शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

प्रितम मुंडे यांनी केली पिक नुकसानीची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 14:13 IST

मुसळधार पावसामुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा खरीप हंगाम १०० टक्के वाया गेला आहे. त्याच्या पाहणीसाठी जिल्ह्याच्या खासदार डॉ. प्रितम मुंडे संसदेचे अधिवेशन संपताच गुरूवार दि. १ रोजी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर आल्या.

बीड : मुसळधार पावसामुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा खरीप हंगाम १०० टक्के वाया गेला आहे. त्याच्या पाहणीसाठी जिल्ह्याच्या  खासदार  डॉ. प्रितम मुंडे संसदेचे अधिवेशन संपताच गुरूवार दि. १ रोजी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर आल्या. खरीप पिकाच्या नुकसानीची पाहणी केली.  तसेच  शेतकऱ्यांना प्रति हेक्‍टरी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणीही त्यांनी सरकारकडे केली आहे.

पंधरा दिवसापासून सतत पडणाऱ्या पावसामुळे सोयाबीन, कापूस ही पिके शंभर टक्के वाया गेली आहेत. अद्यापपर्यंत पंचनामे सुरू झालेले नाहीत.  जिल्ह्यातील सत्ताधारी शेतकऱ्यांच्या बांधावर नुकसानीची पाहणी करण्यासाठीही गेलेले नाहीत.  या पार्श्वभुमीवर  खासदार डॉ. प्रीतम  मुंडे  यांनी  माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष नुकसानीची केलेली पाहणी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरली.

कोरोना संकटात पिकांचे नुकसान हे एक फार मोठे दुहेरी संकट असून आता सरकारने शेतकऱ्यांचे दुःख ओळखावे आणि कुठल्याही परिस्थितीत हेक्‍टरी  ५० हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांना द्यावी, असे डॉ. मुंडे यांनी यावेळी नमूद केले. या दौऱ्यात भाजपा नेते रमेश आडसकर यांच्यासह सर्व प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :agricultureशेतीPritam Mundeप्रीतम मुंडेFarmerशेतकरी