शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

पद्मश्री शब्बीरभाईंच्या एका डोळ्यात आनंदाश्रू तर, दुसऱ्या डोळ्यात चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 14:37 IST

भारत सरकारने घोषित केलेल्या पुरस्कारामध्ये यंदा प्रथमच बीड जिल्ह्याला दोन पद्मश्रीचे सन्मान मिळाले आहेत.

ठळक मुद्देदुष्काळात जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न बिकटदुष्काळामुळे शेणखतही विक्री होईना

- अनिल भंडारी 

बीड : भारत सरकारने बीड जिल्ह्यातील गोसेवेचे व्रत घेतलेल्या बीड जिल्ह्यातील शब्बीरभाईंना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. मात्र पुरस्कार मिळालेल्या शब्बीरभाईंच्या एका डोळ्यात आनंद तर दुसऱ्या डोळ्यात दुष्काळात जनावरांना चारा पाणी कोठून आणायचा अशी चिंता लागून राहिली आहे. 

दहिवंडी येथील शब्बीरभाईंचे कुटुंब व त्यांची गोसेवा प्रसारमाध्यमात उमटली होती. परंतू त्यांच्या या सेवेचा शोध घेत पद्मश्रीच्या रुपाने होणारा गौरव म्हणजे खऱ्या अर्थाने न्याय असाच म्हणावा लागेल. शब्बीरभाईंचे वडील बुढनभाई सय्यद यांनी चार पाच गायींवर गोपालन सुरु केले. त्याचा गोवर्धन शब्बीरभाईंनी (गावकरी त्यांना छबुभाई म्हणतात) व त्यांच्या कुटुंबाने उचलला. त्यांची मुलेही गोपालक म्हणूनच काम करतात. शब्बीरभाई, पत्नी अशरफबी, मुले रमजान व युसूफ, नातवं घरात कोणीही शिकलेले नाही. घरात सहा जण वयस्कर आहेत. मात्र सर्व कुटुंब गोसेवेसाठी झपाटलेले. 

आज तिसरी पिढी सुद्धा तेवढेच तन्मयतेने काम करीत असल्याचे शब्बीरभाईंनी सांगितले. पाच- सहा वर्षांपूर्वी जिल्हाधिकारी सुनिल केंद्रेकर यांनी शब्बीरभाईंची परीक्षा घेतली होती. ते साधा माणुस बनून त्यांचेकडे गेले व गाय मागितली. ४० हजार देतो, ५० हजार देतो म्हणाले आमचं उत्तर एकच होतं नाही. नंतर कळले, ते जिल्हाधिकारी सुनिल केंद्रेकर होते. 

बीड जिल्ह्याला प्रथमच दोन ‘पद्मश्री’भारत सरकारने घोषित केलेल्या पुरस्कारामध्ये यंदा प्रथमच बीड जिल्ह्याला दोन पद्मश्रीचे सन्मान मिळाले आहेत. यात केज तालुक्यातील दरडवाडीचे रहिवासी नाटककार वामन केंद्रे आणि शिरुर तालुक्यातील दहिवंडी येथील गोपालक शब्बीर सय्यद यांचा समावेश आहे. शंकरबापू आपेगावकर यांच्यानंतर तीन दशकांनी पुन्हा एकदा बीडचे नाव भारताच्या नकाशावर उंचावले

रुखासुखा खा के सब काम करते हैवासरांना पाणी, वैरण, निवारा उपलब्ध करताना आमचे हाल होतात. रुखा सुखा खाके सब करते, सगळा वनवासच असे अशरफबी म्हणाल्या. गायींना चरायला ६-७ किलोमीटर परिघातील डोंगरात नेले जाते. मुले ते काम करतात. विशेष म्हणजे १२० गायींचा सांभाळ हे कुटुंब करत असलेतरी एकीलाही वेसण नाही. दूध काढून विक्री ते करत नाहीत. शेणखताच्या विक्रीतून मिळणाऱ्या पैशातून चारा, वैरणाची व्यवस्था करतात. त्यातून उरलेल्या पैशावरच घर चालवतो. १२० गायींचा सांभाळ करताना वेळोवेळी अडचणी येतात. तीन पिढ्यांपासून हा वसा घेतला, इनको कैसे छोडना, ये छोडने का वक्त है क्या, शब्बीरभाई और हम दो नहीं एक है. सुनासुध्दा माझ्या बरोबरीने काम करतात. मां कुछ बोलू नको, तकदीर जाने असे मुले म्हणतात आणि कामात हातभार लावतात, असे अशरफबी म्हणाल्या. 

आयुष्यभराच्या गोसेवेचा हा सन्मानअख्खी जिंदगी गयी साब, तिसरी पिढी काम कर रही है. कोणत्याही बाबतीत भरवसा ठेवला तर त्या सेवेच फळ मिळते. आम्ही गायीवर भरवसा ठेवून काम केलं, त्या सेवेचं पद्मश्री पुरस्कार हे फळ आहे. पण यंदा दुष्काळामुळे कठीण परिस्थिती असल्याचे शब्बीरभाई म्हणाले.  

चारा खरीदने को पैसा नहीलोक गोऱ्हे मागतात, देतो पण विकू नका म्हणून आवर्जुन सांगतो. खताच्या विक्रीतूनच मुलाबाळांचे कपडे, धान्य घेतो. शेतकरी खत खरेदी करायचे पण दुष्काळामुळे त्यांचे दिवस वाईट आहेत. आता खत कुठे विकायचे. अब जानवरों को डालने को कुछ नहीं, चारा खरीदने को पैसा नही.- शब्बीरभाई

टॅग्स :droughtदुष्काळBeedबीडCentral Governmentकेंद्र सरकार