शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

पद्मश्री शब्बीरभाईंच्या एका डोळ्यात आनंदाश्रू तर, दुसऱ्या डोळ्यात चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 14:37 IST

भारत सरकारने घोषित केलेल्या पुरस्कारामध्ये यंदा प्रथमच बीड जिल्ह्याला दोन पद्मश्रीचे सन्मान मिळाले आहेत.

ठळक मुद्देदुष्काळात जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न बिकटदुष्काळामुळे शेणखतही विक्री होईना

- अनिल भंडारी 

बीड : भारत सरकारने बीड जिल्ह्यातील गोसेवेचे व्रत घेतलेल्या बीड जिल्ह्यातील शब्बीरभाईंना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. मात्र पुरस्कार मिळालेल्या शब्बीरभाईंच्या एका डोळ्यात आनंद तर दुसऱ्या डोळ्यात दुष्काळात जनावरांना चारा पाणी कोठून आणायचा अशी चिंता लागून राहिली आहे. 

दहिवंडी येथील शब्बीरभाईंचे कुटुंब व त्यांची गोसेवा प्रसारमाध्यमात उमटली होती. परंतू त्यांच्या या सेवेचा शोध घेत पद्मश्रीच्या रुपाने होणारा गौरव म्हणजे खऱ्या अर्थाने न्याय असाच म्हणावा लागेल. शब्बीरभाईंचे वडील बुढनभाई सय्यद यांनी चार पाच गायींवर गोपालन सुरु केले. त्याचा गोवर्धन शब्बीरभाईंनी (गावकरी त्यांना छबुभाई म्हणतात) व त्यांच्या कुटुंबाने उचलला. त्यांची मुलेही गोपालक म्हणूनच काम करतात. शब्बीरभाई, पत्नी अशरफबी, मुले रमजान व युसूफ, नातवं घरात कोणीही शिकलेले नाही. घरात सहा जण वयस्कर आहेत. मात्र सर्व कुटुंब गोसेवेसाठी झपाटलेले. 

आज तिसरी पिढी सुद्धा तेवढेच तन्मयतेने काम करीत असल्याचे शब्बीरभाईंनी सांगितले. पाच- सहा वर्षांपूर्वी जिल्हाधिकारी सुनिल केंद्रेकर यांनी शब्बीरभाईंची परीक्षा घेतली होती. ते साधा माणुस बनून त्यांचेकडे गेले व गाय मागितली. ४० हजार देतो, ५० हजार देतो म्हणाले आमचं उत्तर एकच होतं नाही. नंतर कळले, ते जिल्हाधिकारी सुनिल केंद्रेकर होते. 

बीड जिल्ह्याला प्रथमच दोन ‘पद्मश्री’भारत सरकारने घोषित केलेल्या पुरस्कारामध्ये यंदा प्रथमच बीड जिल्ह्याला दोन पद्मश्रीचे सन्मान मिळाले आहेत. यात केज तालुक्यातील दरडवाडीचे रहिवासी नाटककार वामन केंद्रे आणि शिरुर तालुक्यातील दहिवंडी येथील गोपालक शब्बीर सय्यद यांचा समावेश आहे. शंकरबापू आपेगावकर यांच्यानंतर तीन दशकांनी पुन्हा एकदा बीडचे नाव भारताच्या नकाशावर उंचावले

रुखासुखा खा के सब काम करते हैवासरांना पाणी, वैरण, निवारा उपलब्ध करताना आमचे हाल होतात. रुखा सुखा खाके सब करते, सगळा वनवासच असे अशरफबी म्हणाल्या. गायींना चरायला ६-७ किलोमीटर परिघातील डोंगरात नेले जाते. मुले ते काम करतात. विशेष म्हणजे १२० गायींचा सांभाळ हे कुटुंब करत असलेतरी एकीलाही वेसण नाही. दूध काढून विक्री ते करत नाहीत. शेणखताच्या विक्रीतून मिळणाऱ्या पैशातून चारा, वैरणाची व्यवस्था करतात. त्यातून उरलेल्या पैशावरच घर चालवतो. १२० गायींचा सांभाळ करताना वेळोवेळी अडचणी येतात. तीन पिढ्यांपासून हा वसा घेतला, इनको कैसे छोडना, ये छोडने का वक्त है क्या, शब्बीरभाई और हम दो नहीं एक है. सुनासुध्दा माझ्या बरोबरीने काम करतात. मां कुछ बोलू नको, तकदीर जाने असे मुले म्हणतात आणि कामात हातभार लावतात, असे अशरफबी म्हणाल्या. 

आयुष्यभराच्या गोसेवेचा हा सन्मानअख्खी जिंदगी गयी साब, तिसरी पिढी काम कर रही है. कोणत्याही बाबतीत भरवसा ठेवला तर त्या सेवेच फळ मिळते. आम्ही गायीवर भरवसा ठेवून काम केलं, त्या सेवेचं पद्मश्री पुरस्कार हे फळ आहे. पण यंदा दुष्काळामुळे कठीण परिस्थिती असल्याचे शब्बीरभाई म्हणाले.  

चारा खरीदने को पैसा नहीलोक गोऱ्हे मागतात, देतो पण विकू नका म्हणून आवर्जुन सांगतो. खताच्या विक्रीतूनच मुलाबाळांचे कपडे, धान्य घेतो. शेतकरी खत खरेदी करायचे पण दुष्काळामुळे त्यांचे दिवस वाईट आहेत. आता खत कुठे विकायचे. अब जानवरों को डालने को कुछ नहीं, चारा खरीदने को पैसा नही.- शब्बीरभाई

टॅग्स :droughtदुष्काळBeedबीडCentral Governmentकेंद्र सरकार