शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

वीजचोरी घरोघरी; दिसली फक्त ५५ दारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 00:18 IST

मागील दोन वर्षात केवळ ५५ ठिकाणी वीज चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बीड शहरासह जिल्ह्यात सध्या सर्वत्र सर्रास वीज चोरी केली जात आहे. महावितरणला मात्र, कोठेच ती दिसत नसल्याने अश्चर्य व्यक्त होत आहे. मागील दोन वर्षात केवळ ५५ ठिकाणी वीज चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे. यामध्ये ४६ जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. इतरांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. एकीकडे वीज चोरी घरोघरी होत असताना केवळ ५५ दारीच ती आढळल्याने महावितरणकडून वीजचोरांकडे ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.वीज चोरी रोखण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. यासंदर्भात महावितरणला विशेष पथके नियुक्त करून कारवाया करण्याचे आदेशही दिलेले होते. एवढेच नव्हे तर स्थानिक अभियंता, लाईनमन यांनाही वीजचोरांवर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ कार्यालयाकडून देण्यात आले होते. बीड जिल्ह्यात मात्र, याची कसलीच अंमलबजावणी झाली नसल्याचे दिसून येत आहे.तत्कालीन अधीक्षक अभियंता अजिनाथ सोनवणे यांनी कारवायांचा धडाका लावला होता. मात्र, सध्याचे अधीक्षक अभियंता संजय सरग यांच्या कार्यकाळात मात्र या कारवाया थंडावल्या आहेत. त्यामुळे सर्रास वीज चोरी केली जात आहे. याकडे मात्र महावितरणचे अधीक्षक अभियंता ते लाईनमनपर्यंतचे सर्वच जण दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. महावितरणच्या गलथान कारभारबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. वीज चोरांना सहकार्य करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.दरम्यान, महावितरणने वीजचोरांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.दोन वर्षात काय झाल्या कारवाया ?बीडचे अधीक्षक अभियंता संजय सरग यांच्या म्हणण्यानुसार लातुरचे पीआरओकडून माहिती घेतली.यामध्ये त्यांनी भारतीय विद्यूत कायदा २००३ च्या कलम १२६ नुसार ५५ ठिकाणी वीज चोरी झाल्याचे निदर्शनास आल्याचे सांगितले. पैकी १४ प्रकरणांमध्ये रक्कम भरली असून त्यांना १ लाख ३५ हजार रूपयांचा दंड आकारला.तसेच कलम १३५ नुसार ४६ जणांविरोधात गुन्हा दाखल केला. त्यांना ३ लाख १६ हजार रूपयांचा दंड आकारल्याचे पीआरओंनी ‘लोकमत’ला सांगितले.अधीक्षक अभियंता संजय सरग यांनी भ्रमणध्वनी न घेतल्याने त्यांची बाजू समजली नाही.कोठे आणि कशी होते वीज चोरी?ग्रामीण भागात शेतातील विद्यूत पंप, वाड्या, वस्त्यांवर सर्रासपणे वीज चोरी होते.गावात तारेवर आकडे टाकूनी वीज चोरी केली जाते. तर शहरात नादुरूस्त मिटर, रिमोटद्वारे वीज चोरी केली जात असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.तसेच मिटरमध्ये किट बसवूनही वीज चोरी केली जात असल्याचे समजते.

टॅग्स :electricityवीजmahavitaranमहावितरण