शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अवकाळीने रबीचा घास हिरावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 23:31 IST

मागील दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये रबी पिकांसह फळबागांना फटका बला आहे.

ठळक मुद्देबीड जिल्ह्यात पिकांचे नुकसान : ज्वारीसह गहू, हरभरा झोपले; फळबागांनाही फटका; तात्काळ पंचनामे करण्याची मागणी

बीड : मागील दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये रबी पिकांसह फळबागांना फटका बला आहे.धारूर तालुक्यात दोन दिवस अवकाळीधारूर : शहर व तालूक्यात दोन दिवसा पासून अवकाळी व काही ठिकाणी गारांचा पाऊस झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रबी पिकाचा विमा कुठल्याच कंपनीने न स्विकारल्याने शेतकरी या नुकसानीने दुहेरी संकटात सापडला आहे. शासनाने नुकसान भरपाई पंचनामे करून तात्काळ द्यावे अशी मागणी शेतकरी विनायक शिनगारे, भागवत शिनगारे आदींनी केली आहे.बर्दापूर परिसरात हरभ-याचे काढ भिजलेबर्दापूर : अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर व परिसरात जोराचा वारा व अवकाळी पाऊस झाल्याने शेतातील हरभ-याचे काढ भिजले. जोराच्या वा-यामुळे ज्वारी व मक्याचे पीक आडवे झाले आहे. गव्हाचेही नुकसान झाले.आष्टीत फळबागांचे नुकसानअंभोरा : रविवारी दुपारी तीन वाजता अंभोरा सोवडगाव दौलावडगाव, बांदखेल परिसरात जोरदार वा-यासह पाऊस आला. वादळ वाºयामुळे संत्री पिकाचे अतोनात नुकसान झाले. पंचनाम्याची मागणी दौलावडगाव गटाचे माजी जि.प.सदस्य सुखदेव खाकाळ यांनी केली आहे.शेतक-याला अवकाळीची धास्तीशिरूर कासार : आधीच मजुरांची वाणवा त्यात पुन्हा शनिवारपासून आभाळाने त्याचा रंग दाखवायला सुरुवात केली आहे. पावसासोबत रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावाने ज्वारीचे कणीस सोपटले गेले आहे, तर कडबा काळा पडला आहे. ज्वारी काढताना पाण्यामुळे अंगाला खाज येत आहे.बंगाली पिंपळा, कोळगावात वीज कोसळलीगेवराई : तालुक्यातील बंगालीपिंपळा येथे रविवारी ५ वाजता वीज कोसळून येथील शेतकरी बबन देवराव खताळ यांची म्हैस जागीच ठार झाली आहे. त्यामुळे त्यांचे ८० हजार रुपयाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. नुकसान भरपाई देण्याची मागणी बबन देवराव खताळ यांनी केली आहे. तसेच तालुक्यातील कोळगाव येथे रविवारी सायंकाळी मंदिराच्या कळसावर वीज पडल्यामुळे तडे गेले आहेत. कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती बबन महाराज लोंढे, जयदत्त बनसोडे यांनी दिली.अंबाजोगाईतही नुकसानअंबाजोगाई : तालुक्यात शनिवारी रात्री व रविवारी दुपारी वादळी पाऊस मोठया प्रमाणात झाला. अवकाळी पावसामुळे ज्वारीचे पीक आडवे झाले आहे. तर हभºयाचे ढिगारे भिजून विस्कटले.मेघ गर्जनेसह सिरसाळ्यात पाऊससिरसाळा: परळी तालुक्यातील सिरसाळा येथे सोसाट्याचा वारा व मेघ गर्जनेसह रविवारी दुपारी ३ वाजता अवकाळी पावसाने तासभर हजेरी लावली. ज्वारी, हरभरा, गहू या पिकांचे नुकसान झाले. येथील मुख्य व्यवसाय असणा-या वीटभट्टी चालकांच्या कच्च्या मालाचे मोठे नुकसान झाले.येवता परिसरात गारांसह जोराचा पाऊस झाला. यामुळे ज्वारी, गव्हाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. उजनी (ता. अंबाजोगाई) परिसरात पावसाने रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले. बनसारोळा, घाटनांदूर, आडस परिसरात जोरदार, तर लोखंडी सावरगाव येथे रिमझिम पाऊस झाला. पिंपरी घाटा परिसरात वादळी वा-यासह झालेल्या पाऊसामुळे डाळींब, संत्रा इत्यादी बागांचे तसेच, काढणीला आलेल्या गहू, हरभरा, ज्वारी, कांदा इत्यादी पिकांचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :BeedबीडRainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्र