शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

पावसाच्या अंदाजावर शेतकऱ्यांची बियाणे खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 00:26 IST

जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक पाऊस पडला आहे. त्यामुळे खरीप मशागत करण्यात शेतकरी व्यस्त आहे. मात्र, अजूनही पावसाचा अंदाज येत नसल्यामुळे पुर्वीप्रमाणे अगाऊ बियाणे व खते खरदी करण्यासाठी शेतकरी धजावत नसल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देदुष्काळामुळे आर्थिक घडी बिघडली : कृषी सेवा केंद्रावरील विक्री पावसावर अवलंबून

बीड : जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक पाऊस पडला आहे. त्यामुळे खरीप मशागत करण्यात शेतकरी व्यस्त आहे. मात्र, अजूनही पावसाचा अंदाज येत नसल्यामुळे पुर्वीप्रमाणे अगाऊ बियाणे व खते खरदी करण्यासाठी शेतकरी धजावत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पावसाच्या अंदाज घेऊन शेतकरी बियाणांची खरेदी करत आहेत.खरीप हंगामात कापूस, सोयाबीन, तूर, मुग, उडीद यासह इतर पिकांचा पेरा केला जातो. दरवर्षी ७ ते १५ जूनर्पंयत पाऊस पडल्यानंतर शेतकरी पेरणी करतात. मात्र, मागील दोन वर्षात पावसाचे घटलेले प्रमाण व न येणा-या अंदाजामुळे हंगामा पुर्वीची १५ ते २० दिवस आधी जी बीयाणांची व खतांची खरेदी केली जात होती. ती करण्याचे धाडस शेतकऱ्यांमधून केले जात नाही. दरवर्षी पावसाचा अंदाज घेऊन ‘मे’ महिन्याच्या शेवटी शेतकरी बियाणे व खतांची खरेदी करत असतात. मात्र,आजपर्यंत ५ टक्के शेतक-यांनी देखील खरेदी केलेली नाही. विविध पिकांचे बियाणे व खतांची मागणीप्रमाणे आवक जिल्ह्यात झाली आहे. त्यामुळे तुटवडा जाणवणार नाही. मात्र, लागवडीपुर्वी जी खरेदी केली जात होती ती करण्याचे धाडस शेतकरी करत नसल्यामुळे बीयणे व खतांच्या बाजारपेठेत गर्दी दिसून येत नाही. मात्र, यावर्षी चांगल्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्यामुळे बाजारामधील उलाढाल वाढेल अशी आशा बीड मोढा भागातील कृषी सेवा कंद्र चालकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :BeedबीडRainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्र