शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

मुंडे -क्षीरसागर नारायणगडावर एकत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 23:48 IST

पालकमंत्री पंकजा मुंडे आणि रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर हे दोघे आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्रीक्षेत्र नारायणगडावर एकत्र आले आणि उठणाऱ्या राजकीय वावड्यांना पूर्णविराम दिला. आगामी बीड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी मुंडे-क्षीरसागर यांच्यात राजकीय बेबनाव निर्माण झाल्याची चर्चा सुरू केली होती. याबाबत पंकजा मुंडे यांनी खुलासा करताना यात काहीही तथ्य नसल्याचे स्पष्ट सांगितले.

ठळक मुद्देपंकजा मुंडे : उद्धव ठाकरे माझे बंधू, मला कसे अडचणीत आणतील ? आमच्यात कोणतेही वाद नाहीत

बीड : पालकमंत्री पंकजा मुंडे आणि रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर हे दोघे आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्रीक्षेत्र नारायणगडावर एकत्र आले आणि उठणाऱ्या राजकीय वावड्यांना पूर्णविराम दिला. आगामी बीड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी मुंडे-क्षीरसागर यांच्यात राजकीय बेबनाव निर्माण झाल्याची चर्चा सुरू केली होती. याबाबत पंकजा मुंडे यांनी खुलासा करताना यात काहीही तथ्य नसल्याचे स्पष्ट सांगितले.गेल्या काही दिवसांपासून या दोघांत वाद निर्माण झाल्याच्या चर्चेने धुराळा उडाला होता. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, गड हे भाविकांचे आहेत, ते तसेच राहू द्या. श्रेयवादासाठी गडाला राजकारणामध्ये ओढू नका. गडांना राजकारणात ओढाल तर वाट लागेल, असे आवाहन करत बीड जिल्ह्यातील जनतेने राजकीय अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले. आमचे कोणासोबत कोणतेही वाद नाहीत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे माझे भाऊ आहेत. क्षीरसागरांना शिवसेनेत घेतांना त्यांनी मला विचारले होते. ते बहिणाला कसे अडचणीत आणतील, असा विश्वासही त्यांनी नारायणगडावर व्यक्त केला. जनतेला विकासाचा शब्द दिला आहे आणि तो पाळणार आहोत. आता न मागता मिळेल, असे म्हणत ‘आम्ही द्वेषाचे राजकारण करत नाहीत.मी लोकांच्या दहा वेळा पाया पडेल पण मतासाठी कुणाच्या पाया पडणार नाही’ असेही त्या म्हणाल्या.धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जात असलेल्या श्रीक्षेत्र नारायण गडाला मोठा इतिहास आणि अध्यात्मिक वारसा आहे, म्हणूनच येथे लाखो भाविकांची गर्दी असते. भाविकांना सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत, अठरा पगड जातीचे भाविक येथे येतात, नारायणगड हे प्रेरणास्थळ आणि शक्तीस्थळ असल्याचे प्रतिपादन जयदत्त क्षीरसागर यांनी केले. यावेळी मठाधिपती महंत शिवाजी महाराज उपस्थित होते.यावेळी प्रास्ताविक गडाचे विश्वस्त दिलीप गोरे यांनी केले तर विस्वतांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार व स्वागत करण्यात आला. कार्यक्र माला व्यासपीठावर महंत शिवाजी महाराज, जि.प.अध्यक्षा सविता गोल्हार, माजी आ बदामराव पंडित, जिल्हाप्रमुख कूंडलीक खांडे, नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, शालिनी कराड, कल्याण आखाडे, राजेंद्र मस्के, विलास बडगे, अरुण डाके, दिनकर कदम आदी उपस्थित होते.नारायणगड हे प्रेरणास्थळ : जयदत्त क्षीरसागरजयदत्त क्षीरसागर आपल्या भाषणात बोलतांना म्हणाले आज नारायणगडावर भक्तीचा महापुर आला आहे. नारायणगड हे प्रेरणास्थळ आणि शक्तीस्थळ आहे.पंढरीच्या पांडूरंगाला नारायणगडावरु न पाहिले जाते.देवाच्या दारात उभे राहिले तरी पुण्य पदरात पडते.म्हणूच वारी परत फिरतांना बळीराजाचे आगमन होते. आजून चागंला पाऊस पडू दे हेच विठ्ठलाच्या चरणी मागणे आहे. तो भक्तांसाठीच उभा आहे.बीड जिल्ह्याने कधीच जातपात पाळली नाही. विकासाला साथ दिली, माणसे जोडणारी माणसे आम्हाला हवी आहेत.गतवेळी मी आमदार म्हणून आलो आज नामदार म्हणून येथे आलो आहे ते केवळ आपल्या आशीर्वादाने असेही जयदत्त क्षीरसागर म्हणाले.

टॅग्स :BeedबीडPankaja Mundeपंकजा मुंडेJaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागरAshadhi Ekadashiआषाढी एकादशी