शहरं
Join us  
Trending Stories
1
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
2
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
3
“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा दिल्ली स्फोटात मृत्यू, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "इतका क्रूर..."
5
कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार, गगनबावडा तालुक्यात भीतीचे वातावरण
6
धनुष्यबाणावर आज फैसला? शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत अंतिम सुनावणी; आमदार अपात्रतेवरही येणार निकाल
7
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
8
AQIS: मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरावर एटीएसचा छापा; पुण्यातील'अल-कायदा' प्रकरणाशी कनेक्शन
9
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
10
दिल्ली स्फोटातील 10 पैकी 8 मृतदेहांची ओळख पटली; इतर दोन मृतदेह दहशतवाद्यांचे? तपास सुरू...
11
Delhi Blast: हल्ल्याच्या १० दिवस आधी कुठे होती 'ती' i20 कार? मोठी माहिती उघड, तपासाला वेग
12
STP ही एसआयपीपेक्षा वेगळी कशी? काय आहेत फायदे-तोटे? कुणासाठी आहे बेस्ट?
13
भाजप निरीक्षकांनी दिलेल्या नावांवर होणार शिक्कामोर्तब, नगराध्यक्ष, नगरसेवकांची ९५ टक्के नावे फायनल; संघटनेवर विश्वास
14
Delhi Blast : हृदयद्रावक! आई-वडिलांसाठी खास टॅटू, त्यावरुनच मृतदेहाची ओळख; दिल्ली स्फोटात अमरचा मृत्यू
15
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
16
"ड्रग्ज तस्करीला राजाश्रय मिळतोय"; तुळजापूरातील आरोपीच्या भाजप प्रवेशावरून सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्र्यांना थेट पत्र
17
१३९ दिवस मंगळ अस्त: ७ राशींचे मंगल होईल, बक्कळ लाभ; इच्छा पूर्ण, २ राशींना अमंगलाचे संकेत!
18
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
19
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
20
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली

बीड जिल्ह्यात पावणेपाच कोटींची हवी मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 00:20 IST

फेब्रुवारीमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे जिल्ह्यातील ७०२३ शेतक-यांचे ४४०२ हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले असून शासनाच्या निकषानुसार बाधित शेतक-यांना मदतीसाठी सुमारे ४ कोटी ७१ लाख ७ हजार ३८४ रुपयांचा निधी अपेक्षित आहे. प्रशासनाच्या अंतीम अहवालानुसार गेवराई तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : फेब्रुवारीमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे जिल्ह्यातील ७०२३ शेतक-यांचे ४४०२ हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले असून शासनाच्या निकषानुसार बाधित शेतक-यांना मदतीसाठी सुमारे ४ कोटी ७१ लाख ७ हजार ३८४ रुपयांचा निधी अपेक्षित आहे. प्रशासनाच्या अंतीम अहवालानुसार गेवराई तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे.

वातावरणातील बदलामुळे काही दिवसांपुर्वी जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली तर काही ठिकाणी गारपीट झाली. यात शेतकºयांच्या रब्बी पिकांसह फळबागांना फटका बसला. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश शासनस्तरावर देण्यात आल्यानंतर जिल्हा पातळीवरील यंत्रणेने पंचनामे पूर्ण केले. नुकताच शासनाकडे अंतीम अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार गेवराई, शिरुरकासार, माजलगाव आणि केज तालुक्यात नुकसान झाले आहे.गेवराई तालुक्यात ६००८ शेतकºयांच्या ३ हजार ८५४ हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले. या तालुक्यात जिरायतीचे २६६५.८ हेक्टर, बागायतीचे १०१६ हेक्टर तर १७२.४५ हेक्टर क्षेत्रातील फळबागांचे नुकसान झाले.

शिरुर कासार तालुक्यात ७५७ शेतकºयांच्या ३९९.६९ हेक्टर क्षेत्राला गारपिटीचा फटका बसला आहे. यात जिरायती क्षेत्र २३०.६५, बागायती १५५.०४ तर १४ हेक्टरातील फळपिकांचा समावेश आहे.माजलगाव तालुक्यात ११३ शेतकºयांचे ८८.९९ हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले आहे. यात ७१.५३ हे. क्षेत्र जिरायतीचे, ५.४ हेक्टर क्षेत्र बागायतीचे तर १२.०६ हेक्टर क्षेत्रातील फळपिकांचा समावेश आहे.केज तालुक्यात १४५ शेतकºयांचे ६० हेक्टर आर. क्षेत्रात नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे सर्व शेतकरी फळपिके घेणारे आहेत. या तालुक्यात जिरायती वा बागायती पिकांचे नुकसान झाले नसल्याचा अहवाल आहे. हा अंतीम अहवाल लवकरच शासनाकडे पाठविला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. शासन मदत कधी मिळेल याकडे शेतकºयांचे डोळे लागले आहेत.जिल्ह्यातील नुकसानजिरायती क्षेत्र २९६८ हेक्टरबागायती क्षेत्र ११७६.४ हेक्टरफळपिके २५८.५१ हेक्टरएकूण ४४०२.९ हेक्टर

तालुकानिहाय अपेक्षित निधीगेवराई ३ कोटी ४९ लाख ४७ हजार ५४०शिरुर ३९ लाख १३ हजार ४६०माजलगाव ७७ लाख ६ हजार ३८४केज १० लाख ८० हजारबोंडअळीच्या भरपाईसाठी लागणार ७७ कोटी रुपयेबीड जिल्ह्यात गुलाबी सेंद्रीय बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कापूस उत्पादनात मोठी घट झाली. नागपूर अधिवेशनात कृषी मंत्र्यांच्या घोषणेनुसार पंचनाम्याचे सोपस्कर पार पडले. जिल्ह्यात १ लाख १५ हजार हेक्टर आर. क्षेत्रातील कपाशीचे बोंडअळीमुळे नुकसान झाले आहे. यात जवळपास २ लाख ५७ हजार शेतकºयांचा समावेश आहे. त्यांना मदतीसाठी सुमारे ७७ कोटी ५० हजार रुपयांचा निधी लागणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.