शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

माजलगावं धरणात केवळ १८ टक्केच पाणीसाठा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 19:15 IST

 वाढलेल्या उन्हाच्या तीव्रतेमुळे माजलगांव धरणातील पाणीसाठा कमालीचा खालावत चालला आहे. सध्या माजलगांव धरणात केवळ १८ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

माजलगांव  (बीड ) :  वाढलेल्या उन्हाच्या तीव्रतेमुळे माजलगांव धरणातील पाणीसाठा कमालीचा खालावत चालला आहे. सध्या माजलगांव धरणात केवळ १८ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. उन्हाळ्याचा आणखी एक महिना शिल्लक असल्याने प्रशासनाकडुन धरणातील साठा पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्याची तयारी सुरु झाली आहे. 

गेल्यावर्षी परतीच्या पावसामुळे माजलगांव धरण हे १०० टक्के भरले होते यामुळे शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. पाण्याची उपलब्धता झाल्यामुळे परिसरात मोठया प्रमाणावर उसाची लागवड झाली. त्यासाठी व इतर पिकांसाठी माजलगांव धरणातुन पाच पाणीपाळया देण्यात आल्या. यात खरीपासाठी एक तर रब्बीसाठी चार पाळया देण्यात आल्या. उन्हाळी पाळया आता पर्यंत 3 देण्यात आल्या असुन अजुन एक पाळी देणे बाकी आहे. धरणाच्या बॅक वाॅटरवरुन बीड शहर, माजलगांव शहर व इतर आजुबाजुचे खेडेपाडयांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. तसेच धरणातुन अनेक शेतक-यांनी पाईपलाईनद्वारे आपल्या शेतीसाठी पाणी घेतलेले आहे.  यातील ९० टक्के शेतक-यांनी कसल्याही प्रकारचा परवाना न घेता पाणी उपसा सुरु ठेवलेला आहे. 

४ मिटरने खालावली पातळी माजलगांव धरणाची एकुण पाणसाठयाची क्षमता ही ४३१.८० मिटर एवढी आहे. आज सकाळी ८ वाजेपर्यंत ही पाणी पातळी ४२७.६० मिटरवर आली आहे. धरणाची पातळी ४ मिटरपेक्षा जास्त खालावली आहे. धरणामध्ये एकुण साठा २०६.२०  द.ल.घ.मि. असुन पैकी जिवंत साठा हा ६४. २०  द.ल.घ.मी. म्हणजेच १८. ५९ टक्के इतका राहिलेला आहे. माजलगांव धरणातुन दररोज ०.५३५ द.ल.घ.मी. येवढे पाणी पिण्यासाठी तसेच बाष्पीभवनामुळे उत्सर्जीत होत आहे. 

एकंदरीत माजलगांव धरणातील पाणी साठयाची उपलब्धता पाहता भविष्यात शेतक-यांना एक उन्हाळी पाळी दिल्यास जिवंत पाणीसाठयामध्ये मोठी घट होणार असुन प्रशासकिय पातळीवर पाणीपाळी द्यावी किंवा नाही या बाबत विचारविनिमय होत आहे. मात्र पावसाळा सुरु होण्यासाठी अजुनही एक महिन्याचा कालावधी असल्यामुळे पाणी पाळी शेतक-यांना न दिल्यास त्यांचे देखील मोठे नुकसान होणार असल्याचे दिसुन येते. 

पाणी जाऊन वापरावे माजलगांव धरणातील पाणी साठा हा पुरेसा असला तरी नागरीकांनी व शेतक-यांनी पाण्याचा वापर हा जपुन केल्यास भविष्यात पाण्यासाठी अडचणी होणार नाहीत.-  राजेंद्र दहातोंडे, धरण अभियंता  

टॅग्स :Majalgaon Damमाजलगाव धरणwater shortageपाणीटंचाईdroughtदुष्काळ