शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

'अकबर रोडवरून जाताना आक्रोश करावासा वाटतो', गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींने पंकजा भावुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 13:50 IST

लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त परळी येथील गोपीनाथ गडावर अभिवादानासाठी आज सकाळपासून अनुयायांची गर्दी झाली आहे.

परळी ( बीड) : दिल्ली येथील अकबर रोडवरून जाताना लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीने मन व्याकूळ होते, आक्रोश करावासा वाटतो पण त्यांनी दिलेल्या रडायचे नाही लढायचे या शिकवणीमुळे मी पुढे जाते, अशा शब्दात माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावर भावना व्यक्त केल्या.  लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त परळी येथील गोपीनाथ गडावर अभिवादानासाठी आज सकाळपासून अनुयायांची गर्दी झाली आहे. माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी राज्यातील गोपीनाथ गडावर येण्याऐवजी सर्वांनी आपापल्या परिसरात विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून गोपीनाथ गड गांवागांवात पोहोचवावा असं आवाहन केले होते. तसेच राज्यात घडलेल्या अप्रिय घटनांबद्दल गोपीनाथ गडावर अर्ध्या तासाचं मौन बाळगण्यात आले. राज्यातील जवळपास साडेपाचशे ठिकाणी देखील कार्यकर्त्यांनी मौन बाळगले. माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीने भावूक झाल्या. दिल्लीत अकबर रोडवरून जाताना वडिलांच्या आठवणीत थांबावे वाटते, आक्रोश करावा वाटतो. शेवटच्या काळात त्यांची काय अवस्था असेल याचा विचार करून मनसुन्न होते. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी कार्यकर्त्यांनी गोपीनाथ गडावर गर्दी केली. त्यामुळे दु:ख आवरून माईक हातात घ्यावा लागला. त्यानंतर रडायचे नाही लढायचे ही मुंडे यांची शिकवणी अंगिकारली.

...याचा मला राग येतो आतापर्यंत कधीच अभद्र बोलले नाही कोणा विषयी नाही. शत्रू विषयी नाही. मला खूप घाबरतात सगळे, दरारा आहे. प्रेम करता म्हणून लोक तत्व मोडीत काढतात तेव्हा मला राग येतो. मला काही तरी मिळवायचं म्हणून मी कुणासमोर जाणार नाही. मला जे मिळवायाचं ते मी मिळवलं. मला जिथे जायचं तिथे तुम्ही या, हे मी राजकारणात मिळवलं. मी थकणार नाही. मी थांबणार नाही. कोणासमोर कधी झुकणार नाही. काही लोक पदासाठी लोकांच्या पुढे-पुढे करतात. पण माझ्या रक्तात ते नाही. कालही नव्हतं आजही नाही, मी ऊतणार नाही. मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही, असंही पंकजा म्हणाल्या.

हा सुद्धा महापुरुषांचा अवमानमहापुरुषांपासून प्रेरणा घेऊन बोलायचं असतं. जर एखादा व्यक्ती चांगल्या भावनेनं बोलतो, पण जर एखादा शब्द खाली वर झाला तर त्याची आपण वाट पाहतो, आणि त्यावरून बोभाटा करतो हा सुद्धा महापुरुषांचा अवमान करणेच आहे. त्या व्यक्तीच्या भावना पोहोचल्याच नाही, हा सुद्धा महापुरुषांचा अवमान आहे. 

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेBeedबीडGopinath Mundeगोपीनाथ मुंडे