शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

परळीच्या महिलेचा पुण्यात ठेचून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 23:44 IST

परळी तालुक्यातील लोणारवाडी येथील एका विवाहित महिलेस पाच जणांनी पळवून नेल्याची तक्रार तिच्या भावाने गतवर्षी मे महिन्यात पोलिसांना दिली होती. तब्बल नऊ महिन्यानंतर या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले असून सदर महिलेचा खून करण्यात आल्याचे उघड झाले आहे.

ठळक मुद्दे९ महिन्यानंतर उलगडा : नवऱ्याच्या अनैतिक संबंधामुळे माहेरच्यांच्या मदतीने विवाहितेने काढला काटा; प्रेत खड्ड्यात पुरले

बीड : परळी तालुक्यातील लोणारवाडी येथील एका विवाहित महिलेस पाच जणांनी पळवून नेल्याची तक्रार तिच्या भावाने गतवर्षी मे महिन्यात पोलिसांना दिली होती. तब्बल नऊ महिन्यानंतर या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले असून सदर महिलेचा खून करण्यात आल्याचे उघड झाले आहे. ज्या पुरुषांसोबत तिचे अनैतिक संबंध होते त्याच्या पत्नीनेच माहेरच्या लोकांच्या मदतीने तिचा काटा काढला.मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये परळी तालुक्यातील लोणारवाडी येथील विवाहित महिला शांताबाई (नाव बदलेले आहे) ही पती आणि भावासह पुण्यातील वाघोली भागात गवंडी कामानिमित्त गेली होती. याच कामावर सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील हराळवाडी येथील जनार्धन उर्फ जनाजी ढगेकर आणि त्याची पत्नी मैनाबाई ढगेकर हे देखील गवंडी कामानिमित्त वास्तव्यास होते. हे सर्वजण एकाच ठिकाणी राहत होते. या ठिकाणी शांताबाई आणि जनार्दन यांच्यात अनैतिक संबंध निर्माण झाले. परिणामी, जनार्दन आणि पत्नी मैनाबाई यांच्यात खटके उडू लागले. जनार्दन मैनाबाईचा छळ करू लागला. त्यामुळे त्रस्त मैनाबाईने ३ मे रोजी तिचा भाऊ संदीप सिदबा काळेल आणि अर्जुन आमोगसिद शेळके (दोघेही रा. हराळवाडी, ता. मोहळ, जि. सोलापूर) यांना फोन करून शांताबाईमुळे माझा संसार मोडत असल्याचे गाºहाणे मांडले. तुम्ही लवकर वाघोलीला या, मला खूप त्रास होत आहे, असेही तिने सांगितले. त्यामुळे संतप्त झालेल्या संदीप आणि अर्जुन यांनी लागलीच दुचाकीवरून (एमएच १४ - २१५०) वाघोली गाठले. त्याच दिवशी दुपारी ४ वाजता त्यांनी शांताबाईला भाजीपाला आणण्याच्या बहाण्याने दुचाकीवरून अर्धा किमी अंतरावर नेले. तिथे गाडीवरून खाली उतरवून तिला मारहाण करत तिचे नाक आणि तोंड दाबले. त्यांनतर तिला खाली पाडून डोक्यात दगड घालून तिला ठार मारले. शांताबाईचा मृत्यू झाल्याची खात्री पटल्यानंतर तिथेच एका खड्ड्यात तिचा मृतदेह पुरण्यात आला. त्यानंतर या घटनेबाबत मैनाबाई, संदीप आणि अर्जुन यांनी कुठेही वाच्यता केली नाही. मात्र, बहिणीचे काहीतरी बरेवाईट झाले असावा, या संशयाने शांताबाईच्या भावाने पोलिसात तक्रार दिली आणि तब्बल नऊ महिन्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला.दरम्यान, संदीप, अर्जुन आणि मैनाबाई या तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर पोलीस उपनिरीक्षक रमेश जाधवर यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील कार्यवाहीसाठी हा गुन्हा पुण्यातील लोणीकंद पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला असून, तिन्ही आरोपींनाही त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अंबाजोगाईचे अपर अधीक्षक अजित बोºहाडे, उपअधीक्षक सुरेश गायकवाड आणि संभाजीनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश कस्तुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रमेश जाधवर, अर्जुन राठोड यांनी या किचकट प्रकरणाचा उलगडा केला. सहाय्यक फौजदार कुरेवाड, पोलीस कर्मचारी लाला बडे, दत्ता गीते यांनी त्यांना मदत केली. बीड आणि पुणे पोलिसांचा समन्वय महत्त्वाचा ठरला.वरिष्ठांची मोलाची मदततपासादरम्यान पुणे, सोलापूर येथे अनेक चकरा झाल्या. काही वेळेस हद्दीचाही प्रश्न निर्माण झाला. परंतु, दोन्ही जिल्ह्यांतील सर्व वरिष्ठ अधिकाºयांनी एकमेकांशी समन्वय राखत पूर्ण मदत केल्यामुळे आणि संभाजीनगर ठाण्यातील पोलीस अधिकारी, कर्मचाºयांच्या सहकायार्मुळे खुनाचा छडा लागू शकला.- रमेश जाधवर, पोलीस उपनिरीक्षक,संभाजीनगर पोलीस ठाणे

टॅग्स :BeedबीडBeed policeबीड पोलीसMurderखून