शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

शेतात साचले तळे; बीड जिल्ह्याला परतीच्या पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 15:35 IST

Return rains hit Beed district शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचा घास निसर्गाच्या प्रकोपाने हिरावून घेतला आहे.

ठळक मुद्देमांजरा धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढमाजलगाव धरणाचे ११ दरवाजे उघडले

बीड : जिल्ह्यातील सर्वच भागात शनिवारी दुपारपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली. रात्रभर पाऊस सुरु असताना रविवारी सकाळपासून जोर धरला. सायंकाळपर्यंतही पावसाच्या सरी कोसळतच होत्या. या पावसात खरिप हंगामातील पिकांची काढणी, मळणी सुरु असल्यामुळे प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांनी काढून गंजी लावलेल्या सोयाबीन पाण्यात भिजले तर वेचणीसाठी आलेला कापूस भिजल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचा घास निसर्गाच्या प्रकोपाने हिरावून घेतला आहे.

जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून आक्टोंबर हिटच्या उन्हामुळे नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागला. मागील दोन दिवसांपासून आभाळ  भरुन येत होते. यातच शनिवारी दुपारी वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात परतीच्या पावसाला सुरुवात झाली. धारुर, शिरुर कासार, केज तालुक्यात विज पडल्याने एक शेतकरी ठार तर दुसरा जखमी झाल्याची घटना घडली. जिल्ह्यातील विविध ठिकाणी शनिवारी रात्रभर पाऊस पडत होता. रविवारी सकाळपासूनच जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. दिवसभर सूर्यदर्शनही झाले नाही. बीड शहरासह सकाळी १० वाजता पावसाला सुरुवात झाली. दिवसभर पाऊस सुरुच होता. गेवराई तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरालाही पावसाने झोडपून काढले. यात गेवराई तालुक्यातील वेचणीला आलेल्या कापसाचे प्रचंड नुकसान झाले आहे. तालुक्यातील अनेक नद्यांना आलेल्या पुरामुळे काही काळासाठी गावांचा संपर्क तुटला होता. पूर ओसल्यानंतर वाहतुक पूर्ववत झाली.

धारुर तालुक्यातही जोरदार पासवसाने हजेरी लावली. वीज दोन ठिकाणी विज पडली.यात पहिल्या ठिकाणी बाजरीच्या गंजीवर पडल्यामुळे आग लागली. तर दुसऱ्या ठिकाणी पडलेल्या विजेमुळे एक म्हैस ठार झाली.  आष्टी तालुक्यातही सलग तीन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे.  यात शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पेरलेल्या ज्वारीचे मोठे नुकसान झाले आहे. खरिपाच्या हंगामातील काढणी केलेल्या आणि मळणी सुरु असलेल्या पिकांचेही नुकसान झाले आहे. वडवणी तालुक्यात परतीच्या पावसाने खरीप हंगामील पिकांची प्रचंड नासाडी केली. बाजरी, कापूस , सोयाबीन पीक हाता आलेले असताना हिरावून घेतल्याची परिस्थिती आहे. आष्टी तालुक्यातही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. आष्टी शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे नुकसान झाले आहे. माजलगाव तालुक्यातही मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे कापसाच्या पिकाचे नुकसान झाले आहे. अंबाजोगाई तालुक्यातही तुफान पाऊस झाला.

१ जून ते ११ आॅक्टोबरपर्यंत ७३९.८ मि.मी. पाऊसबीड जिल्ह्यात पर्जन्यमानाची वार्षिक सरासरी ६३८.९० मिमी इतकी आहे. १ जून ते ११ आॅक्टोबर दरम्यान जिल्ह्यात एकूण ७३९.८ मिमी पाऊस नोंदला आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत १२६ टक्के पाऊस झाला आहे. परतीच्या पावसामुळे मात्र हाती आलेल्या खरिपाच्या पिकांना फटका बसला तर रबीची पेरलेली बियाणे भिजून सडण्याचा  धोका वाढला आहे. 

धरणे पुन्हा ओसंडलीपरतीच्या पावसात अगोदरच भरलेली धरणे पुन्हा एकदा ओव्हरफ्लो झाल्याचे चित्र जिल्ह्याभरात पाहायला मिळाले. बीड जिल्ह्यातील सर्वांत मोठे धरण असलेल्या माजलगाव धरणाचे तीन दरवाजे शनिवारी पहाटेच उघडण्यात आले. याशिवाय आष्टी शहराला पाणीपुरवठा करणारे ब्रम्हगांव तलाव तब्बल चार वर्षांनी भरला. याशिवाय इतर मध्यम, लघु आणि साठवण तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत.

माजलगाव धरणातून विसर्गपरतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने माजलगाव धरणाचे ११ दरवाजे सोमवारी सकाळी उघडण्यात आले. त्यातुन प्रतिसेकंद २२ हजार क्युसेसने पाणी सिंदफना पात्रात सोडण्यात येत आहे. मागील आठवड्यापर्यंत एक दरवाजातुन एक हजार क्यूसेकने पाणी सोडण्यात येत होते. त्यात आता वाढ केली आहे. जास्त पाऊस झाला तरी नियोजन करण्यात आल्याची माहिती धरणाचे उपविभागीय अधिकारी सी. एम.झेंड, कनिष्ठ अभियंता बी.आर.शेख यांनी दिली आहे.

मांजरा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढकेज तालुक्यात शनिवारपासून झालेल्या धनेगाव येथील मांजरा धरणाच्या पाणी साठ्यात वाढ होत आहे. रविवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत मांजरा धरणातील पाणीसाठ्यात २०  सेंटिमीटरने वाढ झाली. धरणाच्या वरच्या बाजूस पाऊस पडत असल्याने पाणीसाठ्यात वाढ होत असल्याची माहिती मांजरा धरणाचे सहायक अभियंता शहाजी पाटील यांनी लोकमतला दिली. शनिवारपासून झालेल्या पावसाचा रबीच्या पिकांना फायदा होणार असलातरी खरिपाचे हातचे आलेल्या पिकांना मात्र फटका बसला आहे. 

टॅग्स :BeedबीडRainपाऊसagricultureशेतीFarmerशेतकरी