शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेतात साचले तळे; बीड जिल्ह्याला परतीच्या पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 15:35 IST

Return rains hit Beed district शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचा घास निसर्गाच्या प्रकोपाने हिरावून घेतला आहे.

ठळक मुद्देमांजरा धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढमाजलगाव धरणाचे ११ दरवाजे उघडले

बीड : जिल्ह्यातील सर्वच भागात शनिवारी दुपारपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली. रात्रभर पाऊस सुरु असताना रविवारी सकाळपासून जोर धरला. सायंकाळपर्यंतही पावसाच्या सरी कोसळतच होत्या. या पावसात खरिप हंगामातील पिकांची काढणी, मळणी सुरु असल्यामुळे प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांनी काढून गंजी लावलेल्या सोयाबीन पाण्यात भिजले तर वेचणीसाठी आलेला कापूस भिजल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचा घास निसर्गाच्या प्रकोपाने हिरावून घेतला आहे.

जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून आक्टोंबर हिटच्या उन्हामुळे नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागला. मागील दोन दिवसांपासून आभाळ  भरुन येत होते. यातच शनिवारी दुपारी वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात परतीच्या पावसाला सुरुवात झाली. धारुर, शिरुर कासार, केज तालुक्यात विज पडल्याने एक शेतकरी ठार तर दुसरा जखमी झाल्याची घटना घडली. जिल्ह्यातील विविध ठिकाणी शनिवारी रात्रभर पाऊस पडत होता. रविवारी सकाळपासूनच जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. दिवसभर सूर्यदर्शनही झाले नाही. बीड शहरासह सकाळी १० वाजता पावसाला सुरुवात झाली. दिवसभर पाऊस सुरुच होता. गेवराई तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरालाही पावसाने झोडपून काढले. यात गेवराई तालुक्यातील वेचणीला आलेल्या कापसाचे प्रचंड नुकसान झाले आहे. तालुक्यातील अनेक नद्यांना आलेल्या पुरामुळे काही काळासाठी गावांचा संपर्क तुटला होता. पूर ओसल्यानंतर वाहतुक पूर्ववत झाली.

धारुर तालुक्यातही जोरदार पासवसाने हजेरी लावली. वीज दोन ठिकाणी विज पडली.यात पहिल्या ठिकाणी बाजरीच्या गंजीवर पडल्यामुळे आग लागली. तर दुसऱ्या ठिकाणी पडलेल्या विजेमुळे एक म्हैस ठार झाली.  आष्टी तालुक्यातही सलग तीन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे.  यात शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पेरलेल्या ज्वारीचे मोठे नुकसान झाले आहे. खरिपाच्या हंगामातील काढणी केलेल्या आणि मळणी सुरु असलेल्या पिकांचेही नुकसान झाले आहे. वडवणी तालुक्यात परतीच्या पावसाने खरीप हंगामील पिकांची प्रचंड नासाडी केली. बाजरी, कापूस , सोयाबीन पीक हाता आलेले असताना हिरावून घेतल्याची परिस्थिती आहे. आष्टी तालुक्यातही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. आष्टी शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे नुकसान झाले आहे. माजलगाव तालुक्यातही मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे कापसाच्या पिकाचे नुकसान झाले आहे. अंबाजोगाई तालुक्यातही तुफान पाऊस झाला.

१ जून ते ११ आॅक्टोबरपर्यंत ७३९.८ मि.मी. पाऊसबीड जिल्ह्यात पर्जन्यमानाची वार्षिक सरासरी ६३८.९० मिमी इतकी आहे. १ जून ते ११ आॅक्टोबर दरम्यान जिल्ह्यात एकूण ७३९.८ मिमी पाऊस नोंदला आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत १२६ टक्के पाऊस झाला आहे. परतीच्या पावसामुळे मात्र हाती आलेल्या खरिपाच्या पिकांना फटका बसला तर रबीची पेरलेली बियाणे भिजून सडण्याचा  धोका वाढला आहे. 

धरणे पुन्हा ओसंडलीपरतीच्या पावसात अगोदरच भरलेली धरणे पुन्हा एकदा ओव्हरफ्लो झाल्याचे चित्र जिल्ह्याभरात पाहायला मिळाले. बीड जिल्ह्यातील सर्वांत मोठे धरण असलेल्या माजलगाव धरणाचे तीन दरवाजे शनिवारी पहाटेच उघडण्यात आले. याशिवाय आष्टी शहराला पाणीपुरवठा करणारे ब्रम्हगांव तलाव तब्बल चार वर्षांनी भरला. याशिवाय इतर मध्यम, लघु आणि साठवण तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत.

माजलगाव धरणातून विसर्गपरतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने माजलगाव धरणाचे ११ दरवाजे सोमवारी सकाळी उघडण्यात आले. त्यातुन प्रतिसेकंद २२ हजार क्युसेसने पाणी सिंदफना पात्रात सोडण्यात येत आहे. मागील आठवड्यापर्यंत एक दरवाजातुन एक हजार क्यूसेकने पाणी सोडण्यात येत होते. त्यात आता वाढ केली आहे. जास्त पाऊस झाला तरी नियोजन करण्यात आल्याची माहिती धरणाचे उपविभागीय अधिकारी सी. एम.झेंड, कनिष्ठ अभियंता बी.आर.शेख यांनी दिली आहे.

मांजरा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढकेज तालुक्यात शनिवारपासून झालेल्या धनेगाव येथील मांजरा धरणाच्या पाणी साठ्यात वाढ होत आहे. रविवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत मांजरा धरणातील पाणीसाठ्यात २०  सेंटिमीटरने वाढ झाली. धरणाच्या वरच्या बाजूस पाऊस पडत असल्याने पाणीसाठ्यात वाढ होत असल्याची माहिती मांजरा धरणाचे सहायक अभियंता शहाजी पाटील यांनी लोकमतला दिली. शनिवारपासून झालेल्या पावसाचा रबीच्या पिकांना फायदा होणार असलातरी खरिपाचे हातचे आलेल्या पिकांना मात्र फटका बसला आहे. 

टॅग्स :BeedबीडRainपाऊसagricultureशेतीFarmerशेतकरी