शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

विरोधकांच्या अफवा, भूलथापांचा मतदारांवर परिणाम होणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 00:00 IST

सुजाण मतदार या अफवांना बळी पडणार नसून विकासाला मतदान करणार आहेत, असे प्रतिपादन बीड विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांनी केले.

ठळक मुद्देजयदत्त क्षीरसागर। विधानसभा निवडणूक म्हणजे पोरखेळ नाही

बीड : निवडणूक समोर ठेवून विकासाच्या चांगल्या कामात विरोधकांकडून भांडवल केले जात आहे. केवळ विरोधाला विरोध आणि व्यक्तीद्वेषातून आमच्या विरोधात राजकारण करून जनतेची आणि मतदारांची दिशाभूल केली जात आहे. परंतु, सुजाण मतदार या अफवांना बळी पडणार नसून विकासाला मतदान करणार आहेत, असे प्रतिपादन बीड विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांनी केले. विधानसभा निवडणूक म्हणजे पोरखेळ नाही,असेही ते म्हणाले.बीड शहरातील विविध ठिकाणी घेतलेल्या सभेत ते बोलत होते.जनतेला चांगल्या प्रकारे नागरी सुविधा मिळाव्यात म्हणून अमृत अटल पाणीपुरवठा आणि भूमिगत गटार योजनेचे काम हाती घेतले आहे. भविष्याचा विचार करून कायमस्वरूपी चांगले काम व्हावे, यासाठी शहरातील रस्ते खोदून पाईप लाईन टाकण्यात येत आहे. संभाव्य पावसाळा लक्षात घेता हे काम लांबविले होते, परंतु, विरोधकांनी उपोषणे करून प्रशासनावर दबाव आणल्यामुळे हे काम सुरु करावे लागले. शासनाने जीवन प्राधिकरणकडे ही कामे दिली आहेत. परंतु, गुत्तेदारामार्फत अतिशय संथगतीने हे काम सुरू असल्यामुळे जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. परंतु, विरोधकांकडून याचे भांडवल केले जात असल्याचे बीड विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांनी सांगितले.नगर पालिकेच्या कार्यक्षेत्रात आणि माझ्या आमदारकीच्या काळात झालेली विकास कामे जनतेला माहीत असल्यामुळेच मतदार अशा अफवा, भूलथापांना बळी पडत नाहीत, असेही जयदत्तअण्णा म्हणाले. बीड पालिकेने गेल्या तीन वर्षात विकासाच्या अनेक योजना शासनाकडून मंजूर करून घेतल्या गेल्या. त्याची कामे आज चालू आहेत, जनतेच्या अडीअडचणीला कर्तव्य समजून आम्हीच धाऊन येतोत, हे संपूर्ण बीड मतदार संघाला माहीत आहे. त्यामुळे विरोधकांच्या अपप्रचाराचा मतदारांवर काहीही परिणाम होणार नाही, असेही जयदत्तअण्णा म्हणाले.

टॅग्स :BeedबीडMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019beed-acबीडJaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागर