शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
4
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
5
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
6
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
7
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
8
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
9
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
10
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
11
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
12
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
13
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
14
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
15
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
16
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
17
‘निवडणूकपूर्व’साठी राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) अनुत्सुक; निवडणुकीनंतर युती करण्याला मात्र पसंती
18
४८ हजार जणांनी म्हटले, दुबार मतदान करणार नाही
19
‘अमेरिकन ड्रीम’ला H-1B व्हिसाचे नख लागते, तेव्हा...
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्ह्यात ५६ दिवस पुरेल एवढाच चारा शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 23:51 IST

प्रभात बुडूख ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. खरीप पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असून, कापसाची पहिली वेचणी देखील जिल्ह्यात अनेक ठिकाणी होऊ शकणार नाही. पिकांची ही परिस्थिती असताना जनावरांच्या चाºयाचा प्रश्न देखील गंभीर होऊ लागला आहे. दुष्काळसदृष्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शिल्लक ...

ठळक मुद्देदुष्काळसदृष्य परिस्थिती : प्रशासनाने मागवला अहवाल

प्रभात बुडूख ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. खरीप पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असून, कापसाची पहिली वेचणी देखील जिल्ह्यात अनेक ठिकाणी होऊ शकणार नाही. पिकांची ही परिस्थिती असताना जनावरांच्या चाºयाचा प्रश्न देखील गंभीर होऊ लागला आहे. दुष्काळसदृष्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शिल्लक असणाºया चाºयाची माहिती शासनाच्या वतीने मागवण्यात आली आहे.संपूर्ण जिल्ह्यात ८ लाख २२ हजार ३६४ जनावरांची संख्या आहे. यामध्ये गाय व म्हैस वर्ग यांचा समावेश आहे. खरीप हंगामामध्ये खरीपाची ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन व इतर कडधान्य या पिकांपासून चारा निर्मिती मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता होती. मात्र, पाऊस न झाल्यामुळे पिकांची वाढ पूर्ण झाली नाही. त्यामुळे खरीप हंगामामध्ये होणारी चारा निर्मिती ही अंदाजापेक्षा कमी प्रमाणात झाली आहे, खरीपांची पिके सोडून अंदाजे ५६ दिवस पुरेल इतकाच चारा शिल्लक आहे. त्यामुळे पुढील काळात चाºयाची टंचाई भासेल असे मत शेती तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.खरीप हंगामात ६ लाख ५८ हजार २४० हेक्टर पिकांची तर ४९ हजार ६९० हेक्टरवर ऊस पिकाची लागवड करण्यात आली आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली. कृषी विभागाने दिलेल्या पीक पेरा अहवालाच्या आधारावर जिल्ह्यात किती चारा शिल्लक आहे, याची माहिती पशुसंवर्धन विभाग प्रशासनाला कळवणार आहे. या संपूर्ण माहितीचा अहवाल जिल्हाधिकाºयामार्फत मंत्रालयात पाठवला जाणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीवरच टंचाईच्या काळात जनावरांसाठी चारा, पाणी व इतर व्यवस्था व उपाययोजना शासनस्तरावर होणार आहे. परंतु चाºयाचा अहवाल नजरी आणेवारीप्रमाणे देऊ नये प्रत्यक्ष परिस्थिती पाहून चारा किती शिल्लक आहे याची माहिती शासनाला द्यावी अशी नागरिकांची मागणी आहे.२०१६ साली प्रशासनाच्या वतीने ठोकताळे वापरुन शिल्लक चाºयाची माहिती शासनाकडे पाठवली होती. परंतु ती माहिती योग्य नसल्यामुळे शासनाने सुरु केलेल्या चारा छावण्या बंद केल्या होत्या. त्यानंतर मात्र टंचाई परिस्थिती पाहून पुन्हा चारा छावण्या सुरू करण्याची वेळ शासनावर आली होती. अहवाल चुकीचा असल्यामुळे ही वेळ शासनावर आली होती. यावर्षी ही वेळ येऊ नये, योग्य पद्धतीने पाहणी करून शिल्लक चाºयाची माहिती शासनाला कळवावी, अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे.जिल्हाभरात जनावरांची संख्या 822364खरीपाचा पेरा ६ लाख ५८ हजार २४० हेक्टरऊस लागवड ४९ हजार ६९० हेक्टर

टॅग्स :BeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्र