शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
3
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
4
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
5
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
6
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
7
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
8
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
9
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
10
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
11
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
12
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
13
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
14
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
15
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
16
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
17
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
18
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
19
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
20
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!

बीड जिल्ह्याला ३३ लाख २२ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 23:28 IST

शतकोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत राज्यात १३ कोटी झाडे लावण्यात येणार आहेत. शासकीय कार्यालय, ग्रामपंचायतींसह सरकारी यंत्रणांना यात सहभागी करुन वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. बीड जिल्ह्यासाठी ३३ लाख २२ हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. हे आव्हान यंत्रणा कितपत पेलतात, याकडे लक्ष लागले आहे.

प्रभात बुडूख ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शतकोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत राज्यात १३ कोटी झाडे लावण्यात येणार आहेत. शासकीय कार्यालय, ग्रामपंचायतींसह सरकारी यंत्रणांना यात सहभागी करुन वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. बीड जिल्ह्यासाठी ३३ लाख २२ हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. हे आव्हान यंत्रणा कितपत पेलतात, याकडे लक्ष लागले आहे.

उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी वन विभाग आणि सामाजिक वनीकरण तसेच इतर शासकीय कार्यालयातील प्रमुखांची आढावा बैठक नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. येत्या ५ जून रोजी स्वत: वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्ह्यातील प्रमुख शासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. तसेच यावेळी उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात याविषयी मुनगंटीवार सूचना करणार आहेत.

वृक्ष लागवडीसाठी प्रशासनामधील ३० विभाग सहभागी होणार आहेत. यामध्ये वन विभाग, सामाजिक वनीकरण, कृषी, शिक्षण, आरोग्य, नगरपालिका, पंचायतमिती, तसेच जिल्ह्यातील १०३१ ग्रामपंचायती सहभागी होणार आहेत. जिल्ह्यात ३३ लाख २२ हजार वृक्ष लागवडीसाठी ५० हजार ६०० स्थळं निश्चित करण्यात आली आहेत. तसेच वृक्षरोपणासाठी २८ लाख ९१ हजार खड्डे वन विभागाकडून खोदण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या पावसाळ्यात वृक्ष लागवडीचे काम गतीने होईल अशी अपेक्षा वन अधिकाºयांनी व्यक्त केली.मागील वर्षात किती वृक्ष जगले ?शासनाने ५० कोटी वृक्ष लागवडीचे ध्येय ठेवले आहे. गेल्यावर्षी ४ कोटी वृक्ष लागवड झाली. यामध्ये बीड जिल्ह्यासाठी १२ लाख ८२ हजार उद्दिष्ट देण्यात आले होते. पैकी किती वृक्ष जगले हा प्रश्न मात्र कायम आहे. वन विभाग व सामाजिक वनीकरण तसेच इतर शासकीय कार्यालयांनी केलेल्या वृक्ष लागवडीमध्ये किती वृक्ष जगले याची अधिकृत माहिती समोर येत नाही.

राजकीय हस्तक्षेप वाढलावन विभाग व सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून बोगस कामे करण्यासाठी प्रशासकीय अधिकाºयांवर दबावतंत्राचा वापर काही राजकीय नेत्यांकडून केला जात आहे. हा गैरप्रकार रोखला तर वनविभागाची कामे मोठ्या प्रमाणात करता येतील, व जिल्हा हिरवागार होण्यास मदत होईल अशी प्रतिक्रिया एका प्रशासकीय अधिका-याने दिली.

सामाजिक वनीकरण विभागात सावळा गोंधळजिल्ह्यात सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून झालेल्या वृक्ष लागवडीत अनेक ठिकाणी बोगस वृक्ष लागवड केल्याचे समोर आले होते. ही बोगस कामे करण्यामागे काही राजकीय नेते असल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी योग्य चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

वृक्ष लागवडीची तयारी पूर्णलागवड केलेली झाडे जगवणे हे वन विभागापुढे एक आव्हान असते. झाडे का जगत नाहीत याविषयी आम्ही अभ्यास केला. त्यावेळी लक्षात आले की झाडे लावताना त्याची उंची किमान ४ फूट असावी त्यामुळे ते झाड अधिक चांगल्या प्रकारे वाढते. अधिक प्रमाणात झाडे जगवण्यासाठी यावर्षीची वृक्ष लागवड करताना हा प्रयोग केला जाणार आहे. ३३ लाख वृक्ष लागवडीची तयारी पूर्ण झाली आहे.- अमोल सातपुते, विभागीय वन अधिकारी

टॅग्स :BeedबीडforestजंगलMarathwadaमराठवाडा