शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

परळी-बीड-नगर मार्गास गती; ९० टक्के भूसंपादन पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 00:13 IST

बीड : बीड जिल्ह्याचे ६० वर्षांपासूनचे परळी-बीड-अहमदनगर रेल्वेमार्गाचे स्वप्न पूर्णत्वाच्या टप्प्यावर असून २०१९ पर्यंत या मार्गावर रेल्वे धावणार, असा आत्मविश्वास बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्याच्या ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी पत्रपरिषदेत व्यक्त केला.जिल्ह्यातील विविध खात्याच्या विकास कामांचा आढावा आज त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेतला. या बैठकीनंतर झालेल्या पत्रपरिषदेत ...

बीड : बीड जिल्ह्याचे ६० वर्षांपासूनचे परळी-बीड-अहमदनगर रेल्वेमार्गाचे स्वप्न पूर्णत्वाच्या टप्प्यावर असून २०१९ पर्यंत या मार्गावर रेल्वे धावणार, असा आत्मविश्वास बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्याच्या ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी पत्रपरिषदेत व्यक्त केला.

जिल्ह्यातील विविध खात्याच्या विकास कामांचा आढावा आज त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेतला. या बैठकीनंतर झालेल्या पत्रपरिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी खा.डॉ. प्रीतम मुंडे, आ. संगीता ठोंबरे, जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, भाजप जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे उपस्थित होते.

रेल्वेमार्गाच्या संदर्भात बोलताना त्या म्हणाल्या, या मार्गासाठीचे १३३४ हेक्टर जमिनीचे भूसंपादन झाले असून, जवळपास ३७६ कोटी रुपयांचा मावेजाही अदा करण्यात आला आहे. २०१ हेक्टर जमिनीचे भूसंपादन काही तांत्रिक कारणामुळे, जमिनीच्या कोर्ट कचेऱ्यातील वादामुळे बाकी आहे. हे भूसंपादनही अंतिम टप्प्यात आहे, असे त्या म्हणाल्या. या मार्गासाठी आवश्यक तेवढे भूसंपादन झाले असून, अतिरिक्त जागेची गरज नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

गेल्या ६० वर्षांपासूनचे बीड जिल्ह्याचे हे स्वप्न असून, ते आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. या संदर्भात संबंधित अधिकाºयांची बैठक घेऊन आढावा घेतला. राज्यस्तरावरील बहुतांश अडचणी दूर केल्या असून, केंद्रस्तरावरील प्रश्नासंदर्भात रेल्वेमंत्र्याशी चर्चा करून या कामास गती देणार, असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. सोलापूर-धुळे या राष्टÑीय महामार्गाचे जिल्ह्यात ७८ कि.मी. लांबीचे काम आहे. हे कामही पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. या मार्गाचेही १०० टक्के भूसंपादन झाले असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.बिंदुसरेवरील पूल १० जुलैपर्यंत पूर्ण होणारबीड शहरातून वाहणाºया बिंदूसरा नदीवरील पूल वाहून गेला होता. याठिकाणी उभारण्यात येणाºया नवीन पुलाचे कामही पूर्णत्वाच्या मार्गावर असून, येत्या १० जुलैपर्यंत हे काम पूर्ण होऊन हा पूल वाहतुकीसाठी खुला होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. या पुलाच्या बाबतीत अनेकांनी राजकारण केल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Beedबीडrailwayरेल्वेMarathwadaमराठवाडा