शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

प्रधानमंत्री पिक विमा योजना राफेल पेक्षाही मोठा घोटाळा : पी. साईनाथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 17:21 IST

विमा कंपन्यांवर कोणाचेही नियंत्रण नाही,शेतकऱ्यांना फसवणाऱ्या कंपन्या दरवेळी नाव बदलून समोर येत आहेत.

माजलगाव (बीड ) : प्रधानमंत्री पीक विमा योजना ही या सरकारच्या काळातील सर्वात मोठा घोटाळा आहे. हा घोटाळा राफेल पेक्षाही मोठा घोटाळा असल्याचा आरोप जेष्ठ पत्रकार पी साईनाथ यांनी केला. ते दर्पण पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते. 

माजलगाव पत्रकार संघातर्फे दर्पण पुरस्कार वितरण सोहळ्याचे आज आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना पी साईनाथ म्हणाले की, राफेल खरेदी प्रक्रिया एकदाच होणारी आहे मात्र, प्रधानमंत्री पिक विमा योजना वर्षानुवर्ष सुरूच आहे. ही योजना सर्वात मोठी फसवी योजना असून त्यातून खाजगी कंपन्यांना नफा मिळवून देण्यात येत आहे. यामुळे सरकारी संस्था तोट्यात आल्या तर शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे,असेही ते यावेळी म्हणाले. 

आमदार नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, विमा कंपन्यांवर कोणाचेही नियंत्रण नाही,शेतकऱ्यांना फसवणाऱ्या कंपन्या दरवेळी नाव बदलून समोर येत आहेत. यावेळी पत्रकार गंमत भंडारी आणि वसंत साळुंके यांना समाज भूषण आणि दर्पण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमात नगरपालिका अध्यक्ष सहाल चाऊस, मोहन जगताप, सभापती अशोक डक, उपविभागीय अधिकारी प्रियंका पवार आदींची उपस्थिती होती. 

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरीCentral Governmentकेंद्र सरकारCorruptionभ्रष्टाचार