शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

भोजगाव येथील विहिरीत टाकले विष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 00:14 IST

तालुक्यातील भोजगाव येथील एका शेतकऱ्याच्या विहिरीत अज्ञात व्यक्तीने बुधवारी रात्री एक लिटर विषारी औषध टाकल्याने हे पाणी दूषित झाले आहे.

गेवराई : तालुक्यातील भोजगाव येथील एका शेतकऱ्याच्या विहिरीत अज्ञात व्यक्तीने बुधवारी रात्री एक लिटर विषारी औषध टाकल्याने हे पाणी दूषित झाले आहे. औषध टाकल्याचे शेतक-याला लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टाळली. या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात गेवराई ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रि या सुरू होती.रावसाहेब शिंदे यांचे गावालगत शेत असून, शेतात विहीर आहे. याच विहिरीचे पाणी खाजगी टँकरने गावात व देवपिंपरी, भाटआंतरवाली, कोमलवाडी, राजपिंपरी या ठिकाणी दिले जाते. गुरुवारी सकाळी शेतकरी विहिरीवर पाणी घेण्यासाठी गेले असता विहिरीत विषारी द्रव्याचा वास आल्याने ते पाणी तपासून पाहिले. यात विषारी द्रव्य असल्याचे त्यांच्या लक्षात आले व तातडीने याची माहिती गेवराई पोलीस ठाण्यात देण्यात आली. यावरून सकाळी गेवराई ठाण्याचे पोलीस सतीश खरात व परमेश्वर तागड यांनी घटनास्थळी भेट देवून विहिरीची पाहणी करून पंचनामा केला. तसेच पोलीस निरीक्षक बाळासाहेब बडे, नारायण खटाने यांनी घटनास्थळी भेट देऊन विहिरीची पाहणी केली. या पाण्यात टाकलेल्या विषारी द्रव्याच्या दोन बाटल्या जप्त करून पाण्याचे नमुने तपासणीसाठी आणले आहेत.या विहिरीवरून गावात तसेच देवपिंपरी, भाटआंतरवाली, कोमलवाडी, राजपिंपरी या गावात टँकरने पाणी नेले जाते. मात्र, गुरूवारी सकाळी टँकरवाला आला नसल्याने हे पाणी बाहेर गेले नाही. नाहीतर हे पाणी प्राशन केले असते तर मोठी दुर्घटना घडली असती. या प्रकरणी शेतकरी रावसाहेब शिंदे यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रि या सुरू होती.

टॅग्स :BeedबीडWaterपाणीCrime Newsगुन्हेगारी