शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
रशिया कसं थांबवेल युक्रेन युद्ध? ट्रम्प यांनी UNGA मध्ये सांगितला अमेरिकेचा प्लॅन; पुतिन यांचं टेन्शन वाढणार!
3
पाक गोलंदाजानं केली हसरंगाची कॉपी! मग IND vs PAK मॅचचा दाखला देत इरफाननं काढली 'लायकी' (VIDEO)
4
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
5
पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य
6
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
7
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
8
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
9
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
10
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
11
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
12
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
13
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
14
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
15
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
16
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
17
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
18
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
19
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
20
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न

‘आयुष्मान भारत’ची बीडमध्ये खराब कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 00:07 IST

प्रधानमंत्री जन आरोग्य तथा आयुष्मान भारत योजनेचे काम बीड जिल्ह्यात अतीशय खराब असल्याचे समोर आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याबाबत आढावा घेऊन नाव नोंदणी व कार्ड वाटप करण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांना पत्रही काढल आहे. मागील दहा महिन्यात केवळ २३ टक्केच काम जिल्ह्यात झाले आहे.

ठळक मुद्देसीईओंचे बीडीओंना पत्र : १० महिन्यात केवळ २३ टक्के काम पूर्ण

बीड : प्रधानमंत्री जन आरोग्य तथा आयुष्मान भारत योजनेचे काम बीड जिल्ह्यात अतीशय खराब असल्याचे समोर आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याबाबत आढावा घेऊन नाव नोंदणी व कार्ड वाटप करण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांना पत्रही काढल आहे. मागील दहा महिन्यात केवळ २३ टक्केच काम जिल्ह्यात झाले आहे.जिल्ह्यात ५ लाख ८८ हजार २३५ लाभार्थी आहेत. पैकी आतापर्यंत केवळ १ लाख ४० हजार ४७५ लाभार्थ्यांनी ई-कार्ड घेतले असून प्रत्यक्षात १ लाख ३४ हजार ४८ लोकांना कार्डचे वाटप करण्यात आलेले आहे. दहा महिन्यांपासून सुरू झालेल्या योजनेची अद्यापही नागरिकांना माहितीच नसल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत १०० टक्के काम होणे अपेक्षित होते. मात्र, केवळ २३ टक्केच काम झाल्याचे समोर आले आहे. गुरूवारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी विविध योजना व मोहिमांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी आयुष्मान भारतची कामगिरी पाहून नाराजी व्यक्त करीत आरोग्य व गटविकास अधिकाºयांना सुचना केल्या. तसेच नागरिकांनीही गावातील शासनमान्य महा ई सेवा केंद्रावर जावून नाव नोंदणी करून कार्ड घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. नियूक्त खाजगी रूग्णालये, सरकारी रूग्णालयांमध्ये नोंदणी मोफत आहे. आपले सरकार व इतर ठिकाणी ३० रूपये देऊन नोंदणी केली जाते.प्रत्येक गुरूवारी ग्रामपंचायत स्तरावर शिबीरे आयोजित करावे, तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली तात्काळ बैठक घेऊन नियोजन करण्याचे आदेशही कुंभार यांनी दिले आहेत. तसे पत्रही सर्वच गटविकास अधिकाºयांना काढले आहेत. या बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवारसह इतर अधिकारी उपस्थित होते.मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी आढावा घेतला. माहिती देताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार. यावेळी उपस्थित इतर अधिकारी.१३०० आजारांचा समावेश१ एप्रिल २०१८ पासून देशात आयुष्यमान भारत ही योजना लागू केली. या आगोदर महात्मा फुले जन आरोग्य योजना कार्यरत आहे.सध्या आरोग्य विभागाकडून या दोन्ही योजना एकत्रिपणे राबविल्या जात आहेत. दोन्ही योजनेत तब्बल १३०० आजारांचा समावेश केलोला आहे.फुले योजनेंतर्गत दीड लाखापर्यंत तर आयुष्यमान भारत अंतर्गत ५ लाख रूपयांपर्यंत उपचारासाठी आर्थिक मदत केली जाते. यासाठी ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांसाठी काही निकष ठरवून लाभार्थी निवडले आहेत.

टॅग्स :Beedबीडzpजिल्हा परिषदhospitalहॉस्पिटलHealthआरोग्य