शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

शेतीच्या वादातून भावकी-शेजारी उठले जिवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : खरीप हंगामाच्या मशागतीला सुरुवात झाली असून विविध कारणास्तव शेतजमिनीच्या कारणावरून भावकीत व शेजाऱ्यांसोबत वादाच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : खरीप हंगामाच्या मशागतीला सुरुवात झाली असून विविध कारणास्तव शेतजमिनीच्या कारणावरून भावकीत व शेजाऱ्यांसोबत वादाच्या घटना वाढल्या आहेत. याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यात एका महिन्यात शेकडो गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाकडून विविध उपाययोजना व जनजागृती केली जात आहे.

जिल्ह्यातील खरीप हंगामातील क्षेत्रफळ हे जवळपास ६ लाख ५० हजार हेक्टर इतके आहे. खरीप हंगामातील पीक-पेरणीसाठी शेतीची मशागत, उन्हाळी कामे सुरू झाल्यापासून शेतीच्या वादाला अनेक ठिकाणी तोंड फुटतात. याप् रकरणात महसूल विभागाची महत्त्वाची भूमिका असते. मात्र, त्याकडे वर्षानुवर्ष दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतातील विविध मशागतीच्या वेळी हे वाद उफाळून येतात, तर शेतीच्या वादातून गंभीर गुन्ह्याच्या देखील घटना घडल्या आहेत. त्यामुळे मशागत सुरू झाल्यानंतर शेतीच्या वादातून घडणारे गुन्हे कमी करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून गावागावांत जनजागृती करण्यात आली. आपसात वाद न घालता रीतसर महसूल विभागाकडे यासंदर्भात तक्रार करण्याचे आवाहनदेखील केले आहे.

मागील वर्षी शेतीच्या वादातून केज तालुक्यातील मांगवडगाव येथे तिघांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती, तर बांध कोरणे, पोवळीवरील दगडं उचलणे, वाटणी पत्रावरून होणारे गुन्हे एप्रिल व मे महिन्यात जास्त झाले आहेत. विविध पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हे दाखल झालेले आहेत. यापैकी अनेक गुन्हे भावाभावांत, भावकीत किंवा शेजाऱ्यासोबत असतात. त्यामुळे या वादातून शत्रुत्व वाढत जाते. त्याचे पर्यवसान हे गंभीर गुन्ह्यात होण्याचीदेखील भीती असते. त्यामुळे सर्वांनी समजूतदारपणे ही भांडणे गावात ज्येष्ठांसोबत बसून सोडवणे गरजेचे आहे, अन्यथा यामधून सर्वांचेच आर्थिक नुकसान होते. महसूल विभागानेदेखील या प्रकरणांमध्ये लक्ष घालून प्रकरणे निकाली काढण्यासाठी योग्य ती कार्यवाही तातडीने करणे गरजेेचे आहे, अशी मागणी आहे.

...

२०२० मे आणि जूनमधील शेतीच्या वादातून घडलेले गुन्हे

दुखापत करणे, जमावाकडून मारहाण व इतर -२२५

जीवघेणा हल्ला करणे -२०५

...

मुळात जमिनीचे वाद हा विषय महसूल प्रशासनाचा आहे. मात्र, शेतीच्या वादातून गुन्हे घडले तर आम्ही योग्य ती कारवाई करतो. आमच्याकडे काही प्रकरणे आली तर त्यामध्ये मध्यस्थी करण्याचे आदेशदेखील ठाणेप्रमुखांना देण्यात आलेले आहे. नागरिकांनीदेखील विनाकारण वाद घालू नयेत.

-आर. राजा, पोलीस अधीक्षक, बीड.

............

शेतीच्या मशागतीच्यावेळी शेजाऱ्यासोबत होणाऱ्या भांडणाचे प्रमाण या दोन महिन्यांत वाढले आहे. त्यामधून गुन्हेदेखील वाढतात. यासाठी आपसात वाद मिटवणे गरजेचे आहे. गुन्हे घडू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना देखील पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहेत.

-सुनील लांजेवार, अपर पोलीस अधीक्षक, बीड.