शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

बीडमध्ये पंधरा दिवसांपासून पाऊस बेपत्ता; बळीराजाची चिंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 00:19 IST

यावर्षी पाऊसमान चांगले राहणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले होते. मात्र, जूनच्या तिसऱ्या आठवड्यापासून पावसाने ओढ दिल्यामुळे पेरण्या उरकलेला बळीराजा चिंतेत आहे तर अद्याप पेरण्या न केलेले शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत. जूनमध्ये जिल्ह्यात केवळ ३५ टक्के पेरण्या झाल्या असून, जोरदार पावसानंतरच चित्र बदलू शकेल, अशी स्थिती आहे.

बीड : यावर्षी पाऊसमान चांगले राहणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले होते. मात्र, जूनच्या तिसऱ्या आठवड्यापासून पावसाने ओढ दिल्यामुळे पेरण्या उरकलेला बळीराजा चिंतेत आहे तर अद्याप पेरण्या न केलेले शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत. जूनमध्ये जिल्ह्यात केवळ ३५ टक्के पेरण्या झाल्या असून, जोरदार पावसानंतरच चित्र बदलू शकेल, अशी स्थिती आहे.

जिल्ह्यात ३० जूनपर्यंत सरासरी १२९.२० मिमी पाऊस झाला आहे. सर्वात कमी गेवराई तालुक्यात ८४.४ मिमी तर सर्वात जास्त २४४.४ मिमी पाऊस अंबाजोगाई तालुक्यात बरसला आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी बºयापैकी पाऊस झाला. दुसºया आठवड्यात पेरणीयोग्य पावसामुळे शेतक-यांनी पेरण्या सुरु करण्यास लगबग सुरु केली. मात्र, १२ ते २० जूनदरम्यान पाऊस झाला नाही. त्यामुळे पेरण्यांची गती मंदावली. २१ जूननंतर एक-दोन चांगल्या पावसामुळे पेरण्यांनी वेग घेतला. परंतु मागील ९ दिवसांपासून पावसाने पुन्हा दडी मारली आहे.

पावसाच्या लहरीपणामुळे जिल्ह्यात जूनअखेरपर्यंत केवळ ३५ टक्केच पेरणी होऊ शकली. पेरणी केलेल्या शेतकºयांना आता पाऊस नसल्याने चिंता लागली आहे. कोवळी पिके करपण्याची भीती असून, पुरेशा ओलीअभावी पेरणी करु न शकलेल्या शेतकºयांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. सध्या मात्र आभाळ येतं अन् वारं सुटतं अशी स्थिती आहे. जिल्ह्यात खरिपाचे सरासरी क्षेत्र ६ लाख ५८ हजार २४० हेक्टर आहे. आतापर्यंत १ लाख ११ हजार ४९८ हेक्टरवर कपाशीची लागवड झाली आहे. यात सर्र्वाधिक पेरा गेवराई तालुक्यात झाला आहे.सोयाबीनची ५४ हजार ५८९ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली असून केज तालुक्यात सर्वाधिक पेरा झाला आहे.१२ हजार १४२ हेक्टर क्षेत्रात तुरीची पेरणी झाली असून परळी तालुक्यात सर्वाधिक पेरा झाला आहे.४ हजार ७२७ हेक्टर क्षेत्रात मुगाची व ३६८० हेक्टरात पेरणी झाली असून दोन्ही पिकांचा सर्वात जास्त पेरा आष्टी तालुक्यात झाला आहे.

सोयाबीन बियाणांचा बाजारात तुटवडामागील वर्षी कृषी व्यापा-यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन बियाणे विक्रीसाठी आणले होते. परंतु, बहुतांश शेतक-यांनी घरचे सोयाबीन पेरले. त्यामुळे व्यापा-यांकडे शिल्लक माल राहिला. शेतकरी घरचे बियाणे पेरतात म्हणून यंदा व्यापा-यांनी सोयाबीन बियाणे प्रमाणात आणले. परंतु यंदा क्षेत्र तसेच बाजारात मागणी वाढल्याने सोयाबीनचा तुटवडा निर्माण झाला. प्रमाणित किंमतीपेक्षा कमी दरात मिळणारी ३० किलो बियाणांची बॅग प्रमाणित किंमतीत, तर काही व्यापाºयांनी संधीचा फायदा उचलत जादा रक्कम उकळली.

सोयाबीनला जास्त पावसाची आवश्यकता असते. मात्र पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी अस्वस्थ झाले आहेत. तर ज्यांनी अद्याप पेरण्या केल्या नाही अशा शेतकºयांनी चांगला पाऊस झाल्यानंतरच सोयाबीनची पेरणी करावी, असा सल्ला कृषी क्षेत्रातील जाणकारांनी दिला आहे.

टॅग्स :Beedबीडmonsoon 2018मान्सून 2018FarmerशेतकरीMarathwadaमराठवाडा