शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
3
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
4
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
5
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
6
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
7
"बाप्पा तुम्ही खूप भाग्यवान, नांगरलं कुणी, पेरलं कुणी अन्..."; पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणेंना टोला
8
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
9
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?
10
टाटा-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये वाढ! सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी वधारले, कुठे झाली घसरण?
11
World Athletics Championships 2025 : नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक; इथंही IND vs PAK महामुकाबला?
12
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र
13
याला म्हणतात नशीब! आदिवासी महिलेला सापडले ३ मौल्यवान हिरे; रातोरात झाली लखपती
14
GST कपाती नंतर मध्यमवर्गींना आणखी एक भेट मिळणार? ऑक्टोबरमध्ये RBI घेणार मोठा निर्णय
15
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
16
एटापल्लीच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांत जोरदार चकमक, दोन महिला माओवाद्यांना मारण्यात यश
17
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
18
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
19
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
20
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात मृत्यू येणे चांगले, पण अंत्यविधिला गेल्यावर स्मशानात काढू नका 'हे' शब्द

माजलगावं धरणात केवळ १८ टक्केच पाणीसाठा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 19:15 IST

 वाढलेल्या उन्हाच्या तीव्रतेमुळे माजलगांव धरणातील पाणीसाठा कमालीचा खालावत चालला आहे. सध्या माजलगांव धरणात केवळ १८ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

माजलगांव  (बीड ) :  वाढलेल्या उन्हाच्या तीव्रतेमुळे माजलगांव धरणातील पाणीसाठा कमालीचा खालावत चालला आहे. सध्या माजलगांव धरणात केवळ १८ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. उन्हाळ्याचा आणखी एक महिना शिल्लक असल्याने प्रशासनाकडुन धरणातील साठा पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्याची तयारी सुरु झाली आहे. 

गेल्यावर्षी परतीच्या पावसामुळे माजलगांव धरण हे १०० टक्के भरले होते यामुळे शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. पाण्याची उपलब्धता झाल्यामुळे परिसरात मोठया प्रमाणावर उसाची लागवड झाली. त्यासाठी व इतर पिकांसाठी माजलगांव धरणातुन पाच पाणीपाळया देण्यात आल्या. यात खरीपासाठी एक तर रब्बीसाठी चार पाळया देण्यात आल्या. उन्हाळी पाळया आता पर्यंत 3 देण्यात आल्या असुन अजुन एक पाळी देणे बाकी आहे. धरणाच्या बॅक वाॅटरवरुन बीड शहर, माजलगांव शहर व इतर आजुबाजुचे खेडेपाडयांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. तसेच धरणातुन अनेक शेतक-यांनी पाईपलाईनद्वारे आपल्या शेतीसाठी पाणी घेतलेले आहे.  यातील ९० टक्के शेतक-यांनी कसल्याही प्रकारचा परवाना न घेता पाणी उपसा सुरु ठेवलेला आहे. 

४ मिटरने खालावली पातळी माजलगांव धरणाची एकुण पाणसाठयाची क्षमता ही ४३१.८० मिटर एवढी आहे. आज सकाळी ८ वाजेपर्यंत ही पाणी पातळी ४२७.६० मिटरवर आली आहे. धरणाची पातळी ४ मिटरपेक्षा जास्त खालावली आहे. धरणामध्ये एकुण साठा २०६.२०  द.ल.घ.मि. असुन पैकी जिवंत साठा हा ६४. २०  द.ल.घ.मी. म्हणजेच १८. ५९ टक्के इतका राहिलेला आहे. माजलगांव धरणातुन दररोज ०.५३५ द.ल.घ.मी. येवढे पाणी पिण्यासाठी तसेच बाष्पीभवनामुळे उत्सर्जीत होत आहे. 

एकंदरीत माजलगांव धरणातील पाणी साठयाची उपलब्धता पाहता भविष्यात शेतक-यांना एक उन्हाळी पाळी दिल्यास जिवंत पाणीसाठयामध्ये मोठी घट होणार असुन प्रशासकिय पातळीवर पाणीपाळी द्यावी किंवा नाही या बाबत विचारविनिमय होत आहे. मात्र पावसाळा सुरु होण्यासाठी अजुनही एक महिन्याचा कालावधी असल्यामुळे पाणी पाळी शेतक-यांना न दिल्यास त्यांचे देखील मोठे नुकसान होणार असल्याचे दिसुन येते. 

पाणी जाऊन वापरावे माजलगांव धरणातील पाणी साठा हा पुरेसा असला तरी नागरीकांनी व शेतक-यांनी पाण्याचा वापर हा जपुन केल्यास भविष्यात पाण्यासाठी अडचणी होणार नाहीत.-  राजेंद्र दहातोंडे, धरण अभियंता  

टॅग्स :Majalgaon Damमाजलगाव धरणwater shortageपाणीटंचाईdroughtदुष्काळ