शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

कांदा ६० रुपये; अद्रक, लसणाचाही तडका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 00:17 IST

भाजी बाजारात मागील काही दिवसांपासून आवक कमी आणि मागणी वाढल्याने कांद्याचे दर तिपटीने वधारले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : येथील भाजी बाजारात मागील काही दिवसांपासून आवक कमी आणि मागणी वाढल्याने कांद्याचे दर तिपटीने वधारले आहेत. किरकोळ बाजारात चांगल्या प्रतीचा कांदा ५० ते ६० रुपये किलो विकला जात आहे. एकीकडे कांदा डोळ्यात पाणी आणत असतानाच दुसरीकडे आले आणि लसणाने शंभरी पार केली आहे.येथील भाजी आडत बाजारात कांद्याचे दर ३० ते ३५ रुपये किलो आहेत. ५० किलोच्या गोणीत किमान १० किलो कांदा ओला असल्याने खराब होतो. तसेच वाहतूक व इतर खर्च पाहता किरकोळ विक्रेत्यांकडून ५० ते ६० रुपये किलो कांदा विकला जात आहे.सध्या ठोक बाजारात शेवगा ३० ते ४० रुपये किलो विकला जात आहे. गवार २० रुपये किलो आहे. भेंडी १५ ते २० रुपये किलो आहे. फ्लॉवरच्या दरात दोन दिवसात तेजी आली आहे. पानकोबी १२ ते १७ रुपये किलो आहे. हिरवी मिरची १२ ते १५ रुपये किलो विकली जात आहे.शिमला मिरचीचे दर १० ते १५ रुपये किलो आहेत. टोमॅटो २० ते २५ रुपये किलो आहेत. वांगीची आवक कमी असून चांगल्या प्रतीच्या वांगीचे २० किलोचे कॅरेट ३०० ते ५०० रुपयांपर्यंत आहे.बटाटे मात्र १० ते १५ रुपये किलोपर्यंत आहे. कोथिंबीर ३०० ते ६०० रुपये शेकडा, मेथी जुडी ५०० ते ८०० रुपये शेकडा भाव आहेत. ठोक बाजारातील या दरांनुसार किरकोळ बाजारामध्ये भाज्यांचे भाव ठरत आहेत.ग्रामीण भागातून अनेक शेतकरी भाजी विक्रसाठी येतात. मुबलक आवकमुळे लवकरात लवकर विकण्याची स्पर्धा असल्याने ग्रामहकांना वाजवी दरात भाज्या खरेदी करता येत आहेत.

टॅग्स :vegetableभाज्याInflationमहागाईMarketबाजार