शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
2
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
3
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
4
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
5
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
6
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
7
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
8
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
9
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
10
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
11
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
12
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
13
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
14
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
15
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
16
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
17
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
18
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
19
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
20
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स

मुंडे -क्षीरसागर नारायणगडावर एकत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 23:48 IST

पालकमंत्री पंकजा मुंडे आणि रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर हे दोघे आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्रीक्षेत्र नारायणगडावर एकत्र आले आणि उठणाऱ्या राजकीय वावड्यांना पूर्णविराम दिला. आगामी बीड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी मुंडे-क्षीरसागर यांच्यात राजकीय बेबनाव निर्माण झाल्याची चर्चा सुरू केली होती. याबाबत पंकजा मुंडे यांनी खुलासा करताना यात काहीही तथ्य नसल्याचे स्पष्ट सांगितले.

ठळक मुद्देपंकजा मुंडे : उद्धव ठाकरे माझे बंधू, मला कसे अडचणीत आणतील ? आमच्यात कोणतेही वाद नाहीत

बीड : पालकमंत्री पंकजा मुंडे आणि रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर हे दोघे आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्रीक्षेत्र नारायणगडावर एकत्र आले आणि उठणाऱ्या राजकीय वावड्यांना पूर्णविराम दिला. आगामी बीड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी मुंडे-क्षीरसागर यांच्यात राजकीय बेबनाव निर्माण झाल्याची चर्चा सुरू केली होती. याबाबत पंकजा मुंडे यांनी खुलासा करताना यात काहीही तथ्य नसल्याचे स्पष्ट सांगितले.गेल्या काही दिवसांपासून या दोघांत वाद निर्माण झाल्याच्या चर्चेने धुराळा उडाला होता. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, गड हे भाविकांचे आहेत, ते तसेच राहू द्या. श्रेयवादासाठी गडाला राजकारणामध्ये ओढू नका. गडांना राजकारणात ओढाल तर वाट लागेल, असे आवाहन करत बीड जिल्ह्यातील जनतेने राजकीय अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले. आमचे कोणासोबत कोणतेही वाद नाहीत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे माझे भाऊ आहेत. क्षीरसागरांना शिवसेनेत घेतांना त्यांनी मला विचारले होते. ते बहिणाला कसे अडचणीत आणतील, असा विश्वासही त्यांनी नारायणगडावर व्यक्त केला. जनतेला विकासाचा शब्द दिला आहे आणि तो पाळणार आहोत. आता न मागता मिळेल, असे म्हणत ‘आम्ही द्वेषाचे राजकारण करत नाहीत.मी लोकांच्या दहा वेळा पाया पडेल पण मतासाठी कुणाच्या पाया पडणार नाही’ असेही त्या म्हणाल्या.धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जात असलेल्या श्रीक्षेत्र नारायण गडाला मोठा इतिहास आणि अध्यात्मिक वारसा आहे, म्हणूनच येथे लाखो भाविकांची गर्दी असते. भाविकांना सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत, अठरा पगड जातीचे भाविक येथे येतात, नारायणगड हे प्रेरणास्थळ आणि शक्तीस्थळ असल्याचे प्रतिपादन जयदत्त क्षीरसागर यांनी केले. यावेळी मठाधिपती महंत शिवाजी महाराज उपस्थित होते.यावेळी प्रास्ताविक गडाचे विश्वस्त दिलीप गोरे यांनी केले तर विस्वतांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार व स्वागत करण्यात आला. कार्यक्र माला व्यासपीठावर महंत शिवाजी महाराज, जि.प.अध्यक्षा सविता गोल्हार, माजी आ बदामराव पंडित, जिल्हाप्रमुख कूंडलीक खांडे, नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, शालिनी कराड, कल्याण आखाडे, राजेंद्र मस्के, विलास बडगे, अरुण डाके, दिनकर कदम आदी उपस्थित होते.नारायणगड हे प्रेरणास्थळ : जयदत्त क्षीरसागरजयदत्त क्षीरसागर आपल्या भाषणात बोलतांना म्हणाले आज नारायणगडावर भक्तीचा महापुर आला आहे. नारायणगड हे प्रेरणास्थळ आणि शक्तीस्थळ आहे.पंढरीच्या पांडूरंगाला नारायणगडावरु न पाहिले जाते.देवाच्या दारात उभे राहिले तरी पुण्य पदरात पडते.म्हणूच वारी परत फिरतांना बळीराजाचे आगमन होते. आजून चागंला पाऊस पडू दे हेच विठ्ठलाच्या चरणी मागणे आहे. तो भक्तांसाठीच उभा आहे.बीड जिल्ह्याने कधीच जातपात पाळली नाही. विकासाला साथ दिली, माणसे जोडणारी माणसे आम्हाला हवी आहेत.गतवेळी मी आमदार म्हणून आलो आज नामदार म्हणून येथे आलो आहे ते केवळ आपल्या आशीर्वादाने असेही जयदत्त क्षीरसागर म्हणाले.

टॅग्स :BeedबीडPankaja Mundeपंकजा मुंडेJaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागरAshadhi Ekadashiआषाढी एकादशी