शहरं
Join us  
Trending Stories
1
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
2
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
3
महागड्या गाड्यांचं कलेक्शन, कमाईतही एक नंबर; पाहा किती श्रीमंत आहे शुबमन गिल
4
"हो मी पाकिस्तानी सैन्याचा एजंट होतो", तहव्वूर राणाने चौकशीमध्ये केले अनेक धक्कादायक गौप्यस्फोट
5
ऐकावं ते नवलंच... अचानक लोकप्रिय ब्रँडच्या बिअर दुकानांमधून झाल्या गायब, राजधानीत नक्की काय झालं?
6
Bobby Darling : "माझ्या आईच्या मृत्यूला मी जबाबदार, मला माफ कर...", ढसाढसा रडली बॉबी डार्लिंग
7
Crizac IPO Allotment Status: ६० पट सबस्क्रिप्शन, शेअर्स अलॉट झालेत का, कसं कराल चेक? GMP प्रीमिअमवर
8
फुलेरात पुन्हा येण्याची तयारी सुरु करा! 'पंचायत ५'ची अधिकृत घोषणा, 'या' दिवशी रिलीज होणार
9
खळबळजनक! दिवसाढवळ्या एका व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या
10
ट्रम्प यांनी मस्क यांना झटका देण्यास केली सुरुवात; अमेरिकन सैन्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवली 'गोळी'
11
किती वाईट दिसतंय ते? अंकिता लोखंडेचा लूक पाहून चाहते शॉक; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
12
हाफिज सईद पाकिस्तानात नाही? नेमका कुठे लपून बसलाय तोयबाचा म्होरक्या? 'या' व्यक्तव्यांमधून मिळाले मोठे संकेत
13
हृदयद्रावक! ११ महिन्यांच्या मुलीने गमावले आई-वडील, आजी; झाली अनाथ, डोळे पाणावणारा Video
14
चातुर्मासातील पहिले भौम प्रदोष व्रत: ‘असे’ करा पूजन, महादेवांची अखंड कृपा; शुभच होईल!
15
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा ग्रॅज्युएट; तरीही करतोय फूड डिलिव्हरीचं काम, महिन्याला लाखोंची कमाई
16
५ जुलैला जपानवर कोणतेही संकट आलेच नाही? रिओ तात्सुकीची भविष्यवाणी फोल ठरली?
17
Chaturmas 2025 Rangoli: चातुर्मासात दारासमोर रोज दोन बोटं रांगोळी काढा आणि लक्ष्मीकृपा मिळवा!
18
सुपरहिट सिनेमांचा साक्षीदार 'फिल्मीस्तान स्टुडिओ' अखेर विकला; फिल्म इंडस्ट्री भावुक
19
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ५ मूलांक लकी, विविध लाभच लाभ; यश-प्रगती-भरभराट, स्वामी कल्याण करतील!
20
भयंकर! दरोडेखोरांनी घरात घुसून पत्नी, मुलांसमोर केली इंजिनिअरची हत्या; पैसे, दागिने घेऊन पसार

बीड जिल्ह्यात पावणेपाच कोटींची हवी मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 00:20 IST

फेब्रुवारीमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे जिल्ह्यातील ७०२३ शेतक-यांचे ४४०२ हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले असून शासनाच्या निकषानुसार बाधित शेतक-यांना मदतीसाठी सुमारे ४ कोटी ७१ लाख ७ हजार ३८४ रुपयांचा निधी अपेक्षित आहे. प्रशासनाच्या अंतीम अहवालानुसार गेवराई तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : फेब्रुवारीमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे जिल्ह्यातील ७०२३ शेतक-यांचे ४४०२ हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले असून शासनाच्या निकषानुसार बाधित शेतक-यांना मदतीसाठी सुमारे ४ कोटी ७१ लाख ७ हजार ३८४ रुपयांचा निधी अपेक्षित आहे. प्रशासनाच्या अंतीम अहवालानुसार गेवराई तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे.

वातावरणातील बदलामुळे काही दिवसांपुर्वी जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली तर काही ठिकाणी गारपीट झाली. यात शेतकºयांच्या रब्बी पिकांसह फळबागांना फटका बसला. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश शासनस्तरावर देण्यात आल्यानंतर जिल्हा पातळीवरील यंत्रणेने पंचनामे पूर्ण केले. नुकताच शासनाकडे अंतीम अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार गेवराई, शिरुरकासार, माजलगाव आणि केज तालुक्यात नुकसान झाले आहे.गेवराई तालुक्यात ६००८ शेतकºयांच्या ३ हजार ८५४ हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले. या तालुक्यात जिरायतीचे २६६५.८ हेक्टर, बागायतीचे १०१६ हेक्टर तर १७२.४५ हेक्टर क्षेत्रातील फळबागांचे नुकसान झाले.

शिरुर कासार तालुक्यात ७५७ शेतकºयांच्या ३९९.६९ हेक्टर क्षेत्राला गारपिटीचा फटका बसला आहे. यात जिरायती क्षेत्र २३०.६५, बागायती १५५.०४ तर १४ हेक्टरातील फळपिकांचा समावेश आहे.माजलगाव तालुक्यात ११३ शेतकºयांचे ८८.९९ हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले आहे. यात ७१.५३ हे. क्षेत्र जिरायतीचे, ५.४ हेक्टर क्षेत्र बागायतीचे तर १२.०६ हेक्टर क्षेत्रातील फळपिकांचा समावेश आहे.केज तालुक्यात १४५ शेतकºयांचे ६० हेक्टर आर. क्षेत्रात नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे सर्व शेतकरी फळपिके घेणारे आहेत. या तालुक्यात जिरायती वा बागायती पिकांचे नुकसान झाले नसल्याचा अहवाल आहे. हा अंतीम अहवाल लवकरच शासनाकडे पाठविला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. शासन मदत कधी मिळेल याकडे शेतकºयांचे डोळे लागले आहेत.जिल्ह्यातील नुकसानजिरायती क्षेत्र २९६८ हेक्टरबागायती क्षेत्र ११७६.४ हेक्टरफळपिके २५८.५१ हेक्टरएकूण ४४०२.९ हेक्टर

तालुकानिहाय अपेक्षित निधीगेवराई ३ कोटी ४९ लाख ४७ हजार ५४०शिरुर ३९ लाख १३ हजार ४६०माजलगाव ७७ लाख ६ हजार ३८४केज १० लाख ८० हजारबोंडअळीच्या भरपाईसाठी लागणार ७७ कोटी रुपयेबीड जिल्ह्यात गुलाबी सेंद्रीय बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कापूस उत्पादनात मोठी घट झाली. नागपूर अधिवेशनात कृषी मंत्र्यांच्या घोषणेनुसार पंचनाम्याचे सोपस्कर पार पडले. जिल्ह्यात १ लाख १५ हजार हेक्टर आर. क्षेत्रातील कपाशीचे बोंडअळीमुळे नुकसान झाले आहे. यात जवळपास २ लाख ५७ हजार शेतकºयांचा समावेश आहे. त्यांना मदतीसाठी सुमारे ७७ कोटी ५० हजार रुपयांचा निधी लागणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.