शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

बीडमध्ये पंधरा दिवसांपासून पाऊस बेपत्ता; बळीराजाची चिंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 00:19 IST

यावर्षी पाऊसमान चांगले राहणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले होते. मात्र, जूनच्या तिसऱ्या आठवड्यापासून पावसाने ओढ दिल्यामुळे पेरण्या उरकलेला बळीराजा चिंतेत आहे तर अद्याप पेरण्या न केलेले शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत. जूनमध्ये जिल्ह्यात केवळ ३५ टक्के पेरण्या झाल्या असून, जोरदार पावसानंतरच चित्र बदलू शकेल, अशी स्थिती आहे.

बीड : यावर्षी पाऊसमान चांगले राहणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले होते. मात्र, जूनच्या तिसऱ्या आठवड्यापासून पावसाने ओढ दिल्यामुळे पेरण्या उरकलेला बळीराजा चिंतेत आहे तर अद्याप पेरण्या न केलेले शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत. जूनमध्ये जिल्ह्यात केवळ ३५ टक्के पेरण्या झाल्या असून, जोरदार पावसानंतरच चित्र बदलू शकेल, अशी स्थिती आहे.

जिल्ह्यात ३० जूनपर्यंत सरासरी १२९.२० मिमी पाऊस झाला आहे. सर्वात कमी गेवराई तालुक्यात ८४.४ मिमी तर सर्वात जास्त २४४.४ मिमी पाऊस अंबाजोगाई तालुक्यात बरसला आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी बºयापैकी पाऊस झाला. दुसºया आठवड्यात पेरणीयोग्य पावसामुळे शेतक-यांनी पेरण्या सुरु करण्यास लगबग सुरु केली. मात्र, १२ ते २० जूनदरम्यान पाऊस झाला नाही. त्यामुळे पेरण्यांची गती मंदावली. २१ जूननंतर एक-दोन चांगल्या पावसामुळे पेरण्यांनी वेग घेतला. परंतु मागील ९ दिवसांपासून पावसाने पुन्हा दडी मारली आहे.

पावसाच्या लहरीपणामुळे जिल्ह्यात जूनअखेरपर्यंत केवळ ३५ टक्केच पेरणी होऊ शकली. पेरणी केलेल्या शेतकºयांना आता पाऊस नसल्याने चिंता लागली आहे. कोवळी पिके करपण्याची भीती असून, पुरेशा ओलीअभावी पेरणी करु न शकलेल्या शेतकºयांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. सध्या मात्र आभाळ येतं अन् वारं सुटतं अशी स्थिती आहे. जिल्ह्यात खरिपाचे सरासरी क्षेत्र ६ लाख ५८ हजार २४० हेक्टर आहे. आतापर्यंत १ लाख ११ हजार ४९८ हेक्टरवर कपाशीची लागवड झाली आहे. यात सर्र्वाधिक पेरा गेवराई तालुक्यात झाला आहे.सोयाबीनची ५४ हजार ५८९ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली असून केज तालुक्यात सर्वाधिक पेरा झाला आहे.१२ हजार १४२ हेक्टर क्षेत्रात तुरीची पेरणी झाली असून परळी तालुक्यात सर्वाधिक पेरा झाला आहे.४ हजार ७२७ हेक्टर क्षेत्रात मुगाची व ३६८० हेक्टरात पेरणी झाली असून दोन्ही पिकांचा सर्वात जास्त पेरा आष्टी तालुक्यात झाला आहे.

सोयाबीन बियाणांचा बाजारात तुटवडामागील वर्षी कृषी व्यापा-यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन बियाणे विक्रीसाठी आणले होते. परंतु, बहुतांश शेतक-यांनी घरचे सोयाबीन पेरले. त्यामुळे व्यापा-यांकडे शिल्लक माल राहिला. शेतकरी घरचे बियाणे पेरतात म्हणून यंदा व्यापा-यांनी सोयाबीन बियाणे प्रमाणात आणले. परंतु यंदा क्षेत्र तसेच बाजारात मागणी वाढल्याने सोयाबीनचा तुटवडा निर्माण झाला. प्रमाणित किंमतीपेक्षा कमी दरात मिळणारी ३० किलो बियाणांची बॅग प्रमाणित किंमतीत, तर काही व्यापाºयांनी संधीचा फायदा उचलत जादा रक्कम उकळली.

सोयाबीनला जास्त पावसाची आवश्यकता असते. मात्र पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी अस्वस्थ झाले आहेत. तर ज्यांनी अद्याप पेरण्या केल्या नाही अशा शेतकºयांनी चांगला पाऊस झाल्यानंतरच सोयाबीनची पेरणी करावी, असा सल्ला कृषी क्षेत्रातील जाणकारांनी दिला आहे.

टॅग्स :Beedबीडmonsoon 2018मान्सून 2018FarmerशेतकरीMarathwadaमराठवाडा