शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : गौतम गंभीरचा राजीनामा द्यायला नकार! म्हणाला, "मी जिंकवलेल्या मालिका आठवा..!!"
2
झेपत असेल तरच बघा...! एकाने झेप्टोच्या डिलिव्हरी बॉयवर हात उचलला, तो पुरी पलटनच घेऊन आला...
3
जय श्रीराम! सर्वांत श्रीमंत मंदिरांच्या यादीत राम मंदिर, किती कोटींची झाली कमाई? आकडे पाहाच
4
FBI चे प्रमुख काश पटेल यांनी गर्लफ्रेंडला पुरवली कमांडो सुरक्षा, नोकरी जाण्याची चर्चा; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...
5
चेतेश्वर पुजाराच्या मेव्हण्याने संपवलं जीवन, जिच्याशी ठरलेलं लग्न तिनेच केलेले 'तसले' आरोप
6
इम्रान खान यांची तुरुंगात हत्या? अफगाणी मीडियाचा मोठा दावा, पाकिस्तानात खळबळ...
7
१२ महिन्यांमध्ये २९,००० अंकांच्या पार जाणार निफ्टी? रिकव्हरीच्या ट्रॅकवर जातोय का इंडेक्स?
8
टीम इंडियावर 'वाईट'वॉशची नामुष्की, सर्वात मोठा पराभव; द. आफ्रिकेचा २५ वर्षांनंतर मालिका विजयाचा पराक्रम
9
बायकोची हत्या केल्याच्या आरोपाखाली पती चार महिने तुरुंगात अन् पत्नी दिल्लीत प्रियकरासोबत आनंदात!
10
लष्करात सैनिकांची कमतरता! आता दरवर्षी १ लाख अग्निवीरांची भरती केली होणार
11
Kamla Pasand Owner Net Worth: कमला पसंदचे मालक कोण आणि किती आहे नेटवर्थ? एकेकाळी रस्त्याच्या कडेला विकायचे पान मसाला
12
ICC ODI Rankings : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेआधी हिटमॅन रोहित शर्मा पुन्हा 'नंबर वन'
13
५ लाखांपर्यंतचे उपचार फ्री! आता घरबसल्या बनवा 'आयुष्मान कार्ड'! 'या' कागदपत्रांची आवश्यकता
14
SIR मुळे पश्चिम बंगालमधील 23 बीएलओंचा मृत्यू? सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला 'हे' निर्देश
15
लग्न पुढे ढकललं... पोस्ट डिलीट... उलटसुलट चर्चा...; अशातच स्मृती मंधानाचा आणखी एक मोठा निर्णय, जाणून घ्या
16
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी, खरेदीपूर्वी पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
17
Gautam Gambhir: गंभीरच्या कोचिंगमध्ये टीम इंडिया सुपर फ्लॉप; ११ लाजिरवाण्या विक्रमांची नोंद!
18
टीम इंडियाने 'बुटका' म्हणून हिणवलं, विजयानंतर बवुमा म्हणाला- आता आत्मविश्वास आणखी वाढलाय...
19
संविधान दिन २०२५: PM नरेंद्र मोदींचे देशाला खुले पत्र; म्हणाले, “निवडणुकीत मतदानाची संधी...”
20
काजू, बदाम, पिस्ता आणि शेरनी बाई...; मतदार यादी पाहून अधिकारीही झाले थक्क! हटके नावांमागे कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शेतीच्या वादातून भावकी-शेजारी उठले जिवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : खरीप हंगामाच्या मशागतीला सुरुवात झाली असून विविध कारणास्तव शेतजमिनीच्या कारणावरून भावकीत व शेजाऱ्यांसोबत वादाच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : खरीप हंगामाच्या मशागतीला सुरुवात झाली असून विविध कारणास्तव शेतजमिनीच्या कारणावरून भावकीत व शेजाऱ्यांसोबत वादाच्या घटना वाढल्या आहेत. याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यात एका महिन्यात शेकडो गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाकडून विविध उपाययोजना व जनजागृती केली जात आहे.

जिल्ह्यातील खरीप हंगामातील क्षेत्रफळ हे जवळपास ६ लाख ५० हजार हेक्टर इतके आहे. खरीप हंगामातील पीक-पेरणीसाठी शेतीची मशागत, उन्हाळी कामे सुरू झाल्यापासून शेतीच्या वादाला अनेक ठिकाणी तोंड फुटतात. याप् रकरणात महसूल विभागाची महत्त्वाची भूमिका असते. मात्र, त्याकडे वर्षानुवर्ष दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतातील विविध मशागतीच्या वेळी हे वाद उफाळून येतात, तर शेतीच्या वादातून गंभीर गुन्ह्याच्या देखील घटना घडल्या आहेत. त्यामुळे मशागत सुरू झाल्यानंतर शेतीच्या वादातून घडणारे गुन्हे कमी करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून गावागावांत जनजागृती करण्यात आली. आपसात वाद न घालता रीतसर महसूल विभागाकडे यासंदर्भात तक्रार करण्याचे आवाहनदेखील केले आहे.

मागील वर्षी शेतीच्या वादातून केज तालुक्यातील मांगवडगाव येथे तिघांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती, तर बांध कोरणे, पोवळीवरील दगडं उचलणे, वाटणी पत्रावरून होणारे गुन्हे एप्रिल व मे महिन्यात जास्त झाले आहेत. विविध पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हे दाखल झालेले आहेत. यापैकी अनेक गुन्हे भावाभावांत, भावकीत किंवा शेजाऱ्यासोबत असतात. त्यामुळे या वादातून शत्रुत्व वाढत जाते. त्याचे पर्यवसान हे गंभीर गुन्ह्यात होण्याचीदेखील भीती असते. त्यामुळे सर्वांनी समजूतदारपणे ही भांडणे गावात ज्येष्ठांसोबत बसून सोडवणे गरजेचे आहे, अन्यथा यामधून सर्वांचेच आर्थिक नुकसान होते. महसूल विभागानेदेखील या प्रकरणांमध्ये लक्ष घालून प्रकरणे निकाली काढण्यासाठी योग्य ती कार्यवाही तातडीने करणे गरजेेचे आहे, अशी मागणी आहे.

...

२०२० मे आणि जूनमधील शेतीच्या वादातून घडलेले गुन्हे

दुखापत करणे, जमावाकडून मारहाण व इतर -२२५

जीवघेणा हल्ला करणे -२०५

...

मुळात जमिनीचे वाद हा विषय महसूल प्रशासनाचा आहे. मात्र, शेतीच्या वादातून गुन्हे घडले तर आम्ही योग्य ती कारवाई करतो. आमच्याकडे काही प्रकरणे आली तर त्यामध्ये मध्यस्थी करण्याचे आदेशदेखील ठाणेप्रमुखांना देण्यात आलेले आहे. नागरिकांनीदेखील विनाकारण वाद घालू नयेत.

-आर. राजा, पोलीस अधीक्षक, बीड.

............

शेतीच्या मशागतीच्यावेळी शेजाऱ्यासोबत होणाऱ्या भांडणाचे प्रमाण या दोन महिन्यांत वाढले आहे. त्यामधून गुन्हेदेखील वाढतात. यासाठी आपसात वाद मिटवणे गरजेचे आहे. गुन्हे घडू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना देखील पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहेत.

-सुनील लांजेवार, अपर पोलीस अधीक्षक, बीड.