शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
2
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
3
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
4
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
5
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
6
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
7
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
8
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
9
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
10
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
11
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
12
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
13
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
14
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
15
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
16
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
17
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
18
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
19
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
20
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
Daily Top 2Weekly Top 5

देहाचे रक्षण जनकल्याणासाठी करा- शंकराचार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 23:57 IST

जनकल्याणाचे तत्व आणि धर्म कार्य करण्यासाठी या देहाचे रक्षण करा तरच आनंद, सुख व समाधान प्राप्त होईल, असा उपदेश दक्षिणाम्नाय शारदापीठ श्रृंगेरी पीठ (कर्नाटक) जगद्गुरू शंकराचार्य श्रीविधुशेखर भारती स्वामीजी यांनी बीड येथे रविवारी गुरुवंदना कार्यक्रमप्रसंगी दिला.

बीड : प्रत्येक मनुष्य जगण्यासाठी शिक्षण घेतो, नौकरी करतो, पैसा कमावतो आणि उदरनिर्वाह करीत सुख उपभोगतो. हे सर्व करण्यासाठी देह हे सर्वात महत्त्वाचे माध्यम आहे. त्या देहाचे रक्षण आपण करतो. पण हे पुरेसे आहे आहे का? असा प्रश्न उपस्थित करत केवळ सुख उपभोगण्यासाठी देहाचे रक्षण पुरेसे नाहीतर जनकल्याणाचे तत्व आणि धर्म कार्य करण्यासाठी या देहाचे रक्षण करा तरच आनंद, सुख व समाधान प्राप्त होईल, असा उपदेश दक्षिणाम्नाय शारदापीठ श्रृंगेरी पीठ (कर्नाटक) जगद्गुरू शंकराचार्य श्रीविधुशेखर भारती स्वामीजी यांनी बीड येथे रविवारी गुरुवंदना कार्यक्रमप्रसंगी दिला.यावेळी श्रीविधुशेखर भारती स्वामीजी म्हणाले, मानवाचे शरीर हे उसासारखे आहे. साखरेची मधूर चव आपल्यापर्यंत पोहचण्यासाठी उसाला चरकातून जावं लागतं, रस काढावा लागतो त्यासाठी त्याला अनंत कष्ट भोगावे लागतात तेव्हा आपल्या साखरेची मधूर चव चाखायला मिळते. त्याचप्रमाणे शरीराला देखील कष्ट देऊन धर्मकार्य, पुण्यकर्म करण्याचे अनुष्ठान करण्यासाठी आपली शक्ती आणि सामर्थ्य असले पाहिजे, असे ते म्हणाले. वय झाल्यानंतर नव्हेतर शरीर स्वस्थ असताना धर्मसाधना करा, चांगले तत्व, विचाराने ज्ञान प्राप्त करा तरच आपले अज्ञान दूर होईल. देहाची शक्ती कमी झाल्यावर धर्मकार्य करून काही उपयोग होणार, नाही असा संदेश त्यांनी युवा पिढीला दिला. हे माझे, ते माझे असे मनुष्य म्हणत असतो पण हे सत्य नसून शाश्वत केवळ परमात्मा असल्याचे ते म्हणाले.प्रारंभ संयोजन समितीचे अ‍ॅड. कालिदास थिगळे, वे.शा.सं.धुंडीराज शास्त्री पाटांगणकर, ह.भ.प.भरतबुवा रामदासी, वे.शा.सं. अमोलशास्त्री जोशी, डॉ. दिलीपराव देशमुख, सतीश पत्की, दिलीप खिस्ती, दुर्गादास गुरुजोशी, एकनाथ महाराज पुजारी, प्रमोद पुसरेकर, संजय गुळजकर, विनायक पटांगणकर, वाय. जनार्दन राव यांच्या हस्ते स्वामीजींचे स्वागत ऋणपत्र देऊन करण्यात आले.यशस्वीतेसाठी अनिल कुलकर्णी, दीपक कुलकर्णी, अक्षय भालेराव, विष्णुदास बियाणी, सचिन कुलकर्णी, दीपक सर्वज्ञ, बाळासाहेब रुईकर, उदय जोशी, अलोक कुलकर्णी, प्रशांत आंबेकर, प्रसाद राजेंद्र, सौरभ जोशी, ओंकार पाठक, रोहित कुलकर्णी आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन व वेद मंत्रपठण अनंतशास्त्री मुळे, सूर्यकांत मुळे, गोविंद महाराज जाटदेवलेकर, दुर्गादास जोशी यांनी केले तर आभार दिलीप खिस्ती यांनी मानले. कार्यक्रमात बहुसंख्येने नागरिक सहभागी झाले होते.

टॅग्स :BeedबीडReligious programmeधार्मिक कार्यक्रम