शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

तारूगव्हाण बंधारा कामासाठी गोदावरी नदीपात्रात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 00:04 IST

बारा गावच्या नागरिकांनी तारूगव्हाण गोदापात्रात धरणे आंदोलनाला बसलेल्या शेतक-यांना जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही.व्ही.नखाते यांच्या लेखी आश्वसनाने आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी माजीमंत्री प्रकाश सोळंके यांनी मध्यस्थी केली.

ठळक मुद्देशेकडो गावकरी गोदावरी पात्रात : १५ जुलैपर्यंत काम पूर्ण करण्याचे दिले कार्यकारी अभियंत्याने आश्वासन

माजलगाव : तारूगव्हाण गोदावरी नदीवरील बंधाऱ्याचे काम १३ वर्षांपासून प्रलंबित आहे. अत्यंत धिम्यागतीने काम करण्यात येत आहे. ते काम त्वरित सुरू करून या बंधा-यावरील अवलंबून असणा-या गावकऱ्यांचा पाणी प्रश्न त्वरित सोडविण्यात यावा, या मागणीसाठी परिसरातील दहा बारा गावच्या नागरिकांनी तारूगव्हाण गोदापात्रात धरणे आंदोलनाला बसलेल्या शेतक-यांना जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही.व्ही.नखाते यांच्या लेखी आश्वसनाने आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी माजीमंत्री प्रकाश सोळंके यांनी मध्यस्थी केली.माजलगाव, परळी, पाथरी तालुक्यातील २५ गावच्या सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी तात्कालिन आघाडी सरकारने पाथरी तालुक्यातील तारूगव्हाण, गोदावरी नदीवरील १२३ कोटी रुपयांचे बंधारा बांधकाम १३ वर्षांपूर्वी सुरू केले होते. या बंधाºयातील पाण्याच्या उपलब्धतेमुळे पाथरीसह माजलगाव तालुक्यातील जवळपास २५ गावांचा पाणी प्रश्न मिटवण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर होते. जवळपास १३ वर्षांपासून बंधाºयाची बांधणी अत्यंत संथ गतीने हे काम सुरू आहे. हा बंधारा पूर्ण होऊन परिसरातील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल या अपेक्षेने जवळपास २५ गावांतील शेतकरी चातकाप्रमाणे बंधाºयाचे बांधकाम पूर्ण होण्याची वाट पाहत आहे. परंतु गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ सुस्तावलेल्या अवस्थेत असल्याने हे काम अत्यंत संथपणे सुरू आहे. हे काम गतीने करावी अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली.त्यामुळे गावक-यांनी तारूगव्हाण बंधाºयाचे काम त्वरित सुरू करावे, या मागणीसाठी गोदावरी पात्रातच सोमवार, ३ रोजी भर उन्हात धरणे आंदोलनाला सुरु वात केली. दरम्यान यावेळी माजीमंत्री सोळंके, धैर्यशील सोळंके, अमित नाटकर, संतोष देशमुख, अनंतराव डक, बाळासाहेब डाके, अनंतराव नायबळ, गोविंदराव झेटे प्रमुख नेत्यांचे २५ गावचे शेतकरी यावेळी आंदोलनस्थळी उपस्थित होते. दरम्यान, या वेळी माजीमंत्री प्रकाश सोळंके, धैर्यशील सोळंके यांनी जलसंपदा अधिका-यांना चांगलेच धारेवर धरले. तसेच आंदोलकांनी ही या कामाच्या दिरंगाईबद्दल अधीक्षक अभियंता नखाते, संबंधित बांधकाम कंत्राटदारास चांगलेच धारेवर धरले.

टॅग्स :BeedबीडgodavariगोदावरीagitationआंदोलनPrakash Solankeप्रकाश सोळंके