शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

प्रीतम मुंडे यांनी केली शेतातील पिकांची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 23:44 IST

बीड : परतीच्या पावसाने महाराष्ट्रासह बीड जिल्ह्यात तीन आठवड्यासापूसन थैमान घातले आहे. तीन वर्षांपासून दुष्काळात होरपळणाºया शेतक-यांचा पाण्याचा प्रश्न ...

ठळक मुद्देनुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान पोहोचेल : शेतकऱ्यांनी काळजी करु नये

बीड : परतीच्या पावसाने महाराष्ट्रासह बीड जिल्ह्यात तीन आठवड्यासापूसन थैमान घातले आहे. तीन वर्षांपासून दुष्काळात होरपळणाºया शेतक-यांचा पाण्याचा प्रश्न मिटला असला तरी, अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम हातचा गेला आहे. कापूस, सोयाबीन, मका, बाजरी या पिकांचे नुकसान झाले आहे. या परिस्थितीत लोकप्रतिनिधी व शासन शेतकºयांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. विमा कंपनीच्या सर्व जाचक अटी व नियमांची कोणतीही काळजी नये. नुकसानग्रस्त प्रत्येक शेतक-याच्या खात्यावर शासनाचे अनुदान जमा पोहचेल, असे मत खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी व्यक्त केले.जिल्ह्यातील नुकसान झालेल्या पिकांची पाहणी खा.मुंडे यांनी केली. बीड तालुक्यातील पेंडगाव, माळापुरी, औरंगपूर, भाटसांगवी, वाकनाथपूर, उंब्रज खालसा, नागपूर, इट, पिंपळनेर, ताडसोन्ना या गावांचा दौरा त्यांनी दौरा केला. यावेळी आ. लक्ष्मण पवार, भाजपा युवा राजेंद्र मस्के यांची देखील उपस्थिती होती.राजेंद्र मस्के यांनी यांनी देखील शेतक-यांशी संवाद साधला. शेतकºयांना धीर देत विमा असो अथवा नसो प्रत्येक शेतकºयांला नुकसान भरपाई मिळण्यासाठी शासनाकडे मागणी केल्याचे सांगितले. नुकसानग्रस्त शेतक-यांना अनुदान मिळवून देण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी प्रयत्नशील आहेत. दुष्काळात तीन वर्षांपासून पिचलेल्या शेतकरी वर्गाचा आर्थिक कणा खरीप हंगाम गेल्याने नेस्तनाबूत झाला आहे. पावसाच्या आगमनाने शेतकरी वर्ग सुखावला होता परंतु अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. कर्जाच्या ओझ्यातही नवी भर पडल्याने शेतकरी शेतमजूर त्रस्त झाला आहे. अशा अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांना सरसकट कर्जमाफी दिली तर ती नवसंजीवनी ठरेल अशी आशा राजेंद्र मस्के यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच खा. डॉ. प्रीतम मुंडे यांनी हा मुद्दा लोकसभेत उपस्थित करावा आणि शेतकºयांना अनुदान लवकरात लवकर मिळवून द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.मुंडे यांनी बैलगाडीतून केली पाहणीपिकांची पाहणी करण्यासाठी एका नदीतून बैलगाडीच्या सहाय्याने डॉ.प्रीतम मुंडे यांनी प्रवास केला. व नदी ओलांडून वाकनाथपूर येथील शेतक-यांशी संवाद साधल्याने येथील ग्रामस्थांना दिलासा मिळाला. तसेच अनेकांनी खा. मुंडे यांच्यापुढे त्यांचे प्रश्न मांडले. यावेळी त्यांनी देखील मोकळेपणाने या सर्व प्रश्नांचे निराकारण केले. तसेच शासनाला परिस्थितीची जाणीव असून सर्वांना नुकसानभरपाई मिळेल असे आश्वासन त्यांनी उपस्थितांना दिले.

टॅग्स :BeedबीडPritam Mundeप्रीतम मुंडेRainपाऊस