शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
2
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
3
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
4
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
5
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
6
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
7
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
8
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
9
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
10
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
11
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
12
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
13
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
14
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
15
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
16
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
17
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!
18
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
19
रक्षाबंधन सणासाठी जाताना अपघात; आई-वडीलांच्या डोळ्यांदेखत चिमुकल्याचा मृत्यू, गडचिरोलीतील घटना
20
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये फक्त 28 प्रस्ताव मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 13:35 IST

अपघातग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यात येते.

ठळक मुद्देवर्षभरात १११ प्रस्ताव दाखल कंपनीच्या हलगर्जीपणामुळे ७० प्रस्ताव रखडले

- प्रभात बुडूख

बीड : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेद्वारे १० डिसेंबर ते ९ डिसेंबर या कालावधीत १११ शेतकरी अपघात प्रकरणे पाठवण्यात आली होती. मात्र, त्यापैकी फक्त २८ प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. कंपनीच्या हलगर्जीपणामुळे इतर ७० प्रस्ताव रखडले आहेत.

शेतात काम करत असताना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्ता अपघात,वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणांमुळे होणारे अपघात यामुळे बऱ्याचदा शेतकऱ्याचा मृत्यू होतो. तसेच अपंगत्व येते, घरातील कर्त्या व्यक्तीस झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्नचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते. या अपघातग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यात येते. यासाठी मागील वर्षात जिल्ह्यातून १११ प्रस्ताव कृषी विभागाकडे पाठवण्यात आले. त्यानुसार कृषी विभागाने जायका इन्शुरन्स ब्रोकर्स प्रा.लि.नागपूर व दि युनिव्हर्सल सोम्पा जनरल इंन्शुनरंन्स कंपनी ली. याकडे मंजुरीसाठी पाठवले होते. मात्र, वर्ष उलटून देखील यामधील फक्त २८ प्रस्ताव मंजुर करण्यात आले आहेत तर २ प्रस्ताव नाकारण्यात आले आहेत. यापैकी ११ प्रस्तावांमध्ये त्रुटीत आहेत. तर ७० प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहेत. असे जवळपास ८१ प्रस्ताव विमा कंपनीच्या हलर्गीपणामुळे रखडलेले आहेत. यामुळे शासनाने विमा उतरवलेला असताना देखील अपघातग्रस्त शेतकरी आर्थिक लाभापासून वंचित आहेत.

यांना आहे विमा संरक्षणया योजनेसाठी १० डिसेंबर २०१९ ते ९ डिसेंबर २०२० या कालावधीत राज्यातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी व शेतकऱ्यांच्या कुटुंबातील वहितीधारक खातेदार मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती असे १० ते ७५ वर्ष वयोगाटातील दोघांना या अपघाती विमा योजना लाभ घेता येतो. दरम्यान या योजनाचा कालावधी ९ डिसेंबर २०२० रोजी संपला असला तरी १ मार्चपर्यंत म्हणजे ३ महिने अपघात विमा योजनेसाठी अर्ज दाखल करण्याची सुट शेतकऱ्यांना आहे.

विम्यापोटी कंपनीस दिले ९८ कोटीराज्यातील शेतकरी व कुटुंबातील वहितीधारक खातेदार शेतकऱ्याच्या विमा संरक्षणापोटी शासनाने कंपनी व विमा सल्लागार कंपनीत रक्कम भरलेली आहे. त्यामध्ये राज्यातील ३.०४ कोटी शेतकरी, कुटुंबातील सदस्यांच्या विम्यापोटी दि युनिव्हर्सल जनरल इन्शुरंन्स कंपनी लि. व जायका इन्शुरन्स ब्रोकरेज प्रा.लि. या कंपनीत ९८ कोटी ५ लाख ८३४ रुपये भरलेले आहेत. मात्र, त्या तुलनेत शेतकऱ्यांना लाभ देण्याचे प्रमाण मात्र अत्याल्प आहे.

विमा लाभ मिळण्यासाठी कंपनीकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. पत्रव्यावहार देखील करण्यात आला आहे. त्यानुसार विम्याचा लाभ लवकर मिळेल असा विश्वास आहे. - एस.एम साळवे, जिल्हा कृषी अधीक्षक (प्रभारी)

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रBeedबीड