शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
5
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
6
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
7
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
8
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
9
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
11
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
12
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
13
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
14
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
15
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
16
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
17
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
18
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
19
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
20
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

तीन वेळा विवाह अन् १२७ मुलांचे ‘माय-बाप’; बीडच्या प्रीती व संतोष गर्जे यांची 'लव्ह स्टोरी'

By सोमनाथ खताळ | Updated: February 14, 2025 16:29 IST

व्हॅलेंटाइन डे स्पेशल: चित्रपटातील कथेला लाजवेल, अशी ही यशोगाथा आहे.

बीड : सामाजिक काम करताना नातेवाइकांच्या मनाचाही विचार करावा लागतो. त्यामुळे एकाच जोडप्याने स्वत:साठी, आई आणि सासू-सासऱ्यांसाठी तीनवेळा विवाह केला. प्रीती व संतोष गर्जे असे या लव्ह बर्ड्सचे नाव असून, ते आज ‘सहारा’ (गेवराई, जि. बीड) अनाथालयातील १२७ मुलांचे माय - बाप म्हणून काम करतात. चित्रपटातील स्टोरीला लाजवेल, अशी ही यशोगाथा आहे.

संतोष १२ वी पास, तर प्रीती यांनी विधिची पदवी घेतली आहे. २०११ साली संतोष हे यवतमाळ येथे 'चलो युवा कुछ कर दिखाओ' या शिबिरात मार्गदर्शनासाठी गेले. तेथे प्रश्नोत्तर झाले. त्यानंतर एकमेकांचे संपर्क क्रमांक ‘शेअर’केले. ‘फ्रेंडशिप डे’ला प्रीतीचा पहिला मेसेज आला. सुरुवातीला मेसेज आणि नंतर कॉलवर बोलू लागले. संस्थेची माहिती आणि इतर हालचाली विचारू लागले. बोलताना ‘स्वभाव’ आवडला. संतोष यांना आपण करत असलेल्या कामासाठी ‘जोडीदार’ म्हणून प्रीती योग्य असल्याचा विश्वास बसला. त्यामुळे प्रीतीला सहारा अनाथालयात बोलावले. १० नोव्हेंबर २०११ रोजी त्या गेवराईला आल्या. सर्व पाहणी करून ते बांधावर गप्पा मारत होते. सूर्य मावळतीला जात असतानाच संतोष यांनी प्रीतीला ‘प्रपोझ’ केले. तेवढ्यावरच न थांबता उद्याच लग्न करू असा प्रस्तावही ठेवला. त्याप्रमाणे ११-११-२०११ या दिवशी दुपारी ११:११ मिनिटांचा मुहूर्त ठरला. आदल्या दिवशी सराफाकडून १ ग्रॅमचे मंगळसूत्र घेतले आणि ठरल्याप्रमाणे विवाह झाला.

कसे झाले तीन लग्न?११ नाेव्हेंबर २०११ साली प्रीती व संतोष हे दोघेच कपिलधार येथे गेले. एका झाडाखाली थांबून एकमेकांचा स्वीकार केला. त्यानंतर प्रीती परत यवतमाळला गेल्या. तीन महिने राहिल्या. फेब्रुवारीला परत आल्या. सोबत त्यांचे आई-वडील होते. त्यांनी संतोष यांचे काम पाहिले. तेव्हा ते ३५ मुलांचा सांभाळ करत होते. हे पाहून नोंदणी पद्धतीने २५० रुपयांत दुसरा विवाह झाला. याची बातमी झाल्यावर संतोष यांच्या आईला समजले. त्या रडत आल्या. नातेवाइक काय म्हणतील, असा प्रश्न उपस्थित केला. त्यांच्या समाधानासाठी १८ मार्च २०१२ ला पुन्हा तिसरे लग्न केले. तेव्हा २०० वऱ्हाडी होते.

१२७ मुलांना ‘सहारा’संतोष यांच्या बहिणीचा दुसऱ्या बाळंतपणात मृत्यू झाला. पहिल्या मुलीचा मेहुण्याने सांभाळ न केल्याने तिचे हाल पाहवले नाहीत. त्यामुळे २०२४ साली ‘सहारा’ अनाथालाय सुरू केले. सध्या येथे ४७ मुलींसह एकूण १२७ मुले आहेत. त्यांचा सांभाळ आई-वडील बनून प्रीती व संतोष गर्जे करतात. संतोष यांच्या पोटच्या स्वरा व ओवी या दोन मुलीही याच मुलांमध्ये असतात.

टॅग्स :Valentine Dayव्हॅलेंटाईन्स डेBeedबीडsocial workerसमाजसेवक