शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्ह्यात ५६ दिवस पुरेल एवढाच चारा शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 23:51 IST

प्रभात बुडूख ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. खरीप पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असून, कापसाची पहिली वेचणी देखील जिल्ह्यात अनेक ठिकाणी होऊ शकणार नाही. पिकांची ही परिस्थिती असताना जनावरांच्या चाºयाचा प्रश्न देखील गंभीर होऊ लागला आहे. दुष्काळसदृष्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शिल्लक ...

ठळक मुद्देदुष्काळसदृष्य परिस्थिती : प्रशासनाने मागवला अहवाल

प्रभात बुडूख ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. खरीप पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असून, कापसाची पहिली वेचणी देखील जिल्ह्यात अनेक ठिकाणी होऊ शकणार नाही. पिकांची ही परिस्थिती असताना जनावरांच्या चाºयाचा प्रश्न देखील गंभीर होऊ लागला आहे. दुष्काळसदृष्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शिल्लक असणाºया चाºयाची माहिती शासनाच्या वतीने मागवण्यात आली आहे.संपूर्ण जिल्ह्यात ८ लाख २२ हजार ३६४ जनावरांची संख्या आहे. यामध्ये गाय व म्हैस वर्ग यांचा समावेश आहे. खरीप हंगामामध्ये खरीपाची ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन व इतर कडधान्य या पिकांपासून चारा निर्मिती मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता होती. मात्र, पाऊस न झाल्यामुळे पिकांची वाढ पूर्ण झाली नाही. त्यामुळे खरीप हंगामामध्ये होणारी चारा निर्मिती ही अंदाजापेक्षा कमी प्रमाणात झाली आहे, खरीपांची पिके सोडून अंदाजे ५६ दिवस पुरेल इतकाच चारा शिल्लक आहे. त्यामुळे पुढील काळात चाºयाची टंचाई भासेल असे मत शेती तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.खरीप हंगामात ६ लाख ५८ हजार २४० हेक्टर पिकांची तर ४९ हजार ६९० हेक्टरवर ऊस पिकाची लागवड करण्यात आली आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली. कृषी विभागाने दिलेल्या पीक पेरा अहवालाच्या आधारावर जिल्ह्यात किती चारा शिल्लक आहे, याची माहिती पशुसंवर्धन विभाग प्रशासनाला कळवणार आहे. या संपूर्ण माहितीचा अहवाल जिल्हाधिकाºयामार्फत मंत्रालयात पाठवला जाणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीवरच टंचाईच्या काळात जनावरांसाठी चारा, पाणी व इतर व्यवस्था व उपाययोजना शासनस्तरावर होणार आहे. परंतु चाºयाचा अहवाल नजरी आणेवारीप्रमाणे देऊ नये प्रत्यक्ष परिस्थिती पाहून चारा किती शिल्लक आहे याची माहिती शासनाला द्यावी अशी नागरिकांची मागणी आहे.२०१६ साली प्रशासनाच्या वतीने ठोकताळे वापरुन शिल्लक चाºयाची माहिती शासनाकडे पाठवली होती. परंतु ती माहिती योग्य नसल्यामुळे शासनाने सुरु केलेल्या चारा छावण्या बंद केल्या होत्या. त्यानंतर मात्र टंचाई परिस्थिती पाहून पुन्हा चारा छावण्या सुरू करण्याची वेळ शासनावर आली होती. अहवाल चुकीचा असल्यामुळे ही वेळ शासनावर आली होती. यावर्षी ही वेळ येऊ नये, योग्य पद्धतीने पाहणी करून शिल्लक चाºयाची माहिती शासनाला कळवावी, अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे.जिल्हाभरात जनावरांची संख्या 822364खरीपाचा पेरा ६ लाख ५८ हजार २४० हेक्टरऊस लागवड ४९ हजार ६९० हेक्टर

टॅग्स :BeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्र