शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

रस्त्यावरून विनाकारण फिरणाऱ्यांची पोलिसांकडून चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:33 IST

माजलगाव : शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी, जमावबंदी लागू असताना शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. अशा ...

माजलगाव : शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी, जमावबंदी लागू असताना शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. अशा लोकांची पोलिसांनी नाकेबंदी करून चौकशी करणे सुरू केले आहे. दरम्यान सबळ कारण नसताना फिरणाऱ्या ३५ जणांना दंड अकारण्यात आला.

जमाव बंदी, संचारबंदी आदेशाची पायमल्ली करत शहरात नागरिकांची गर्दी होताना दिसत आहे. तर विनाकारण वाहनांवरून तसेच विना मास्क फिरणाऱ्यांची संख्याही वाढताना दिसत आहे. अशा बेजबाबदार नागरिकांविरोधात माजलगाव नगर परिषद व शहर पोलिसांच्या वतीने शहराच्या प्रवेशस्थळासह शिवाजी चौक, आंबेडकर चौक या भागात नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी पोलिसांकडून विनाकारण फिरणाऱ्याची चौकशी करण्यात आली. दरम्यान सबळ कारण नसणाऱ्यांना पोलिसी खाक्या दाखवत ३५ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्याचप्रमाणे अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या व्यापाऱ्यांना यावेळी नगर परिषद, पोलीस कर्मचाऱ्यांकडून कोरोना प्रादुर्भावाला नियंत्रणात ठेवण्यासाठी आपापल्या दुकानासमोर मेन कापडाची जाळी वापरण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.

मोंढ्यात अनेक पत्राची, इलेक्ट्रॉनिक दुकाने उघडी दिसून येत होती, तर जनरल स्टोअर्स चालकांनी वेगळीच शक्कल लढवली. कानासमोर बिस्किटचे बॉक्स ठेवून आतमध्ये जनरल स्टाेअर्समधील सामानांची विक्री केली जात असल्याचे दिसून येत होते. याबाबत काही नागरिकांनी पोलिसांना याबाबत सांगूनही त्यांनी यांच्या विरोधात काहीच कारवाई केली नाही. यामुळे इतर व्यापाऱ्यांचा पोलिसांविरोधात रोष निर्माण होताना दिसत आहे.

===Photopath===

160421\purusttam karva_img-20210416-wa0032_14.jpg