शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नारायणवाडीकरांचा रुद्रावतार, मतदानावर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 00:49 IST

आष्टी- पाटोदा - शिरूर विधानसभा मतदारसंघातील नारायणवाडी येथील ग्रामस्थांनी वर्षानुवर्षे रखडलेल्या रस्त्यासाठी तीन महिन्यापूर्वी मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला होता.

ठळक मुद्देनिमगाव-वरंगळवाडी ग्रुप ग्रामपंचायत : रखडलेल्या रस्त्यासाठी उचलले पाऊल

लोकमत न्यूज नेटवर्कशिरुर कासार : आष्टी- पाटोदा - शिरूर विधानसभा मतदारसंघातील नारायणवाडी येथील ग्रामस्थांनी वर्षानुवर्षे रखडलेल्या रस्त्यासाठी तीन महिन्यापूर्वी मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला होता. मात्र, यावर प्रशासनाकडून कसल्याही प्रकारची उपाययोजना न झाल्याने ग्रामस्थांनी गुरुवारी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकला.शिरूर कासार तालुक्यातील नारायणवाडी हे १३५० लोकसंख्येचे गाव आहे. या गावात ७३३ मतदार असून हे गाव निमगाव -वरंगळवाडी या ग्रुप ग्रामपंचायतला जोडलेले आहे.नारायणवाडी ते निमगाव या रस्त्याच्या कामाची मागणी ग्रामस्थांची होती. निवेदन दिल्यानंतरच्या तीन महिन्यात प्रशासनाचा प्रतिनिधी गावाकडे फिरकला नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी संतप्त होत मतदानावर बहिष्काराचा निर्णय घेतला व निर्णयावर ठाम राहिले.नायब तहसीलदारांची मध्यस्थी४लोकशाहीच्या अधिकारापासून वंचित राहू नये यासाठी शिरूर नायब तहसीलदार किशोर सानप यांनी नारायणवाडी ग्रामस्थांची भेट घेऊन मतदान करण्याचा आग्रह धरला, ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु ग्रामस्थ ठाम राहिले. तहसीलदार प्रिया सुळे यांनीही नारायण वाडीत जाऊन ग्रामस्थांना त्यांच्या मागण्यासंदर्भात आश्वासन दिले तरीही ग्रामस्थ ऐकण्याच्या भूमिकेत नव्हते.केंद्रावर शुकशुकाट, ग्रामस्थ पारावर४ प्रशासनाने गावातील शाळेत मतदान केंद्र स्थापित केले होते. मात्र समस्त नारायणवाडी ग्रामस्थांनी बहिष्कार टाकल्याने मतदान केंद्रावर शुकशुकाट होता.मात्र, ग्रामस्थ पारावर दिवसभर एकत्रच बसून होते.जिल्हाधिकाऱ्यांचे लेखी आश्वासन हवे४प्रशासकीय पातळीवर आमचा ग्रामस्थांचा विश्वास राहिला नसून सध्याच्या स्थितीत फक्त जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला लेखी आश्वासन दिले तरच आम्ही ग्रामस्थ मतदानावर बहिष्कार मागे घेऊ असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतल्याचे एस. के. काळे यांनी सांगितले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbeed-pcबीडMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019agitationआंदोलन