शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
5
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
6
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
7
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
8
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
9
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
10
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
11
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
12
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
13
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
14
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
15
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
16
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
17
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
18
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
19
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
20
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा

सुरांच्या हिंदोळ्यांवर शब्दब्रह्माची अनुभूती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 23:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क स्वामी रामानंद तीर्थनगरी (अंबाजोगाई) : मायमराठीच्या साडेसहाशे वर्षांच्या प्रवासासाठी प्रमुख टप्प्या-टप्प्यांवरील माईल स्टोन ठरलेल्या प्रतिभावंतांच्या गेय ...

ठळक मुद्देमराठी सारस्वतांना मानाचा मुजरा

लोकमत न्यूज नेटवर्कस्वामी रामानंद तीर्थनगरी (अंबाजोगाई) : मायमराठीच्या साडेसहाशे वर्षांच्या प्रवासासाठी प्रमुख टप्प्या-टप्प्यांवरील माईल स्टोन ठरलेल्या प्रतिभावंतांच्या गेय रचनांची नितांत सुंदर मैफल अंबाजोगाई साहित्य संमेलनात रंगली. डॉ. राजेश सरकटे व त्यांच्या चमूने जणू मराठी सारस्वतांंना घातलेला हा मानाचा मुजराच होता.विख्यात विदूषी महदंबा यांच्या कृष्णभक्तिपर काव्याने प्रवासाचा श्रीगणेशा झाला. संत नामदेव, संत जनाई यांच्या काव्यातील भक्तिरसात रसिक चिंब झाले.ख्रिसमसने आणलेली गुलाबी थंडी शब्दांची धग आणि त्यावर चढवलेला स्वरांचा मुलामा यामुळे रसिक श्रोते उल्हासित झालेले होते. आधुनिक मराठीच्या टप्प्यावरील कवींच्या शब्दांची पूजा बांधताना डॉ. सुहासिनी इर्लेकरांच्या शब्दकळांशी सुरावटीचा मेळ बसलाडोळ्यात रंग ओले, डोळे अभंग कोठे?मी आज गात आहे, गाणे तुझ्यासाठीनभकाजळी तमाने येते भरून जेव्हाहोते हताश माती, जाते तुटून तेव्हाउजळीत लोचने ये लावुनी प्रेमज्योतया काव्यातून स्त्रीत्वाच्या सुलभ भावना उमलू लागल्या.त्यानंतर कवी वा.रा.कांत यांचीदूर टिटवीची साद,वाºयावरी भरे काटाहोते पोळणी मनाची,हुरड्यास येई लाटातुझ्या गुंफल्या बोटांचे,सळ उठले वाºयातगीत माझे थरकतेओल्या रीतीच्या ओठातडॉ. वैशाली देशमुख यांचा कवितेला लाभलेला स्वर आडरानात टिटवीच्या कलरवाची आठव करून गेला. डॉ. शैला लोहिया यांच्याचांदण्याचा पूर आतालागला रे ओसरूदूर होई साजना, वस्त्र दे मज आवरूया शृंगार रसातील काव्याला डॉ. देशमुख तेवढ्याच नजाकतीने पेश केले. फ.मुं. शिंदे यांच्या‘गळाली पाने उदास राने,सुख-दु:खाचे येणे-जाणे’या शब्दरचनेने काहीशी स्तब्धता निर्माण केली. कविवर्य ना.धों. महानोरांच्या‘झाडं झाली हिरवीशी,शीळ घुमते रानातओळ जांभळ्या मेघांचीवाहे नदीच्या पानात’या रचनेला गंगेच्या पाण्याइतका पारदर्शी सूर गवसला होता.मायमराठीचे चलचित्र एकामागून एक समोर येत होती. अनुराधा पाटील यांच्या,‘भल्या पहाटे पहाटे,पाय नदीच्या पाण्यातउठे नदीपार नाद, दाटे उमाळा मनात’स्त्रीच्या अंतर्मनातील हुरहूर डॉ. वैशाली देशमुख यांच्या सुरातून जशीच्या तशी साकारली. ना.गो. नांदापूरकरांची ‘माझी मराठी असे मायभाषा’ ही अजरामर कविता डॉ. राजेश सरकटे बेभान होऊन गात होते.तोडा चिरा दुग्धधाराच येतीन हे रक्त वाहे शरीरातुनीमाझी मराठी, मराठाच मी ही असे शब्द येतीलही त्यातुनीया ओळींना गायकाचा टिपेला पोहोचलेला सूर अवर्णनीय होता. कविवर्य बी. रघुनाथांचीचंदनाच्या विठोबाचीमाय गावा गेली,पंढरी या ओसरीची आज ओस झाली’कवीची काहीशी उदासवाणी भावना यमन रागात डॉ. वैशाली देशमुख यांनी अधिकच खुलविली, तर त्यांचीच लावणीवजा रचना‘कुरवाळुनी करिशी मनधरणी,चेटक्या तुझी कळली करणी’गायिका संगीता भावसार यांनी तेवढ्याच ठसक्यात सादर केली. कवी इंद्रजित भालेरावांची ‘माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता’ रचना डॉ. सरकटे यांनी लोकसंगीताच्या बाजात प्रस्तुत केली. दासू वैद्य यांचीजगण्याचा पाया । चालण्याचे बळ।विचाराची कळ । तुकाराम ।।ही रचना सादर झाली.मराठी माणसाच्या मर्मबंधाची ठेव ठरलेल्या कविता संगीतबद्ध करून डॉ. राजेश सरकटे यांनी एका अर्थाने मायमराठीचा हा ऋणनिर्देशच केला, असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरू नये. हल्लीच्या आॅर्केस्ट्राच्या जमान्यात मंचावरून वाद्यांची अनुभूती तशी बंदच झाली आहे; परंतु या संचाने सतार, बासरीचा लाईव्ह वापर करून एक सुखद अनुभव दिला. सहकलावंत उमाकांत शुक्ला (सतार), प्रथमेश साळुंके (बासरी), प्रा. जगदीश व्यवहारे (तबला), अंकुश बोरडे (ढोलकी), राजेश भावसार (आॅक्टोपॅड), राजेश देहाडे (सिंथेसायझर), संकेत देहाडे (गिटार) यांनी साथसंगत केली. शब्दसुरांच्या या प्रवासाचे सारथ्य म्हणजे निवेदन ही बाजू समाधान इंगळे यांनी सांभाळली. एकूणच संगीत संयोजन विनोद सरकटे यांचे होते.रात्रीच्या मैफलीस खुद्द संमेलनाध्यक्ष प्रा. रंगनाथ तिवारी, स्वागताध्यक्ष राजेसाहेब देशमुख, संयोजन समितीचे पदाधिकारी व अंबानगरीतील रसिक श्रोते, साहित्यिक केवळ उपस्थितच होते असे नाही, तर उत्स्फूर्तपणे दादही देत होते, हे विशेष!

टॅग्स :Marathwada Sahitya Sammelanमराठवाडा साहित्य संमेलन