शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

परळीच्या थर्मलला आधी पाण्याची तर आता कोळशाची टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 19:09 IST

संच क्रमांक ८ साठी कोळशाचा केवळ १० दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक आहे

ठळक मुद्देऔष्णिक विद्युत केंद्रात २५० मेगावॅट क्षमतेचे तीन संच आहेत.

- संजय खाकरे 

परळी : तालुक्यातील दाऊतपूर च्या  नवीन परळी औष्णिक विद्युत केंद्रातील 250 मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक ६ हा गेल्या पंधरा दिवसांपासून  कोळशाच्या तुटवड्या मुळे बंद ठेवण्यात आला आहे. सध्या एकच संच क्रमांक ७ हा चालू असून या संचातून बुधवारी दुपारी ५ वाजेच्या सुमारास १८४  मेगावॅट वीज निर्मिती चालू होती. संच क्रमांक ८ अनेक दिवसानंतर सुरू करण्याची प्रक्रिया चालू करण्यात आली आहे. संच क्रमांक ८ हा तीन दिवसात चालू होईल व त्यातून वीज निर्मिती सुरू होईल. मात्र संच क्रमांक ८ साठी कोळशाचा केवळ १० दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 

नवीन परळी औष्णिक विद्युत केंद्रात २५० मेगावॅट क्षमतेचे तीन संच आहेत. संच क्रमांक ६,७,८ या तीन संचाची स्थापित क्षमता एकूण ७५० मेगावॅट एवढी आहे. बुधवारी दुपारी यातील केवळ एकच संच चालू होता. यातून १८४ मेगावॅट वीज निर्मिती चालू होती. यामुळे नवीन परळी विद्युत  केंद्रात एकूण  ५६६ मेगावॅट ची तूट भासली. संच क्रमांक ६ हा कोळसा साठा शिल्लक नसल्याने पंधरा दिवसांपासून बंद ठेवला आहे. 

एका संचास दररोज लागतो ४ हजार टन कोळसा एका संचाला वीज निर्मितीसाठी दररोज ४ हजार टन कोळसा लागतो, चंद्रपूरच्या कोळसा खाणीतून दररोज रेल्वेचे एक रॅक कोळसा येत आहे. एका रॅक मध्ये ३५०० टन कोळसा असतो, तर कधी हैद्राबाद येथून कोळसा येतो. संच क्रमांक ८ च्या दुरुस्तीचे काम करण्यात आले आहे तो संच तीन दिवसात कार्यान्वित होईल. खडका बंधाऱ्यात जायकवाडी चे पाणी सोडल्या पासून परळीचे संच टप्प्याने सुरू करण्यात आले. पाण्याचा प्रश्न सुटला असता आता कोळशाचा तुटवडा भासला आहेत आहे. संचं क्रमांक 6 हा बंद ठेवला. 

कोळसा कमतरतेने संच क्रमांक ६ हा बंद ठेवला आहे. तर संच क्रमांक ८ तीन दिवसात सुरू होईल. यासाठी कोळसासाठा शिल्लक आहे. संच क्रमांक ८ सुरू झाल्यास वीज निर्मितीत वाढ होईल  - नवनाथ शिंदे, मुख्य अभियंता  

टॅग्स :BeedबीडelectricityवीजWaterपाणी