शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

सत्ताधारी भाजपपुढे राष्ट्रवादी काँग्रेसचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2021 15:38 IST

BJP Vs NCP : राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी नगरपंचायतीत एकहाती सत्ता काबीज करण्यासाठी सरसावले आहेत.

- राम लंगेवडवणी ( बीड) : नगरपंचायतीची निवडणूक जाहीर झाली आहे. १७ नगरसेवक निवडीसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत सत्ताधारी भाजपपुढे ( BJP ) राष्ट्रवादी काँग्रेसने ( NCP ) आव्हान उभे केले आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्याने आता नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीसाठी  (Mahavikas Aaghadi ) मोर्चेबांधणीला वेग आला आहे. दरम्यान, या निवडणुकीत तरुणांचा मोठा उत्साह दिसून येत असल्याचे चित्र आहे.

ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्यानंतरच २०१५ मध्ये नगरपंचायतीची पहिली निवडणूक झाली. पहिल्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे नऊ नगरसेवक निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच नगरसेवक निवडून आले. अपक्ष दोन आणि शिवसेनेचा एक असे एकूण १७ नगरसेवक निवडून आले. यामुळे भाजपचा नगराध्यक्ष झाला. पहिल्या नगराध्यक्षपदी मंगल राजाभाऊ मुंडे यांना संधी मिळाली. त्यानंतर अडीच वर्षांनंतर मंगल राजाभाऊ मुंडे यांच्यावर अविश्वास ठराव आला. तो काही मताने बारगळला. अडीच वर्षांनी पुन्हा त्याच नगराध्यक्ष झाल्या.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्याने आता नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीसाठी मोर्चेबांधणीला वेग आला आहे. सत्ताधारी भाजपला कोंडीत घेण्यासाठी स्थानिक नेतेही यासाठी मतांची जुळवाजुळव करण्याच्या तयारीला लागले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी नगरपंचायतीत एकहाती सत्ता काबीज करण्यासाठी सरसावले आहेत. सत्तेसाठी वाट्टेल ते करा, पण सत्ता स्थापन करा. असे आदेश त्यांनी स्थानिक नेत्यांना दिला आहे. महाविकास आघाडीकडून जिल्हा बँकेवर अमोल आंधळे यांना संचालक होण्यासाठी भाजपाचे माजी आमदार केशवराव आंधळे यांनी महाविकास आघाडीसोबत घरोबा केला. आता नगरपंचायतीच्या निवडणुकीत माजी आमदार केशवराव आंधळे हे महाविकास आघाडीबरोबर राहणार का? याकडे स्थानिकाचे लक्ष आहे. आमदार सोळंके हे महाविकास आघाडीसोबत आंधळे यांना सोबत घेणार का? याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. सध्या तरी भाजपचे राजाभाऊ मुंडे व केशवराव आंधळे यांच्यात दरी निर्माण झाली असली तरी आगामी निवडणुकीत आंधळे यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. दोन दादा एकत्र झाले तर नगरपंचायतीचे चित्र वेगळे राहील, असा अंदाज आहे. गेल्या पाच वर्षांत नगराध्यक्ष मंगल मुंडे यांचे पती राजाभाऊ मुंडे यांनी वडवणी शहरात बोटावर मोजण्याइतपत कामे सोडली तर नागरिकांच्या मूलभूत सुविधा पूर्ण करण्यास ते अपयशी ठरले. यामुळे जनतेच्या रोषाला त्यांना बळी पडावे लागेल, असे चित्र सध्या तरी शहरात दिसत आहे.

आरक्षणामुळे अनेकांची कोंडीनगरपंचायत मुदत संपल्यानंतर कोरोनामुळे सरकारने नगरपंचायतीवर प्रशासक नेमला. त्यानंतर २०२० मध्ये निवडणूक आयोगाने प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले. प्रभाग रचना झाली. आरक्षण पडले आणि दिग्गज कामाला लागले. मात्र ओबीसी आरक्षणामुळे निवडणूक आयोगाने पुन्हा प्रभाग रचनेच्या आदेश काढल्यानंतर अनेकांची अडचण झाली आहे. काहींना प्रभाग राहिला नाही, तर कित्येक जणांना निवडणुकीतून माघार घ्यावी लागली. प्रभात एक आणि १७ अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे. प्रभाग पाच ओबीसीला राखीव झाला. प्रभाग क्रमांक सात सर्वसाधारणसाठी सुटले आहे.

पक्षीय बलाबल :भाजप- ९राष्ट्रवादी काँग्रेस- ५अपक्ष -२शिवसेना- १एकूण-१७

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाElectionनिवडणूक