शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
5
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
6
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
7
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
8
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
9
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
10
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
11
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
12
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
13
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
14
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
15
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
16
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
17
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
18
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
19
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
20
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!

कोळगावच्या पेयजल योजनेची मूळ संचिका गहाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 00:42 IST

गेवराई तालुक्यातील कोळगाव येथील राष्ट्रीय पेयजल योजनेतील मोठे गौडबंगाल झाल्याचे समोर येत आहे. पाणीपुरवठा विभागाने मुळ संचिकाच गहाळ केल्याने संशय व्यक्त केला जात आहे

सोमनाथ खताळ ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : गेवराई तालुक्यातील कोळगाव येथील राष्ट्रीय पेयजल योजनेतील मोठे गौडबंगाल झाल्याचे समोर येत आहे. पाणीपुरवठा विभागाने मुळ संचिकाच गहाळ केल्याने संशय व्यक्त केला जात आहे. शिवाय येथील कार्यकारी अभियंत्यांनी महत्वाची संचिका गहाळ झाल्यानंतरही पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद देण्याऐवजी केवळ पोस्टाने तक्रार पाठवून हात झटकले आहेत. त्यामुळे ही योजना आणि यातील निधीमध्ये मोठा घोटाळा असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.पेयजल कार्यक्रमांतर्गत कोळगावला ९० लाख ९७ हजार ९५० रूपयांचा निधी मंजूर झाला. त्यामध्ये एक विहीर खोदली. तिला पाणी लागलेले नसतानाही पाईपलाईन केली. काम बोगस करून २०११ मध्ये कार्यरत संबंधित अधिकारी आणि समितीचे अध्यक्ष, सचिवाने २४ लाख रूपयांचा पहिला हप्ता घेतला. या कामाची माजी सरपंच उद्धव रासकर यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडे तक्रार केली. याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले, मात्र चौकशी झाली नसल्याचे रासकर यांचे म्हणणे आहे. गत ९ वर्षांपासून अद्यापही या योजनेचा निकाल लागलेला नसून यासंदर्भात अनेक तक्रारी पाणीपुरवठा विभागाकडे प्राप्त झाल्याचे सूत्रांनी सांगितले.दरम्यान, या योजनेचा १४ लाख रूपयांचा दुसरा हप्ता वर्ग करावयाचा आहे. मात्र, यामध्ये मोठा घोटाळा असल्याचे समोर येऊ नये, यासाठी संबंधित कर्मचारी, अधिकाऱ्यांनी ही मुळ संचिकाच गहाळ करून टाकली आहे. यामध्ये सर्व तक्रारी आणि पुरावे असल्याचे सांगण्यात येते. धनादेशास आवश्यक कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती स्वत:च्या ताब्यात ठेवल्याचा आरोप रासकर यांनी केला आहे. त्यांनी यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रारही दिली आहे.संचिका गहाळ झाल्याचे समजताच संबंधित कर्मचारी, अधिका-यांची कार्यालयीन पातळीवर चौकशी करणे अपेक्षित होते. मात्र कसलीही चौकशी न करता थेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. शासकीय दस्ताऐवज गहाळ झाल्यास पोलीस ठाण्यात फिर्याद देणे अपेक्षित आहे. त्यात कधी व कोठून हरवली, याचा उल्लेखही असणे आवश्यक होते. मात्र कार्यकारी अभियंत्यांकडून ठाण्यात आलेल्या पत्रात असे काहीच नमूद केलेले नसल्याचे सांगण्यात आले. यावरून हा सर्व खटाटोप केवळ १४ लाख रूपयांचा दुसरा हप्ता हडप करण्यासाठी केला जात असल्याचे दिसून येत आहे. याची चौकशी करण्याची मागणीही माजी सरपंच उद्धव रासकर यांनी केली आहे.चौकशी न करता ठाण्यात तक्रार कशी?ज्या विभागातून संचिका गहाळ झाली, संबंधित कर्मचारी कोण, कधी गहाळ झाली, याला जबाबदार कोण, यासंदर्भात कार्यालयीन चौकशी करणे अपेक्षित असते. मात्र वरिष्ठांनी असे काहीच करता संबंधिताला पाठिशी घालण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Waterपाणीgovernment schemeसरकारी योजनाCrime Newsगुन्हेगारी