शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

विरोधकांच्या अफवा, भूलथापांचा मतदारांवर परिणाम होणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 00:00 IST

सुजाण मतदार या अफवांना बळी पडणार नसून विकासाला मतदान करणार आहेत, असे प्रतिपादन बीड विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांनी केले.

ठळक मुद्देजयदत्त क्षीरसागर। विधानसभा निवडणूक म्हणजे पोरखेळ नाही

बीड : निवडणूक समोर ठेवून विकासाच्या चांगल्या कामात विरोधकांकडून भांडवल केले जात आहे. केवळ विरोधाला विरोध आणि व्यक्तीद्वेषातून आमच्या विरोधात राजकारण करून जनतेची आणि मतदारांची दिशाभूल केली जात आहे. परंतु, सुजाण मतदार या अफवांना बळी पडणार नसून विकासाला मतदान करणार आहेत, असे प्रतिपादन बीड विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांनी केले. विधानसभा निवडणूक म्हणजे पोरखेळ नाही,असेही ते म्हणाले.बीड शहरातील विविध ठिकाणी घेतलेल्या सभेत ते बोलत होते.जनतेला चांगल्या प्रकारे नागरी सुविधा मिळाव्यात म्हणून अमृत अटल पाणीपुरवठा आणि भूमिगत गटार योजनेचे काम हाती घेतले आहे. भविष्याचा विचार करून कायमस्वरूपी चांगले काम व्हावे, यासाठी शहरातील रस्ते खोदून पाईप लाईन टाकण्यात येत आहे. संभाव्य पावसाळा लक्षात घेता हे काम लांबविले होते, परंतु, विरोधकांनी उपोषणे करून प्रशासनावर दबाव आणल्यामुळे हे काम सुरु करावे लागले. शासनाने जीवन प्राधिकरणकडे ही कामे दिली आहेत. परंतु, गुत्तेदारामार्फत अतिशय संथगतीने हे काम सुरू असल्यामुळे जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. परंतु, विरोधकांकडून याचे भांडवल केले जात असल्याचे बीड विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांनी सांगितले.नगर पालिकेच्या कार्यक्षेत्रात आणि माझ्या आमदारकीच्या काळात झालेली विकास कामे जनतेला माहीत असल्यामुळेच मतदार अशा अफवा, भूलथापांना बळी पडत नाहीत, असेही जयदत्तअण्णा म्हणाले. बीड पालिकेने गेल्या तीन वर्षात विकासाच्या अनेक योजना शासनाकडून मंजूर करून घेतल्या गेल्या. त्याची कामे आज चालू आहेत, जनतेच्या अडीअडचणीला कर्तव्य समजून आम्हीच धाऊन येतोत, हे संपूर्ण बीड मतदार संघाला माहीत आहे. त्यामुळे विरोधकांच्या अपप्रचाराचा मतदारांवर काहीही परिणाम होणार नाही, असेही जयदत्तअण्णा म्हणाले.

टॅग्स :BeedबीडMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019beed-acबीडJaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागर