शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
4
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
5
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
6
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
7
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
8
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
9
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
10
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
11
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
12
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
13
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
14
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
15
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
16
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
17
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
18
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
19
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले

बीड जिल्ह्यात ५६ दिवस पुरेल एवढाच चारा शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 23:51 IST

प्रभात बुडूख ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. खरीप पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असून, कापसाची पहिली वेचणी देखील जिल्ह्यात अनेक ठिकाणी होऊ शकणार नाही. पिकांची ही परिस्थिती असताना जनावरांच्या चाºयाचा प्रश्न देखील गंभीर होऊ लागला आहे. दुष्काळसदृष्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शिल्लक ...

ठळक मुद्देदुष्काळसदृष्य परिस्थिती : प्रशासनाने मागवला अहवाल

प्रभात बुडूख ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. खरीप पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असून, कापसाची पहिली वेचणी देखील जिल्ह्यात अनेक ठिकाणी होऊ शकणार नाही. पिकांची ही परिस्थिती असताना जनावरांच्या चाºयाचा प्रश्न देखील गंभीर होऊ लागला आहे. दुष्काळसदृष्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शिल्लक असणाºया चाºयाची माहिती शासनाच्या वतीने मागवण्यात आली आहे.संपूर्ण जिल्ह्यात ८ लाख २२ हजार ३६४ जनावरांची संख्या आहे. यामध्ये गाय व म्हैस वर्ग यांचा समावेश आहे. खरीप हंगामामध्ये खरीपाची ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन व इतर कडधान्य या पिकांपासून चारा निर्मिती मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता होती. मात्र, पाऊस न झाल्यामुळे पिकांची वाढ पूर्ण झाली नाही. त्यामुळे खरीप हंगामामध्ये होणारी चारा निर्मिती ही अंदाजापेक्षा कमी प्रमाणात झाली आहे, खरीपांची पिके सोडून अंदाजे ५६ दिवस पुरेल इतकाच चारा शिल्लक आहे. त्यामुळे पुढील काळात चाºयाची टंचाई भासेल असे मत शेती तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.खरीप हंगामात ६ लाख ५८ हजार २४० हेक्टर पिकांची तर ४९ हजार ६९० हेक्टरवर ऊस पिकाची लागवड करण्यात आली आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली. कृषी विभागाने दिलेल्या पीक पेरा अहवालाच्या आधारावर जिल्ह्यात किती चारा शिल्लक आहे, याची माहिती पशुसंवर्धन विभाग प्रशासनाला कळवणार आहे. या संपूर्ण माहितीचा अहवाल जिल्हाधिकाºयामार्फत मंत्रालयात पाठवला जाणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीवरच टंचाईच्या काळात जनावरांसाठी चारा, पाणी व इतर व्यवस्था व उपाययोजना शासनस्तरावर होणार आहे. परंतु चाºयाचा अहवाल नजरी आणेवारीप्रमाणे देऊ नये प्रत्यक्ष परिस्थिती पाहून चारा किती शिल्लक आहे याची माहिती शासनाला द्यावी अशी नागरिकांची मागणी आहे.२०१६ साली प्रशासनाच्या वतीने ठोकताळे वापरुन शिल्लक चाºयाची माहिती शासनाकडे पाठवली होती. परंतु ती माहिती योग्य नसल्यामुळे शासनाने सुरु केलेल्या चारा छावण्या बंद केल्या होत्या. त्यानंतर मात्र टंचाई परिस्थिती पाहून पुन्हा चारा छावण्या सुरू करण्याची वेळ शासनावर आली होती. अहवाल चुकीचा असल्यामुळे ही वेळ शासनावर आली होती. यावर्षी ही वेळ येऊ नये, योग्य पद्धतीने पाहणी करून शिल्लक चाºयाची माहिती शासनाला कळवावी, अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे.जिल्हाभरात जनावरांची संख्या 822364खरीपाचा पेरा ६ लाख ५८ हजार २४० हेक्टरऊस लागवड ४९ हजार ६९० हेक्टर

टॅग्स :BeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्र