शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

कांदा ६० रुपये; अद्रक, लसणाचाही तडका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 00:17 IST

भाजी बाजारात मागील काही दिवसांपासून आवक कमी आणि मागणी वाढल्याने कांद्याचे दर तिपटीने वधारले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : येथील भाजी बाजारात मागील काही दिवसांपासून आवक कमी आणि मागणी वाढल्याने कांद्याचे दर तिपटीने वधारले आहेत. किरकोळ बाजारात चांगल्या प्रतीचा कांदा ५० ते ६० रुपये किलो विकला जात आहे. एकीकडे कांदा डोळ्यात पाणी आणत असतानाच दुसरीकडे आले आणि लसणाने शंभरी पार केली आहे.येथील भाजी आडत बाजारात कांद्याचे दर ३० ते ३५ रुपये किलो आहेत. ५० किलोच्या गोणीत किमान १० किलो कांदा ओला असल्याने खराब होतो. तसेच वाहतूक व इतर खर्च पाहता किरकोळ विक्रेत्यांकडून ५० ते ६० रुपये किलो कांदा विकला जात आहे.सध्या ठोक बाजारात शेवगा ३० ते ४० रुपये किलो विकला जात आहे. गवार २० रुपये किलो आहे. भेंडी १५ ते २० रुपये किलो आहे. फ्लॉवरच्या दरात दोन दिवसात तेजी आली आहे. पानकोबी १२ ते १७ रुपये किलो आहे. हिरवी मिरची १२ ते १५ रुपये किलो विकली जात आहे.शिमला मिरचीचे दर १० ते १५ रुपये किलो आहेत. टोमॅटो २० ते २५ रुपये किलो आहेत. वांगीची आवक कमी असून चांगल्या प्रतीच्या वांगीचे २० किलोचे कॅरेट ३०० ते ५०० रुपयांपर्यंत आहे.बटाटे मात्र १० ते १५ रुपये किलोपर्यंत आहे. कोथिंबीर ३०० ते ६०० रुपये शेकडा, मेथी जुडी ५०० ते ८०० रुपये शेकडा भाव आहेत. ठोक बाजारातील या दरांनुसार किरकोळ बाजारामध्ये भाज्यांचे भाव ठरत आहेत.ग्रामीण भागातून अनेक शेतकरी भाजी विक्रसाठी येतात. मुबलक आवकमुळे लवकरात लवकर विकण्याची स्पर्धा असल्याने ग्रामहकांना वाजवी दरात भाज्या खरेदी करता येत आहेत.

टॅग्स :vegetableभाज्याInflationमहागाईMarketबाजार