शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सुरांच्या हिंदोळ्यांवर शब्दब्रह्माची अनुभूती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 23:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क स्वामी रामानंद तीर्थनगरी (अंबाजोगाई) : मायमराठीच्या साडेसहाशे वर्षांच्या प्रवासासाठी प्रमुख टप्प्या-टप्प्यांवरील माईल स्टोन ठरलेल्या प्रतिभावंतांच्या गेय ...

ठळक मुद्देमराठी सारस्वतांना मानाचा मुजरा

लोकमत न्यूज नेटवर्कस्वामी रामानंद तीर्थनगरी (अंबाजोगाई) : मायमराठीच्या साडेसहाशे वर्षांच्या प्रवासासाठी प्रमुख टप्प्या-टप्प्यांवरील माईल स्टोन ठरलेल्या प्रतिभावंतांच्या गेय रचनांची नितांत सुंदर मैफल अंबाजोगाई साहित्य संमेलनात रंगली. डॉ. राजेश सरकटे व त्यांच्या चमूने जणू मराठी सारस्वतांंना घातलेला हा मानाचा मुजराच होता.विख्यात विदूषी महदंबा यांच्या कृष्णभक्तिपर काव्याने प्रवासाचा श्रीगणेशा झाला. संत नामदेव, संत जनाई यांच्या काव्यातील भक्तिरसात रसिक चिंब झाले.ख्रिसमसने आणलेली गुलाबी थंडी शब्दांची धग आणि त्यावर चढवलेला स्वरांचा मुलामा यामुळे रसिक श्रोते उल्हासित झालेले होते. आधुनिक मराठीच्या टप्प्यावरील कवींच्या शब्दांची पूजा बांधताना डॉ. सुहासिनी इर्लेकरांच्या शब्दकळांशी सुरावटीचा मेळ बसलाडोळ्यात रंग ओले, डोळे अभंग कोठे?मी आज गात आहे, गाणे तुझ्यासाठीनभकाजळी तमाने येते भरून जेव्हाहोते हताश माती, जाते तुटून तेव्हाउजळीत लोचने ये लावुनी प्रेमज्योतया काव्यातून स्त्रीत्वाच्या सुलभ भावना उमलू लागल्या.त्यानंतर कवी वा.रा.कांत यांचीदूर टिटवीची साद,वाºयावरी भरे काटाहोते पोळणी मनाची,हुरड्यास येई लाटातुझ्या गुंफल्या बोटांचे,सळ उठले वाºयातगीत माझे थरकतेओल्या रीतीच्या ओठातडॉ. वैशाली देशमुख यांचा कवितेला लाभलेला स्वर आडरानात टिटवीच्या कलरवाची आठव करून गेला. डॉ. शैला लोहिया यांच्याचांदण्याचा पूर आतालागला रे ओसरूदूर होई साजना, वस्त्र दे मज आवरूया शृंगार रसातील काव्याला डॉ. देशमुख तेवढ्याच नजाकतीने पेश केले. फ.मुं. शिंदे यांच्या‘गळाली पाने उदास राने,सुख-दु:खाचे येणे-जाणे’या शब्दरचनेने काहीशी स्तब्धता निर्माण केली. कविवर्य ना.धों. महानोरांच्या‘झाडं झाली हिरवीशी,शीळ घुमते रानातओळ जांभळ्या मेघांचीवाहे नदीच्या पानात’या रचनेला गंगेच्या पाण्याइतका पारदर्शी सूर गवसला होता.मायमराठीचे चलचित्र एकामागून एक समोर येत होती. अनुराधा पाटील यांच्या,‘भल्या पहाटे पहाटे,पाय नदीच्या पाण्यातउठे नदीपार नाद, दाटे उमाळा मनात’स्त्रीच्या अंतर्मनातील हुरहूर डॉ. वैशाली देशमुख यांच्या सुरातून जशीच्या तशी साकारली. ना.गो. नांदापूरकरांची ‘माझी मराठी असे मायभाषा’ ही अजरामर कविता डॉ. राजेश सरकटे बेभान होऊन गात होते.तोडा चिरा दुग्धधाराच येतीन हे रक्त वाहे शरीरातुनीमाझी मराठी, मराठाच मी ही असे शब्द येतीलही त्यातुनीया ओळींना गायकाचा टिपेला पोहोचलेला सूर अवर्णनीय होता. कविवर्य बी. रघुनाथांचीचंदनाच्या विठोबाचीमाय गावा गेली,पंढरी या ओसरीची आज ओस झाली’कवीची काहीशी उदासवाणी भावना यमन रागात डॉ. वैशाली देशमुख यांनी अधिकच खुलविली, तर त्यांचीच लावणीवजा रचना‘कुरवाळुनी करिशी मनधरणी,चेटक्या तुझी कळली करणी’गायिका संगीता भावसार यांनी तेवढ्याच ठसक्यात सादर केली. कवी इंद्रजित भालेरावांची ‘माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता’ रचना डॉ. सरकटे यांनी लोकसंगीताच्या बाजात प्रस्तुत केली. दासू वैद्य यांचीजगण्याचा पाया । चालण्याचे बळ।विचाराची कळ । तुकाराम ।।ही रचना सादर झाली.मराठी माणसाच्या मर्मबंधाची ठेव ठरलेल्या कविता संगीतबद्ध करून डॉ. राजेश सरकटे यांनी एका अर्थाने मायमराठीचा हा ऋणनिर्देशच केला, असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरू नये. हल्लीच्या आॅर्केस्ट्राच्या जमान्यात मंचावरून वाद्यांची अनुभूती तशी बंदच झाली आहे; परंतु या संचाने सतार, बासरीचा लाईव्ह वापर करून एक सुखद अनुभव दिला. सहकलावंत उमाकांत शुक्ला (सतार), प्रथमेश साळुंके (बासरी), प्रा. जगदीश व्यवहारे (तबला), अंकुश बोरडे (ढोलकी), राजेश भावसार (आॅक्टोपॅड), राजेश देहाडे (सिंथेसायझर), संकेत देहाडे (गिटार) यांनी साथसंगत केली. शब्दसुरांच्या या प्रवासाचे सारथ्य म्हणजे निवेदन ही बाजू समाधान इंगळे यांनी सांभाळली. एकूणच संगीत संयोजन विनोद सरकटे यांचे होते.रात्रीच्या मैफलीस खुद्द संमेलनाध्यक्ष प्रा. रंगनाथ तिवारी, स्वागताध्यक्ष राजेसाहेब देशमुख, संयोजन समितीचे पदाधिकारी व अंबानगरीतील रसिक श्रोते, साहित्यिक केवळ उपस्थितच होते असे नाही, तर उत्स्फूर्तपणे दादही देत होते, हे विशेष!

टॅग्स :Marathwada Sahitya Sammelanमराठवाडा साहित्य संमेलन