शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

परळी तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या घटतेय....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:34 IST

परळी शहरात व ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधक लस नागरिकांना मोठ्या प्रमाणात आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. तसेच शहरातील ...

परळी शहरात व ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधक लस नागरिकांना मोठ्या प्रमाणात आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. तसेच शहरातील कोविड केअर सेंटरमध्ये ही रुग्णांची उपचाराची सोय करण्यात आली आहे व विविध पक्ष व इतर सामाजिक संघटना जनजागृतीचे काम करीत आहेत, पोलीस प्रशासन सतर्क होऊन काम करीत आहे. शहरातील डॉक्टर वैद्यकीय अधिकारी, आरोग्य, महसूल अधिकारी, शिक्षक हे योग्य समन्वय साधून काम करीत आहेत. पालकमंत्री धनजय मुंडे यांनी ही खूप बारकाईने पहिल्यापासूनच लक्ष देऊन उपाययोजना केल्या. प्रशासन सतर्क केले व कार्यकर्त्यांना मदतीसाठी सक्रिय केले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा शिवसेना व इतर पक्षाचे कार्यकर्तेही बाधित रुग्णांच्या सेवेसाठी कार्यरत आहेत.

बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे या कोरोनाच्या संकटात कोरोना बाधित रुग्णांच्या सेवेबरोबरच ‘सेवाधर्म’ या माध्यमातून दिवस-रात्र एक करताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांच्यावर त्यांनी या ‘सेवाधर्म’ उपक्रमाची जबाबदारी सोपविली. धनंजय मुंडे यांनी उपक्रमातून रुग्णांना नाष्टा, भोजन पुरवणे, मदतीसाठी प्रत्येक खासगी रुग्णालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन स्वयंसेवक तैनात केले आहेत. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना घरी जाताना स्वत:ची व कुटुंबीयांची काळजी घेता यावी, यासाठी कोरोना सुरक्षा किट, वाटप सुरू केले आहे.

- राहुल विलासराव ताटे परळी.

माजी मंत्री पंकजा मुंडे व खासदार प्रीतम मुंडे यांच्या संकल्पनेतून गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने कोरोनाबाधित रुग्णांच्या सेवेसाठी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने येथील शिवाजी चौकात शंभर बेडचे आयसोलेशन (विलगीकरण) सेंटर सुरू करण्यात आले. यामध्ये निवास, भोजन, औषधोपचार, तज्ज्ञ डाॅक्टर्स डून वेळोवेळी तपासणी, अशी रुग्णांची संपूर्ण काळजी घेतली जात आहे. कोणत्याही रुग्णाला एक रुपयादेखील खर्च करावा लागत नाही, सर्व व्यवस्था प्रतिष्ठानकडून मोफत केली जात आहे. आतापर्यंत या सेंटरमध्ये ९० रुग्ण दाखल झाले होते, त्यापैकी ५५ रुग्ण ठणठणीत बरे होऊन सुखरूप घरी परतले आहेत.

- राजेंद्र ओझा भाजपा शहर उपाध्यक्ष परळी

परळी तालुक्यासह महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत असून ही महाराष्ट्रातील जनतेसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. जनतेने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. सकारात्मक राहा. एकमेकांना आधार द्या. हे संकट लवकरच संपेल. त्यासाठी प्रत्येकाने नियमांचे पालन करून शासनाला सहकार्य करावे.

रानबा गायकवाड

लेखक, परळी