शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
5
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
6
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
7
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
8
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
9
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
10
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
11
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
12
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
13
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
14
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
15
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
16
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
17
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
18
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
20
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी

कृषिपंपाचे बिल भरावे लागणार नाही, शेतकऱ्यांना वर्षभर दिवसाही वीज मिळेल: देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 18:04 IST

पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू द्यायचा नाही , समुद्रात वाहून जाणारे पाणी हे गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणण्याचा प्रकल्पाला गती देण्यात येत आहे

परळी : महायुतीच्या राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक कल्याणकारी निर्णय घेतले आहेत. वर्षातील ३६५ दिवसा ही वीज पुरवठा करण्याची योजना अमलात आणण्यात येणार आहे.  मराठवाडा सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी महायुती सरकारने सिंचन प्रकल्पासाठी मान्यता दिली आहे. मराठवाड्यात जलयुक्त शिवार योजनेचे कामे झालेले आहे. त्याशिवाय मराठवाड्याच्या हक्काचे पाणी आता आष्टी पर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी नेण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परळी येथे बुधवारी बोलताना दिली. 

परळीत पाच दिवसीय कृषी महोत्सवाच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी देवेंद्र फडणवीस बोलत होते ते पुढे म्हणाले की, दुष्काळी भाग म्हणून मराठवाडा ओळखला जातो. पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू द्यायचा नाही , समुद्रात वाहून जाणारे पाणी हे गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणण्याचा प्रकल्पाला गती देण्यात येत आहे. त्याबरोबरच शासनातर्फे शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर ड्रीप देणार आहोत तसेच ट्रॅक्टर व कृषी अवजारे ही देण्यात येतील अशी घोषणा यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यापुढे कृषी पंपाचे शेतकऱ्यांना वीज बिल भरावे लागणार नाही, मुख्यमंत्री सौर ऊर्जा वाहिनीचे काम १८ महिन्यात पूर्ण होईल त्यानंतर ३६५ दिवस वीज शेतकऱ्यांना दिवसा ही वापरता येणार आहे असेही ते म्हणाले. 

मराठवाड्याचा सिंचनाचा बॅकलॉग दूर करण्यात येईल यासाठी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले. मराठवाड्यातील दुष्काळ दूर करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. समुद्रात वाहून जाणारे ५० टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची योजना अंतिम टप्प्यात असून बीड जिल्ह्यातील आष्टीपर्यंत लवकरच हे पाणी येईल. यासाठी मराठवाड्याचे हक्काचे पाणी मराठवाड्यात आणण्यासाठी सुमारे ११ हजार कोटींची कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना हाती घेण्यात आली आहे. ११ सिंचन प्रकल्पांसाठी १३ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पातून शेतकऱ्यांना विविध बाबींचा लाभ देण्यासाठी ६ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. तसेच जायकवाडी प्रकल्पाच्या टप्पा-२ साठी ५३६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून माजलगाव कालव्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे मराठवाड्यातील ८५ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. त्यामुळे मराठवाड्याचा सिंचनाचा अनुशेष दूर होईल,असा दावा फडणवीस यांनी केला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBeedबीड