शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्ह्यात पावसाची ओढ; कडधान्याचा उतारा ४० टक्के येणार कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2019 00:35 IST

जिल्ह्यातील वरुणराजाचा कृपा झालेली नसल्यामुळे अजूनही दुष्काळ सदृष्य परिस्थीत कायम आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीला थोड्या प्रमाणात झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या.

ठळक मुद्देमूग, उडीद इतर कडधान्याचे क्षेत्र घटले : पुढील काळात पाऊस न पडल्यास कापूस, सोयाबीन पिकांना धोका

बीड : जिल्ह्यातील वरुणराजाचा कृपा झालेली नसल्यामुळे अजूनही दुष्काळ सदृष्य परिस्थीत कायम आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीला थोड्या प्रमाणात झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या. मात्र, पुढील काळात पावसाने ओढ दिल्यामुळे मुख्य पिक असलेल्या कापूस, सोयाबीनवर मोठ्याप्रमाणात परिणाम झाला आहे. त्याचसोबत मूग, उडीद व इतर कडधान्याच्या उत्पादनात घट होऊन उतारा कमी येणार असल्याचे चित्र आहे.खरीप हंगामात यावर्षी तुरळक पावसावर कापूस, सोयाबीन, बाजरी, तूर, मूग, उडीद यासह इतर पिकांचा पेरा शेतकऱ्यांनी केला होता. मागीलवर्षीच्या तुलनेत यावर्षी सोयबीन व कापूस या पिकांचा पेरा कमी झाला आहे. त्याचसोबत गतवर्षीच्यापेक्षा जवळपास ५ टक्के क्षेत्रावर खरीप पिकांचा पेरा कमी झाला आहे. जुलै ते आॅगस्ट महिन्याच्या कालावधीत तुरळक प्रमाणात पाऊस झाल्यामुळे काही पिकांना जिवनदान मिळाले आहे. मात्र, पुन्हा पावसाने उघडीप दिल्यामुळे पिकांवर परिणाम जाणवत आहे. सोयबीन फुलोºयात आहे मात्र, पाणी कमी पडत असल्यामुळे फुले गळून पडत आहेत. त्यामुळे शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.ऐकूण खरीप क्षेत्राच्या तुलनेत दरवर्षी जवळपास ६० हजार क्षेत्रावर कडधान्याचा पेरा केला जातो. या क्षेत्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात यावर्षी घट झाली आहे. तसेच कडधान्याची पिकं ही ६० दिवसांची असल्यामुळे आता फुले व काही ठिकाणी शेंगा भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. या कालावधीत पाण्याची आवश्यता आहे. मात्र, पाणी उपलब्ध नसल्यामुळे कडधान्यच्या उत्पादनात अंदाजे ४० टक्के घट येण्याची शक्यता कृषी विभागाच्या वतीने वर्तवण्यात येत आहे. तसेच पुढील काळात पावसाची अशीच परिस्थिती राहिली तर सर्वच पिकांच्या उपत्पादनात घट होणार असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. अशा परिस्थितीमध्ये देखील शेतकरी पिके जगविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

टॅग्स :BeedबीडRainपाऊस