शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

माजलगावात आठवडी बाजाराच्या जागेचा प्रश्न अधांतरीच; नेत्यांना पडला आश्वासनांचा विसर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 14:43 IST

शहरातील आठवडी बाजाराच्या जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. नगर परिषदेच्या निवडणुकीतही हा मुद्दा गाजला होता. मात्र आता या प्रश्नाचा सर्वच नेत्यांना  विसर पडल्याची स्थिती आहे. यामुळे आठवडी बाजारासाठी येणारे शेतकरी, व्यापारी व शहरवासियांना मोठा त्रास होत असून याचा थेट परिणाम शहराच्या बाजार पेठेवर होत आहे.

-  पुरूषोत्तम करवा

माजलगाव  (बीड ) : शहरातील आठवडी बाजाराच्या जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. नगर परिषदेच्या निवडणुकीतही हा मुद्दा गाजला होता. मात्र आता या प्रश्नाचा सर्वच नेत्यांना  विसर पडल्याची स्थिती आहे. यामुळे आठवडी बाजारासाठी येणारे शेतकरी, व्यापारी व शहरवासियांना मोठा त्रास होत असून याचा थेट परिणाम शहराच्या बाजार पेठेवर होत आहे.

शहरात तीस वर्षांपूर्वी हनुमान चौक भागात आठवडी बाजार भरत असे. वाढती नागरी वस्ती व अपुरी जागा यामुळे हा आठवडी बाजार काही राजकीय मंडळींनी गजानन मंदिर रोडवर हलवला. मात्र, या भागातील नागरिकांना बाजाराचा मोठा त्रास होत असल्यामुळे त्यांनी बाजार येथून हलविण्याची नगर पालिकेस विनंती केली. पालिकेने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे शेवटी सामाजिक कार्यकर्ते जगदीश साखरे यांनी या विरुद्ध न्यायालयात दाद मागितली असता न्यायालयाने या भागात बाजार भरवू नये असे आदेश दिले. यानंतर मनूर रोड व तेथून बीअँडसी रोड असा बाजाराच्या जागेचा प्रवास झाला आहे. 

बाजार निवडणुकीचा विषय आठवडी बाजाराच्या प्रश्नावर मागील दहा ते पंधरा वर्षांपासून नगर पालिका निवडणूक लढल्या जात आहेत. मात्र निवडणूक संपताच हा विषय थंड बसत्यात जातो. विधानसभा निवडणुकीत आमदार आर. टी. देशमुख यांनी हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. तसेच दीड वर्षापूर्वी पालिका निवडणुकीत देखील विविध राजकीय पक्षांनी या प्रश्नाचे भांडवल केले. मात्र अद्याप कोणीही हा प्रश्न सोडविला नाही. 

अर्धा बाजार झाला स्थलांतरित जागेचा प्रश्न सुटत नसल्याने सध्याच्या ठिकाणी निम्मा देखील बाजार भरत नाही. यामुळे अर्धा बाजार तर केसापुरी कॅम्प येथे स्थलांतरित झाला आहे. याचा परिणाम शहराच्या बाजार पेठेवर झाला आहे. आजूबाजूच्या जवळपास 50 खेड्यातील नागरिक बाजारामुळे शहराच्या संपर्कात होते त्यांचे शहरात येणे आता कमी झाले आहे. यामुळे बाजारपेठ बकाल पडत आहे.

जनविकास आघाडीला पडला विसरबाजाराच्या जागेच्या प्रश्नावरून निवडणुकी आधी मोहन दादा जगताप मित्रमंडळाने आंदोलने केली. यानंतर त्यांनी जनविकास आघाडीतून निवडणूक लढवली. बाजार प्रश्नावरील आंदोलनाचा यात त्यांना फायदा झाला व ते सत्तेत आले. मात्र आता त्यानाही या प्रश्नाचा विसर पडला आहे.

जागेचा शोध सुरु आहे शहरातील बाजारासाठी कायमस्वरूपी जागेचा शोध घेतला  जात आहे. लवकरच जागा उपलब्ध होईल.- सहाल चाऊस, अध्यक्ष, नगर परिषद

टॅग्स :vegetableभाज्याBeedबीड