतो. आडसकरांचा स्वभाव हा सर्वात मिसळून राहण्याचा असल्याने आडसकर यांच्याभोवतीची कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची फौज दिवसेंदिवस वाढतच आहे.पदाधिकारी भाजपत गेल्याने अडचणीदुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रकाश सोळंके यांनी आतापर्यंत पाच वेळा विधानसभा निवडणूक लढवली असून, त्यापैकी तीन वेळा या मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी १५ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी राज्यमंत्री पद देखील भुषवले होते.चिडचिड्या स्वभावामुळे नागरिक त्यांना बोलण्यास धजावत नाहीत. मागील आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसºया फळीतील नेते व प्रकाश सोळंके यांचे नातेवाईक भाजपात गेल्याने त्यांची अडचण झाली. ही निवडणूक त्यांच्यासाठी कसोटीची दिसत आहे.

टॅग्स :BeedबीडAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस