शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

तीन वेळा विवाह अन् १२७ मुलांचे ‘माय-बाप’; बीडच्या प्रीती व संतोष गर्जे यांची 'लव्ह स्टोरी'

By सोमनाथ खताळ | Updated: February 14, 2025 16:29 IST

व्हॅलेंटाइन डे स्पेशल: चित्रपटातील कथेला लाजवेल, अशी ही यशोगाथा आहे.

बीड : सामाजिक काम करताना नातेवाइकांच्या मनाचाही विचार करावा लागतो. त्यामुळे एकाच जोडप्याने स्वत:साठी, आई आणि सासू-सासऱ्यांसाठी तीनवेळा विवाह केला. प्रीती व संतोष गर्जे असे या लव्ह बर्ड्सचे नाव असून, ते आज ‘सहारा’ (गेवराई, जि. बीड) अनाथालयातील १२७ मुलांचे माय - बाप म्हणून काम करतात. चित्रपटातील स्टोरीला लाजवेल, अशी ही यशोगाथा आहे.

संतोष १२ वी पास, तर प्रीती यांनी विधिची पदवी घेतली आहे. २०११ साली संतोष हे यवतमाळ येथे 'चलो युवा कुछ कर दिखाओ' या शिबिरात मार्गदर्शनासाठी गेले. तेथे प्रश्नोत्तर झाले. त्यानंतर एकमेकांचे संपर्क क्रमांक ‘शेअर’केले. ‘फ्रेंडशिप डे’ला प्रीतीचा पहिला मेसेज आला. सुरुवातीला मेसेज आणि नंतर कॉलवर बोलू लागले. संस्थेची माहिती आणि इतर हालचाली विचारू लागले. बोलताना ‘स्वभाव’ आवडला. संतोष यांना आपण करत असलेल्या कामासाठी ‘जोडीदार’ म्हणून प्रीती योग्य असल्याचा विश्वास बसला. त्यामुळे प्रीतीला सहारा अनाथालयात बोलावले. १० नोव्हेंबर २०११ रोजी त्या गेवराईला आल्या. सर्व पाहणी करून ते बांधावर गप्पा मारत होते. सूर्य मावळतीला जात असतानाच संतोष यांनी प्रीतीला ‘प्रपोझ’ केले. तेवढ्यावरच न थांबता उद्याच लग्न करू असा प्रस्तावही ठेवला. त्याप्रमाणे ११-११-२०११ या दिवशी दुपारी ११:११ मिनिटांचा मुहूर्त ठरला. आदल्या दिवशी सराफाकडून १ ग्रॅमचे मंगळसूत्र घेतले आणि ठरल्याप्रमाणे विवाह झाला.

कसे झाले तीन लग्न?११ नाेव्हेंबर २०११ साली प्रीती व संतोष हे दोघेच कपिलधार येथे गेले. एका झाडाखाली थांबून एकमेकांचा स्वीकार केला. त्यानंतर प्रीती परत यवतमाळला गेल्या. तीन महिने राहिल्या. फेब्रुवारीला परत आल्या. सोबत त्यांचे आई-वडील होते. त्यांनी संतोष यांचे काम पाहिले. तेव्हा ते ३५ मुलांचा सांभाळ करत होते. हे पाहून नोंदणी पद्धतीने २५० रुपयांत दुसरा विवाह झाला. याची बातमी झाल्यावर संतोष यांच्या आईला समजले. त्या रडत आल्या. नातेवाइक काय म्हणतील, असा प्रश्न उपस्थित केला. त्यांच्या समाधानासाठी १८ मार्च २०१२ ला पुन्हा तिसरे लग्न केले. तेव्हा २०० वऱ्हाडी होते.

१२७ मुलांना ‘सहारा’संतोष यांच्या बहिणीचा दुसऱ्या बाळंतपणात मृत्यू झाला. पहिल्या मुलीचा मेहुण्याने सांभाळ न केल्याने तिचे हाल पाहवले नाहीत. त्यामुळे २०२४ साली ‘सहारा’ अनाथालाय सुरू केले. सध्या येथे ४७ मुलींसह एकूण १२७ मुले आहेत. त्यांचा सांभाळ आई-वडील बनून प्रीती व संतोष गर्जे करतात. संतोष यांच्या पोटच्या स्वरा व ओवी या दोन मुलीही याच मुलांमध्ये असतात.

टॅग्स :Valentine Dayव्हॅलेंटाईन्स डेBeedबीडsocial workerसमाजसेवक