शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
5
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
6
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
7
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
8
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
9
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
10
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
11
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
12
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
13
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
14
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
15
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
16
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
17
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
18
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
19
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर

कांदा ६० रुपये; अद्रक, लसणाचाही तडका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 00:17 IST

भाजी बाजारात मागील काही दिवसांपासून आवक कमी आणि मागणी वाढल्याने कांद्याचे दर तिपटीने वधारले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : येथील भाजी बाजारात मागील काही दिवसांपासून आवक कमी आणि मागणी वाढल्याने कांद्याचे दर तिपटीने वधारले आहेत. किरकोळ बाजारात चांगल्या प्रतीचा कांदा ५० ते ६० रुपये किलो विकला जात आहे. एकीकडे कांदा डोळ्यात पाणी आणत असतानाच दुसरीकडे आले आणि लसणाने शंभरी पार केली आहे.येथील भाजी आडत बाजारात कांद्याचे दर ३० ते ३५ रुपये किलो आहेत. ५० किलोच्या गोणीत किमान १० किलो कांदा ओला असल्याने खराब होतो. तसेच वाहतूक व इतर खर्च पाहता किरकोळ विक्रेत्यांकडून ५० ते ६० रुपये किलो कांदा विकला जात आहे.सध्या ठोक बाजारात शेवगा ३० ते ४० रुपये किलो विकला जात आहे. गवार २० रुपये किलो आहे. भेंडी १५ ते २० रुपये किलो आहे. फ्लॉवरच्या दरात दोन दिवसात तेजी आली आहे. पानकोबी १२ ते १७ रुपये किलो आहे. हिरवी मिरची १२ ते १५ रुपये किलो विकली जात आहे.शिमला मिरचीचे दर १० ते १५ रुपये किलो आहेत. टोमॅटो २० ते २५ रुपये किलो आहेत. वांगीची आवक कमी असून चांगल्या प्रतीच्या वांगीचे २० किलोचे कॅरेट ३०० ते ५०० रुपयांपर्यंत आहे.बटाटे मात्र १० ते १५ रुपये किलोपर्यंत आहे. कोथिंबीर ३०० ते ६०० रुपये शेकडा, मेथी जुडी ५०० ते ८०० रुपये शेकडा भाव आहेत. ठोक बाजारातील या दरांनुसार किरकोळ बाजारामध्ये भाज्यांचे भाव ठरत आहेत.ग्रामीण भागातून अनेक शेतकरी भाजी विक्रसाठी येतात. मुबलक आवकमुळे लवकरात लवकर विकण्याची स्पर्धा असल्याने ग्रामहकांना वाजवी दरात भाज्या खरेदी करता येत आहेत.

टॅग्स :vegetableभाज्याInflationमहागाईMarketबाजार