शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या अंदाजावर शेतकऱ्यांची बियाणे खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 00:26 IST

जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक पाऊस पडला आहे. त्यामुळे खरीप मशागत करण्यात शेतकरी व्यस्त आहे. मात्र, अजूनही पावसाचा अंदाज येत नसल्यामुळे पुर्वीप्रमाणे अगाऊ बियाणे व खते खरदी करण्यासाठी शेतकरी धजावत नसल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देदुष्काळामुळे आर्थिक घडी बिघडली : कृषी सेवा केंद्रावरील विक्री पावसावर अवलंबून

बीड : जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक पाऊस पडला आहे. त्यामुळे खरीप मशागत करण्यात शेतकरी व्यस्त आहे. मात्र, अजूनही पावसाचा अंदाज येत नसल्यामुळे पुर्वीप्रमाणे अगाऊ बियाणे व खते खरदी करण्यासाठी शेतकरी धजावत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पावसाच्या अंदाज घेऊन शेतकरी बियाणांची खरेदी करत आहेत.खरीप हंगामात कापूस, सोयाबीन, तूर, मुग, उडीद यासह इतर पिकांचा पेरा केला जातो. दरवर्षी ७ ते १५ जूनर्पंयत पाऊस पडल्यानंतर शेतकरी पेरणी करतात. मात्र, मागील दोन वर्षात पावसाचे घटलेले प्रमाण व न येणा-या अंदाजामुळे हंगामा पुर्वीची १५ ते २० दिवस आधी जी बीयाणांची व खतांची खरेदी केली जात होती. ती करण्याचे धाडस शेतकऱ्यांमधून केले जात नाही. दरवर्षी पावसाचा अंदाज घेऊन ‘मे’ महिन्याच्या शेवटी शेतकरी बियाणे व खतांची खरेदी करत असतात. मात्र,आजपर्यंत ५ टक्के शेतक-यांनी देखील खरेदी केलेली नाही. विविध पिकांचे बियाणे व खतांची मागणीप्रमाणे आवक जिल्ह्यात झाली आहे. त्यामुळे तुटवडा जाणवणार नाही. मात्र, लागवडीपुर्वी जी खरेदी केली जात होती ती करण्याचे धाडस शेतकरी करत नसल्यामुळे बीयणे व खतांच्या बाजारपेठेत गर्दी दिसून येत नाही. मात्र, यावर्षी चांगल्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्यामुळे बाजारामधील उलाढाल वाढेल अशी आशा बीड मोढा भागातील कृषी सेवा कंद्र चालकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :BeedबीडRainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्र