शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

माजलगावं धरणात केवळ १८ टक्केच पाणीसाठा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 19:15 IST

 वाढलेल्या उन्हाच्या तीव्रतेमुळे माजलगांव धरणातील पाणीसाठा कमालीचा खालावत चालला आहे. सध्या माजलगांव धरणात केवळ १८ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

माजलगांव  (बीड ) :  वाढलेल्या उन्हाच्या तीव्रतेमुळे माजलगांव धरणातील पाणीसाठा कमालीचा खालावत चालला आहे. सध्या माजलगांव धरणात केवळ १८ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. उन्हाळ्याचा आणखी एक महिना शिल्लक असल्याने प्रशासनाकडुन धरणातील साठा पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्याची तयारी सुरु झाली आहे. 

गेल्यावर्षी परतीच्या पावसामुळे माजलगांव धरण हे १०० टक्के भरले होते यामुळे शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. पाण्याची उपलब्धता झाल्यामुळे परिसरात मोठया प्रमाणावर उसाची लागवड झाली. त्यासाठी व इतर पिकांसाठी माजलगांव धरणातुन पाच पाणीपाळया देण्यात आल्या. यात खरीपासाठी एक तर रब्बीसाठी चार पाळया देण्यात आल्या. उन्हाळी पाळया आता पर्यंत 3 देण्यात आल्या असुन अजुन एक पाळी देणे बाकी आहे. धरणाच्या बॅक वाॅटरवरुन बीड शहर, माजलगांव शहर व इतर आजुबाजुचे खेडेपाडयांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. तसेच धरणातुन अनेक शेतक-यांनी पाईपलाईनद्वारे आपल्या शेतीसाठी पाणी घेतलेले आहे.  यातील ९० टक्के शेतक-यांनी कसल्याही प्रकारचा परवाना न घेता पाणी उपसा सुरु ठेवलेला आहे. 

४ मिटरने खालावली पातळी माजलगांव धरणाची एकुण पाणसाठयाची क्षमता ही ४३१.८० मिटर एवढी आहे. आज सकाळी ८ वाजेपर्यंत ही पाणी पातळी ४२७.६० मिटरवर आली आहे. धरणाची पातळी ४ मिटरपेक्षा जास्त खालावली आहे. धरणामध्ये एकुण साठा २०६.२०  द.ल.घ.मि. असुन पैकी जिवंत साठा हा ६४. २०  द.ल.घ.मी. म्हणजेच १८. ५९ टक्के इतका राहिलेला आहे. माजलगांव धरणातुन दररोज ०.५३५ द.ल.घ.मी. येवढे पाणी पिण्यासाठी तसेच बाष्पीभवनामुळे उत्सर्जीत होत आहे. 

एकंदरीत माजलगांव धरणातील पाणी साठयाची उपलब्धता पाहता भविष्यात शेतक-यांना एक उन्हाळी पाळी दिल्यास जिवंत पाणीसाठयामध्ये मोठी घट होणार असुन प्रशासकिय पातळीवर पाणीपाळी द्यावी किंवा नाही या बाबत विचारविनिमय होत आहे. मात्र पावसाळा सुरु होण्यासाठी अजुनही एक महिन्याचा कालावधी असल्यामुळे पाणी पाळी शेतक-यांना न दिल्यास त्यांचे देखील मोठे नुकसान होणार असल्याचे दिसुन येते. 

पाणी जाऊन वापरावे माजलगांव धरणातील पाणी साठा हा पुरेसा असला तरी नागरीकांनी व शेतक-यांनी पाण्याचा वापर हा जपुन केल्यास भविष्यात पाण्यासाठी अडचणी होणार नाहीत.-  राजेंद्र दहातोंडे, धरण अभियंता  

टॅग्स :Majalgaon Damमाजलगाव धरणwater shortageपाणीटंचाईdroughtदुष्काळ