शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

परळीच्या थर्मलला आधी पाण्याची तर आता कोळशाची टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 19:09 IST

संच क्रमांक ८ साठी कोळशाचा केवळ १० दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक आहे

ठळक मुद्देऔष्णिक विद्युत केंद्रात २५० मेगावॅट क्षमतेचे तीन संच आहेत.

- संजय खाकरे 

परळी : तालुक्यातील दाऊतपूर च्या  नवीन परळी औष्णिक विद्युत केंद्रातील 250 मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक ६ हा गेल्या पंधरा दिवसांपासून  कोळशाच्या तुटवड्या मुळे बंद ठेवण्यात आला आहे. सध्या एकच संच क्रमांक ७ हा चालू असून या संचातून बुधवारी दुपारी ५ वाजेच्या सुमारास १८४  मेगावॅट वीज निर्मिती चालू होती. संच क्रमांक ८ अनेक दिवसानंतर सुरू करण्याची प्रक्रिया चालू करण्यात आली आहे. संच क्रमांक ८ हा तीन दिवसात चालू होईल व त्यातून वीज निर्मिती सुरू होईल. मात्र संच क्रमांक ८ साठी कोळशाचा केवळ १० दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 

नवीन परळी औष्णिक विद्युत केंद्रात २५० मेगावॅट क्षमतेचे तीन संच आहेत. संच क्रमांक ६,७,८ या तीन संचाची स्थापित क्षमता एकूण ७५० मेगावॅट एवढी आहे. बुधवारी दुपारी यातील केवळ एकच संच चालू होता. यातून १८४ मेगावॅट वीज निर्मिती चालू होती. यामुळे नवीन परळी विद्युत  केंद्रात एकूण  ५६६ मेगावॅट ची तूट भासली. संच क्रमांक ६ हा कोळसा साठा शिल्लक नसल्याने पंधरा दिवसांपासून बंद ठेवला आहे. 

एका संचास दररोज लागतो ४ हजार टन कोळसा एका संचाला वीज निर्मितीसाठी दररोज ४ हजार टन कोळसा लागतो, चंद्रपूरच्या कोळसा खाणीतून दररोज रेल्वेचे एक रॅक कोळसा येत आहे. एका रॅक मध्ये ३५०० टन कोळसा असतो, तर कधी हैद्राबाद येथून कोळसा येतो. संच क्रमांक ८ च्या दुरुस्तीचे काम करण्यात आले आहे तो संच तीन दिवसात कार्यान्वित होईल. खडका बंधाऱ्यात जायकवाडी चे पाणी सोडल्या पासून परळीचे संच टप्प्याने सुरू करण्यात आले. पाण्याचा प्रश्न सुटला असता आता कोळशाचा तुटवडा भासला आहेत आहे. संचं क्रमांक 6 हा बंद ठेवला. 

कोळसा कमतरतेने संच क्रमांक ६ हा बंद ठेवला आहे. तर संच क्रमांक ८ तीन दिवसात सुरू होईल. यासाठी कोळसासाठा शिल्लक आहे. संच क्रमांक ८ सुरू झाल्यास वीज निर्मितीत वाढ होईल  - नवनाथ शिंदे, मुख्य अभियंता  

टॅग्स :BeedबीडelectricityवीजWaterपाणी