शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
2
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
3
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
4
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
5
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण
6
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
7
नवी मुंबईतील शिक्षिकेचं अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत घाणेरडं कृत्य, वडिलांनी बघताच पोलीस स्टेशन गाठले!
8
पत्नी झाली बेवफा! पतीला दारू पाजली अन् नाल्यात ढकलून दिलं; प्रियकरासोबत पळणारच होती, पण...
9
फराह खानचा कुक दिलीपचा पगार किती? आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याची सॅलरी पण पडेल फिक्की!
10
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
11
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत नवे नियम; उल्लंघन केल्यास नोकरी गमवाल!
12
लस्सीवरून दुकानदारांमध्ये तुफान राडा, एकमेकांवर लाठ्याकाठ्या, दगड विटांनी केला हल्ला
13
प्रियंका गांधी म्हणाल्या, 'मी शिवस्तोत्र म्हणून आलेय'; लोकसभेत नेमकं काय घडलं?
14
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
15
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
16
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
17
शैलेश जेजुरीकर बनले 'या' अमेरिकन कंपनीचे CEO! मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G लाही मिळणार 'भारतीय' नेतृत्व!
18
Tripti Dimri : "मी ३० वर्षांपासून गप्प...", तृप्ती डिमरीने खूप काही केलंय सहन, का नाही उठवला आवाज?
19
Russia Ukraine War: "हल्ले थांबवा अन्यथा..."; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्पकडून पुतिन यांना इशारा!
20
BCCI च्या ऑफिसमध्ये चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या IPL जर्सी चोरुन हरयाणात विकल्या

कृषिपंपाचे बिल भरावे लागणार नाही, शेतकऱ्यांना वर्षभर दिवसाही वीज मिळेल: देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 18:04 IST

पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू द्यायचा नाही , समुद्रात वाहून जाणारे पाणी हे गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणण्याचा प्रकल्पाला गती देण्यात येत आहे

परळी : महायुतीच्या राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक कल्याणकारी निर्णय घेतले आहेत. वर्षातील ३६५ दिवसा ही वीज पुरवठा करण्याची योजना अमलात आणण्यात येणार आहे.  मराठवाडा सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी महायुती सरकारने सिंचन प्रकल्पासाठी मान्यता दिली आहे. मराठवाड्यात जलयुक्त शिवार योजनेचे कामे झालेले आहे. त्याशिवाय मराठवाड्याच्या हक्काचे पाणी आता आष्टी पर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी नेण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परळी येथे बुधवारी बोलताना दिली. 

परळीत पाच दिवसीय कृषी महोत्सवाच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी देवेंद्र फडणवीस बोलत होते ते पुढे म्हणाले की, दुष्काळी भाग म्हणून मराठवाडा ओळखला जातो. पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू द्यायचा नाही , समुद्रात वाहून जाणारे पाणी हे गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणण्याचा प्रकल्पाला गती देण्यात येत आहे. त्याबरोबरच शासनातर्फे शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर ड्रीप देणार आहोत तसेच ट्रॅक्टर व कृषी अवजारे ही देण्यात येतील अशी घोषणा यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यापुढे कृषी पंपाचे शेतकऱ्यांना वीज बिल भरावे लागणार नाही, मुख्यमंत्री सौर ऊर्जा वाहिनीचे काम १८ महिन्यात पूर्ण होईल त्यानंतर ३६५ दिवस वीज शेतकऱ्यांना दिवसा ही वापरता येणार आहे असेही ते म्हणाले. 

मराठवाड्याचा सिंचनाचा बॅकलॉग दूर करण्यात येईल यासाठी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले. मराठवाड्यातील दुष्काळ दूर करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. समुद्रात वाहून जाणारे ५० टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची योजना अंतिम टप्प्यात असून बीड जिल्ह्यातील आष्टीपर्यंत लवकरच हे पाणी येईल. यासाठी मराठवाड्याचे हक्काचे पाणी मराठवाड्यात आणण्यासाठी सुमारे ११ हजार कोटींची कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना हाती घेण्यात आली आहे. ११ सिंचन प्रकल्पांसाठी १३ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पातून शेतकऱ्यांना विविध बाबींचा लाभ देण्यासाठी ६ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. तसेच जायकवाडी प्रकल्पाच्या टप्पा-२ साठी ५३६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून माजलगाव कालव्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे मराठवाड्यातील ८५ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. त्यामुळे मराठवाड्याचा सिंचनाचा अनुशेष दूर होईल,असा दावा फडणवीस यांनी केला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBeedबीड