शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

देहाचे रक्षण जनकल्याणासाठी करा- शंकराचार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 23:57 IST

जनकल्याणाचे तत्व आणि धर्म कार्य करण्यासाठी या देहाचे रक्षण करा तरच आनंद, सुख व समाधान प्राप्त होईल, असा उपदेश दक्षिणाम्नाय शारदापीठ श्रृंगेरी पीठ (कर्नाटक) जगद्गुरू शंकराचार्य श्रीविधुशेखर भारती स्वामीजी यांनी बीड येथे रविवारी गुरुवंदना कार्यक्रमप्रसंगी दिला.

बीड : प्रत्येक मनुष्य जगण्यासाठी शिक्षण घेतो, नौकरी करतो, पैसा कमावतो आणि उदरनिर्वाह करीत सुख उपभोगतो. हे सर्व करण्यासाठी देह हे सर्वात महत्त्वाचे माध्यम आहे. त्या देहाचे रक्षण आपण करतो. पण हे पुरेसे आहे आहे का? असा प्रश्न उपस्थित करत केवळ सुख उपभोगण्यासाठी देहाचे रक्षण पुरेसे नाहीतर जनकल्याणाचे तत्व आणि धर्म कार्य करण्यासाठी या देहाचे रक्षण करा तरच आनंद, सुख व समाधान प्राप्त होईल, असा उपदेश दक्षिणाम्नाय शारदापीठ श्रृंगेरी पीठ (कर्नाटक) जगद्गुरू शंकराचार्य श्रीविधुशेखर भारती स्वामीजी यांनी बीड येथे रविवारी गुरुवंदना कार्यक्रमप्रसंगी दिला.यावेळी श्रीविधुशेखर भारती स्वामीजी म्हणाले, मानवाचे शरीर हे उसासारखे आहे. साखरेची मधूर चव आपल्यापर्यंत पोहचण्यासाठी उसाला चरकातून जावं लागतं, रस काढावा लागतो त्यासाठी त्याला अनंत कष्ट भोगावे लागतात तेव्हा आपल्या साखरेची मधूर चव चाखायला मिळते. त्याचप्रमाणे शरीराला देखील कष्ट देऊन धर्मकार्य, पुण्यकर्म करण्याचे अनुष्ठान करण्यासाठी आपली शक्ती आणि सामर्थ्य असले पाहिजे, असे ते म्हणाले. वय झाल्यानंतर नव्हेतर शरीर स्वस्थ असताना धर्मसाधना करा, चांगले तत्व, विचाराने ज्ञान प्राप्त करा तरच आपले अज्ञान दूर होईल. देहाची शक्ती कमी झाल्यावर धर्मकार्य करून काही उपयोग होणार, नाही असा संदेश त्यांनी युवा पिढीला दिला. हे माझे, ते माझे असे मनुष्य म्हणत असतो पण हे सत्य नसून शाश्वत केवळ परमात्मा असल्याचे ते म्हणाले.प्रारंभ संयोजन समितीचे अ‍ॅड. कालिदास थिगळे, वे.शा.सं.धुंडीराज शास्त्री पाटांगणकर, ह.भ.प.भरतबुवा रामदासी, वे.शा.सं. अमोलशास्त्री जोशी, डॉ. दिलीपराव देशमुख, सतीश पत्की, दिलीप खिस्ती, दुर्गादास गुरुजोशी, एकनाथ महाराज पुजारी, प्रमोद पुसरेकर, संजय गुळजकर, विनायक पटांगणकर, वाय. जनार्दन राव यांच्या हस्ते स्वामीजींचे स्वागत ऋणपत्र देऊन करण्यात आले.यशस्वीतेसाठी अनिल कुलकर्णी, दीपक कुलकर्णी, अक्षय भालेराव, विष्णुदास बियाणी, सचिन कुलकर्णी, दीपक सर्वज्ञ, बाळासाहेब रुईकर, उदय जोशी, अलोक कुलकर्णी, प्रशांत आंबेकर, प्रसाद राजेंद्र, सौरभ जोशी, ओंकार पाठक, रोहित कुलकर्णी आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन व वेद मंत्रपठण अनंतशास्त्री मुळे, सूर्यकांत मुळे, गोविंद महाराज जाटदेवलेकर, दुर्गादास जोशी यांनी केले तर आभार दिलीप खिस्ती यांनी मानले. कार्यक्रमात बहुसंख्येने नागरिक सहभागी झाले होते.

टॅग्स :BeedबीडReligious programmeधार्मिक कार्यक्रम