शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

बीडमध्ये पंधरा दिवसांपासून पाऊस बेपत्ता; बळीराजाची चिंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 00:19 IST

यावर्षी पाऊसमान चांगले राहणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले होते. मात्र, जूनच्या तिसऱ्या आठवड्यापासून पावसाने ओढ दिल्यामुळे पेरण्या उरकलेला बळीराजा चिंतेत आहे तर अद्याप पेरण्या न केलेले शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत. जूनमध्ये जिल्ह्यात केवळ ३५ टक्के पेरण्या झाल्या असून, जोरदार पावसानंतरच चित्र बदलू शकेल, अशी स्थिती आहे.

बीड : यावर्षी पाऊसमान चांगले राहणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले होते. मात्र, जूनच्या तिसऱ्या आठवड्यापासून पावसाने ओढ दिल्यामुळे पेरण्या उरकलेला बळीराजा चिंतेत आहे तर अद्याप पेरण्या न केलेले शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत. जूनमध्ये जिल्ह्यात केवळ ३५ टक्के पेरण्या झाल्या असून, जोरदार पावसानंतरच चित्र बदलू शकेल, अशी स्थिती आहे.

जिल्ह्यात ३० जूनपर्यंत सरासरी १२९.२० मिमी पाऊस झाला आहे. सर्वात कमी गेवराई तालुक्यात ८४.४ मिमी तर सर्वात जास्त २४४.४ मिमी पाऊस अंबाजोगाई तालुक्यात बरसला आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी बºयापैकी पाऊस झाला. दुसºया आठवड्यात पेरणीयोग्य पावसामुळे शेतक-यांनी पेरण्या सुरु करण्यास लगबग सुरु केली. मात्र, १२ ते २० जूनदरम्यान पाऊस झाला नाही. त्यामुळे पेरण्यांची गती मंदावली. २१ जूननंतर एक-दोन चांगल्या पावसामुळे पेरण्यांनी वेग घेतला. परंतु मागील ९ दिवसांपासून पावसाने पुन्हा दडी मारली आहे.

पावसाच्या लहरीपणामुळे जिल्ह्यात जूनअखेरपर्यंत केवळ ३५ टक्केच पेरणी होऊ शकली. पेरणी केलेल्या शेतकºयांना आता पाऊस नसल्याने चिंता लागली आहे. कोवळी पिके करपण्याची भीती असून, पुरेशा ओलीअभावी पेरणी करु न शकलेल्या शेतकºयांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. सध्या मात्र आभाळ येतं अन् वारं सुटतं अशी स्थिती आहे. जिल्ह्यात खरिपाचे सरासरी क्षेत्र ६ लाख ५८ हजार २४० हेक्टर आहे. आतापर्यंत १ लाख ११ हजार ४९८ हेक्टरवर कपाशीची लागवड झाली आहे. यात सर्र्वाधिक पेरा गेवराई तालुक्यात झाला आहे.सोयाबीनची ५४ हजार ५८९ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली असून केज तालुक्यात सर्वाधिक पेरा झाला आहे.१२ हजार १४२ हेक्टर क्षेत्रात तुरीची पेरणी झाली असून परळी तालुक्यात सर्वाधिक पेरा झाला आहे.४ हजार ७२७ हेक्टर क्षेत्रात मुगाची व ३६८० हेक्टरात पेरणी झाली असून दोन्ही पिकांचा सर्वात जास्त पेरा आष्टी तालुक्यात झाला आहे.

सोयाबीन बियाणांचा बाजारात तुटवडामागील वर्षी कृषी व्यापा-यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन बियाणे विक्रीसाठी आणले होते. परंतु, बहुतांश शेतक-यांनी घरचे सोयाबीन पेरले. त्यामुळे व्यापा-यांकडे शिल्लक माल राहिला. शेतकरी घरचे बियाणे पेरतात म्हणून यंदा व्यापा-यांनी सोयाबीन बियाणे प्रमाणात आणले. परंतु यंदा क्षेत्र तसेच बाजारात मागणी वाढल्याने सोयाबीनचा तुटवडा निर्माण झाला. प्रमाणित किंमतीपेक्षा कमी दरात मिळणारी ३० किलो बियाणांची बॅग प्रमाणित किंमतीत, तर काही व्यापाºयांनी संधीचा फायदा उचलत जादा रक्कम उकळली.

सोयाबीनला जास्त पावसाची आवश्यकता असते. मात्र पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी अस्वस्थ झाले आहेत. तर ज्यांनी अद्याप पेरण्या केल्या नाही अशा शेतकºयांनी चांगला पाऊस झाल्यानंतरच सोयाबीनची पेरणी करावी, असा सल्ला कृषी क्षेत्रातील जाणकारांनी दिला आहे.

टॅग्स :Beedबीडmonsoon 2018मान्सून 2018FarmerशेतकरीMarathwadaमराठवाडा