शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

रमेश आडसकरांचा विरोधकांना ‘हाबाडा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 00:24 IST

उमेदवारी अर्ज दाखल करताना भव्य रॅली काढून भाजपाचे उमेदवार रमेश आडसकर यांनी सलामीलाच विरोधकांना ‘हाबाडा’ दिला आहे.

ठळक मुद्देराष्टÑवादी काँग्रेसमधील अनेक दिग्गजांचा भाजपत प्रवेश : भाजपाच्या विराट रॅलीचीच अजूनही होतेय माजलगाव मतदारसंघात चर्चाच चर्चा

पुरुषोत्तम करवा।लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : माजलगाव विधानसभा निवडणुकीच्या अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी २५ एवढे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात शिल्लक राहिले. वंचितच्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज छाननीत बाद झाल्याने या निवडणुकीत आता भाजपाराष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांमध्येच खरी लढत होणार असल्याने येथील निवडणूक अटीतटीची होईल, असे चित्र आज तरी दिसून येत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना भव्य रॅली काढून भाजपाचे उमेदवार रमेश आडसकर यांनी सलामीलाच विरोधकांना ‘हाबाडा’ दिला आहे. भाजपाच्या या विराट रॅलीचीच माजलगाव मतदारसंघात जिकडे तिकडे चर्चाच चर्चा चालू आहे.माजलगाव मतदार संघात माजलगावसह धारूर व वडवणी तालुका येतो. माजलगाव तालुक्यातील १२१, धारूर तालुक्यातील ४५ व वडवणी तालुक्यातील ६८ गावांचा समावेश आहे. या मतदारसंघात ३ लाख ३१ हजार १० एवढे मतदार आहेत. लोकसभा निवडणुकीपेक्षा २ हजार ८४६ नवीन मतदारांची संख्या वाढली. यासाठी विधानसभा निवडणुकीसाठी ६४ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी १४ उमेदवारी अर्ज छाननीत बाद झाले होते.अपक्ष उमेदवारांचा आपल्याला किंवा विरोधकांना फायदा-तोटा होईल हे पाहुन अपक्षांची मनधरणी दोन दिवसांपासून भाजप - राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांकडून करण्यात येत होती. त्यात अनेक अपक्षांचे उमेदवारी अर्ज काढण्यात ते यशस्वी देखील झाले. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर या मतदारसंघात एवढे उमेदवार शिल्लक राहिले.या मतदारसंघात मुख्य लढत भाजप - शिवसेना व मित्र पक्षाचे उमेदवार रमेश आडसकर व राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाचे उमेदवार प्रकाश सोळंके यांच्यातच होईल, असे चित्र आज तरी पहावयास मिळत आहे. आडसकर हे मोहन जगताप व ओमप्रकाश शेटे यांचे मन वळविण्यात यश्स्वी झाले आहेत. भाजपाची जुनी फळी आ. आर.टी. देशमुख यांच्यापासून दुरावली होती, आता त्यांना सोबत घेऊन फिरत असल्याने त्याचा फायदा आडसकरांना होऊ शकतो. विरोधकांना आडसकर यांच्या विरोधात पाहिजे, असा ठोस मुद्दा मिळालेला नाही तर राष्ट्रवादीच्या दुसऱ्या फळीतील अनेक जण भाजपासोबत गेल्याने तसेच आडसकर यांचा धारूर तालुक्यात संपर्क चांगला असल्याचा फायदा आडसकरांना होऊ शकतो. आडसकरांचा स्वभाव हा सर्वात मिसळून राहण्याचा असल्याने आडसकर यांच्याभोवतीची कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची फौज दिवसेंदिवस वाढतच आहे.पदाधिकारी भाजपत गेल्याने अडचणीदुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रकाश सोळंके यांनी आतापर्यंत पाच वेळा विधानसभा निवडणूक लढवली असून, त्यापैकी तीन वेळा या मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी १५ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी राज्यमंत्री पद देखील भुषवले होते.चिडचिड्या स्वभावामुळे नागरिक त्यांना बोलण्यास धजावत नाहीत. मागील आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसºया फळीतील नेते व प्रकाश सोळंके यांचे नातेवाईक भाजपात गेल्याने त्यांची अडचण झाली. ही निवडणूक त्यांच्यासाठी कसोटीची दिसत आहे.

टॅग्स :BeedबीडAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस