शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
4
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
5
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
6
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
7
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
8
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
9
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
10
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
11
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
12
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
13
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
14
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
15
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
16
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
17
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
18
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
19
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले

बीड जिल्ह्यात पावसाची ओढ; कडधान्याचा उतारा ४० टक्के येणार कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2019 00:35 IST

जिल्ह्यातील वरुणराजाचा कृपा झालेली नसल्यामुळे अजूनही दुष्काळ सदृष्य परिस्थीत कायम आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीला थोड्या प्रमाणात झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या.

ठळक मुद्देमूग, उडीद इतर कडधान्याचे क्षेत्र घटले : पुढील काळात पाऊस न पडल्यास कापूस, सोयाबीन पिकांना धोका

बीड : जिल्ह्यातील वरुणराजाचा कृपा झालेली नसल्यामुळे अजूनही दुष्काळ सदृष्य परिस्थीत कायम आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीला थोड्या प्रमाणात झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या. मात्र, पुढील काळात पावसाने ओढ दिल्यामुळे मुख्य पिक असलेल्या कापूस, सोयाबीनवर मोठ्याप्रमाणात परिणाम झाला आहे. त्याचसोबत मूग, उडीद व इतर कडधान्याच्या उत्पादनात घट होऊन उतारा कमी येणार असल्याचे चित्र आहे.खरीप हंगामात यावर्षी तुरळक पावसावर कापूस, सोयाबीन, बाजरी, तूर, मूग, उडीद यासह इतर पिकांचा पेरा शेतकऱ्यांनी केला होता. मागीलवर्षीच्या तुलनेत यावर्षी सोयबीन व कापूस या पिकांचा पेरा कमी झाला आहे. त्याचसोबत गतवर्षीच्यापेक्षा जवळपास ५ टक्के क्षेत्रावर खरीप पिकांचा पेरा कमी झाला आहे. जुलै ते आॅगस्ट महिन्याच्या कालावधीत तुरळक प्रमाणात पाऊस झाल्यामुळे काही पिकांना जिवनदान मिळाले आहे. मात्र, पुन्हा पावसाने उघडीप दिल्यामुळे पिकांवर परिणाम जाणवत आहे. सोयबीन फुलोºयात आहे मात्र, पाणी कमी पडत असल्यामुळे फुले गळून पडत आहेत. त्यामुळे शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.ऐकूण खरीप क्षेत्राच्या तुलनेत दरवर्षी जवळपास ६० हजार क्षेत्रावर कडधान्याचा पेरा केला जातो. या क्षेत्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात यावर्षी घट झाली आहे. तसेच कडधान्याची पिकं ही ६० दिवसांची असल्यामुळे आता फुले व काही ठिकाणी शेंगा भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. या कालावधीत पाण्याची आवश्यता आहे. मात्र, पाणी उपलब्ध नसल्यामुळे कडधान्यच्या उत्पादनात अंदाजे ४० टक्के घट येण्याची शक्यता कृषी विभागाच्या वतीने वर्तवण्यात येत आहे. तसेच पुढील काळात पावसाची अशीच परिस्थिती राहिली तर सर्वच पिकांच्या उपत्पादनात घट होणार असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. अशा परिस्थितीमध्ये देखील शेतकरी पिके जगविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

टॅग्स :BeedबीडRainपाऊस