शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी आणि लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांवर संकट; कापणी-मळणीला आलेला शेतमाल उघडयावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 20:51 IST

निसर्गाचा कोप अन् कोरोनामुळे बळीराजा दुहेरी संकटात

- अविनाश मुडेगांवकर

अंबाजोगाई : कोरोनामुळे झालेले लॉकडाऊन व सुरू झालेली संचारबंदी त्यातच या आठवडयात झालेली गारपीट व वादळी पाऊस यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. लॉकडाऊनमुळे कापणीसाठी व मळणीसाठी मजूर मिळेना. शेतकºयांचा राहिलेला माल उघडयावर पडून आहे. निसर्गाचा कोप व कोरोना यामुळे बळीराजा दुहेरी संकटात सापडला आहे. 

अंबाजोगाई तालुक्यात आठवडाभरापूर्वी सलग दोनवेळा गारपीट व वादळी पाऊस झाला. या वादळी पावसात गहू, ज्वारी, हरभरा, मका, आंबे, टरबूज, खरबूज व भाजीपाल्यांचे मोठयाप्रमाणात नुकसान झाले आहे. वादळी पावसामुळे अनेक ठिकाणचे हरभºयाचे ढीग वादळाबरोबर विस्कटले. तर अनेक ढीग पावसात भिजले. शेतात उभी असणारी ज्वारी सुसाट वाºयामुळे आडवी पडली. भाजीपाला, टरबूज व आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काढून ठेवलेला माल मळणी करण्यासाठी तर शेतात उभी असणारी ज्वारी काढण्यासाठी मजूर उपलब्ध होत नसल्याने शेतात माल तसाच उभा आहे. अजूनही अवकाळी पावसाचा नेम सांगता येत नसल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागही लॉकडाऊन झाला आहे. 

शासनाने पुढचे २१ दिवस घराबाहेर पडू नका असा आदेश काढल्याने ग्रामीण भागातही घराच्या बाहेर येण्यासाठी कोणी धजावत नाही. ग्रामीण भागातही संचारबंदी सुरू असल्याने शेतात जनावरांना सांभाळणे मोठ्या जिकीरीचे काम बनले आहे. मोठ्या प्रमाणात लागवड केलेला भाजीपाला शहरापर्यंत पोहचविण्यासाठी वाहतूक व्यवस्था बंद राहिल्याने आहे या ठिकाणी भाजीपाला सडू लागला आहे. अशा अनेक समस्यांनी शेतकºयांना ग्रासले आहे. 

जीव धोक्यात घालून शेतकरी शेतात

संचारबंदी व घराबाहेर न निघण्याचे आदेश असतानाही स्वत:चा जीव धोक्यात घालून शेतकरी शेतात जाऊन आपली बैलजोडी, गाई, म्हशी, यांना चारापाणी व त्यांचा सांभाळ करत आहेत. आहे हे दुध करायचे काय? असाही प्रश्न निर्माण झाला आहे. वाहतूक व्यवस्था बंद पडल्याने अनेक दुध उत्पादकांसमोर मोठे संकट उभा राहिले आहे. 

गुढी बदलली पण सालदार मिळेना

गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर शेतातील सालदाराचा पहिला दिवस असतो. या दिवशी शेतात येऊन तो सर्व  माहिती करून घेतो व आपल्या कामाचा प्रारंभ करून वर्षभराच्या कामाचे नियोजन करतो. मात्र, या वर्षी लॉकडाऊनमध्ये गुढीपाडवा आला. सालदारही साल ठरवायला आले नाहीत. त्यामुळे अनेक कामांना खो बसल्याने स्वत: मालकालाच पुढाकार घेऊन शेतीतील कामे करण्याची वेळ आली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड