शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
5
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
6
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
7
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
8
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
9
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
10
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
11
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
12
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
13
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
14
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
15
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
16
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
17
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
18
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
19
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
20
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!

कांद्याने आणले डोळ्यात पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:24 IST

सखाराम शिंदे गेवराई : गेल्या दोन महिन्यांपासून कांद्याची आवक कमी झाल्याने आणि भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने, गोरगरीब व मध्यमवर्गीयांच्या ...

सखाराम शिंदे

गेवराई : गेल्या दोन महिन्यांपासून कांद्याची आवक कमी झाल्याने आणि भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने, गोरगरीब व मध्यमवर्गीयांच्या घरातून कांदा गायब झाला आहे. त्याचबरोबर, आता हाॅटेलमध्येही कांद्याऐवजी कोबी, टोमॅटो, काकडीचा वापर होताना दिसत आहे.

या कांद्याने अक्षरश: सामान्यांच्या तोंडची चवच पळविली आहे. कांदा न भाकर घेऊ द्या की रं, मला बी जत्रंला येऊ द्या की रं, असे गाणे फार वर्षांपूर्वी एका चित्रपटात होते. त्याप्रमाणे, कांदा सहज कोठेही उपलब्ध होत होता, तसेच शहरातील नव्हे, तर तालुक्यातील सर्वच हाॅटेल, भोजनालय, भेळ सेंटर, भज्यांच्या गाड्या यावर नेहमी मोठ्या प्रमाणात कांदा मिळत होता. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून बाजारात कांद्याची आवक कमी झाल्याने भाव वाढले. आजमितीला बाजारात कांद्याचा भाव हा ४० ते ५० रुपये किलो दराने विकला जात असल्याने, गरीब व मध्यमवर्गीयांचा जेवणातील आवडता कांदा आता गायब झाला असून, फक्त श्रीमंताच्या घरात कांदा दिसत आहे.

आजमितीला शहरातील व ग्रामीण भागातील सर्वच ठिकाणच्या भज्यांच्या गाडीवर आता कांद्याऐवजी कोबीचा वापर केला जात आहे, तसेच हाॅटेल, भोजनालय व भेळ सेंटरवरही कांद्याऐवजी कोबी, टोमॅटो, काकडी यांचा वापर होत असल्याने, हाॅटेलमध्येही सहज मिळणारा कांदा आता दिसेनासा झाला असल्याचे येथील अभिजीत ठाकूर, पप्पू जैस्वाल यांनी सांगितले.

कांद्याची आवक कमी झाल्याने व कांदा आम्हाला जास्त भावाने येत असल्याने, तो जास्त भावानेच विकावा लागत असल्याचे येथील व्यापारी विलास जंवजाळ यांनी सांगितले.