शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

रमेश आडसकरांचा विरोधकांना ‘हाबाडा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 00:24 IST

उमेदवारी अर्ज दाखल करताना भव्य रॅली काढून भाजपाचे उमेदवार रमेश आडसकर यांनी सलामीलाच विरोधकांना ‘हाबाडा’ दिला आहे.

ठळक मुद्देराष्टÑवादी काँग्रेसमधील अनेक दिग्गजांचा भाजपत प्रवेश : भाजपाच्या विराट रॅलीचीच अजूनही होतेय माजलगाव मतदारसंघात चर्चाच चर्चा

पुरुषोत्तम करवा।लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : माजलगाव विधानसभा निवडणुकीच्या अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी २५ एवढे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात शिल्लक राहिले. वंचितच्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज छाननीत बाद झाल्याने या निवडणुकीत आता भाजपाराष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांमध्येच खरी लढत होणार असल्याने येथील निवडणूक अटीतटीची होईल, असे चित्र आज तरी दिसून येत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना भव्य रॅली काढून भाजपाचे उमेदवार रमेश आडसकर यांनी सलामीलाच विरोधकांना ‘हाबाडा’ दिला आहे. भाजपाच्या या विराट रॅलीचीच माजलगाव मतदारसंघात जिकडे तिकडे चर्चाच चर्चा चालू आहे.माजलगाव मतदार संघात माजलगावसह धारूर व वडवणी तालुका येतो. माजलगाव तालुक्यातील १२१, धारूर तालुक्यातील ४५ व वडवणी तालुक्यातील ६८ गावांचा समावेश आहे. या मतदारसंघात ३ लाख ३१ हजार १० एवढे मतदार आहेत. लोकसभा निवडणुकीपेक्षा २ हजार ८४६ नवीन मतदारांची संख्या वाढली. यासाठी विधानसभा निवडणुकीसाठी ६४ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी १४ उमेदवारी अर्ज छाननीत बाद झाले होते.अपक्ष उमेदवारांचा आपल्याला किंवा विरोधकांना फायदा-तोटा होईल हे पाहुन अपक्षांची मनधरणी दोन दिवसांपासून भाजप - राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांकडून करण्यात येत होती. त्यात अनेक अपक्षांचे उमेदवारी अर्ज काढण्यात ते यशस्वी देखील झाले. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर या मतदारसंघात एवढे उमेदवार शिल्लक राहिले.या मतदारसंघात मुख्य लढत भाजप - शिवसेना व मित्र पक्षाचे उमेदवार रमेश आडसकर व राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाचे उमेदवार प्रकाश सोळंके यांच्यातच होईल, असे चित्र आज तरी पहावयास मिळत आहे. आडसकर हे मोहन जगताप व ओमप्रकाश शेटे यांचे मन वळविण्यात यश्स्वी झाले आहेत. भाजपाची जुनी फळी आ. आर.टी. देशमुख यांच्यापासून दुरावली होती, आता त्यांना सोबत घेऊन फिरत असल्याने त्याचा फायदा आडसकरांना होऊ शकतो. विरोधकांना आडसकर यांच्या विरोधात पाहिजे, असा ठोस मुद्दा मिळालेला नाही तर राष्ट्रवादीच्या दुसऱ्या फळीतील अनेक जण भाजपासोबत गेल्याने तसेच आडसकर यांचा धारूर तालुक्यात संपर्क चांगला असल्याचा फायदा आडसकरांना होऊ शकतो. आडसकरांचा स्वभाव हा सर्वात मिसळून राहण्याचा असल्याने आडसकर यांच्याभोवतीची कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची फौज दिवसेंदिवस वाढतच आहे.पदाधिकारी भाजपत गेल्याने अडचणीदुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रकाश सोळंके यांनी आतापर्यंत पाच वेळा विधानसभा निवडणूक लढवली असून, त्यापैकी तीन वेळा या मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी १५ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी राज्यमंत्री पद देखील भुषवले होते.चिडचिड्या स्वभावामुळे नागरिक त्यांना बोलण्यास धजावत नाहीत. मागील आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसºया फळीतील नेते व प्रकाश सोळंके यांचे नातेवाईक भाजपात गेल्याने त्यांची अडचण झाली. ही निवडणूक त्यांच्यासाठी कसोटीची दिसत आहे.

टॅग्स :BeedबीडAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस