शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

तारूगव्हाण बंधारा कामासाठी गोदावरी नदीपात्रात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 00:04 IST

बारा गावच्या नागरिकांनी तारूगव्हाण गोदापात्रात धरणे आंदोलनाला बसलेल्या शेतक-यांना जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही.व्ही.नखाते यांच्या लेखी आश्वसनाने आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी माजीमंत्री प्रकाश सोळंके यांनी मध्यस्थी केली.

ठळक मुद्देशेकडो गावकरी गोदावरी पात्रात : १५ जुलैपर्यंत काम पूर्ण करण्याचे दिले कार्यकारी अभियंत्याने आश्वासन

माजलगाव : तारूगव्हाण गोदावरी नदीवरील बंधाऱ्याचे काम १३ वर्षांपासून प्रलंबित आहे. अत्यंत धिम्यागतीने काम करण्यात येत आहे. ते काम त्वरित सुरू करून या बंधा-यावरील अवलंबून असणा-या गावकऱ्यांचा पाणी प्रश्न त्वरित सोडविण्यात यावा, या मागणीसाठी परिसरातील दहा बारा गावच्या नागरिकांनी तारूगव्हाण गोदापात्रात धरणे आंदोलनाला बसलेल्या शेतक-यांना जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही.व्ही.नखाते यांच्या लेखी आश्वसनाने आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी माजीमंत्री प्रकाश सोळंके यांनी मध्यस्थी केली.माजलगाव, परळी, पाथरी तालुक्यातील २५ गावच्या सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी तात्कालिन आघाडी सरकारने पाथरी तालुक्यातील तारूगव्हाण, गोदावरी नदीवरील १२३ कोटी रुपयांचे बंधारा बांधकाम १३ वर्षांपूर्वी सुरू केले होते. या बंधाºयातील पाण्याच्या उपलब्धतेमुळे पाथरीसह माजलगाव तालुक्यातील जवळपास २५ गावांचा पाणी प्रश्न मिटवण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर होते. जवळपास १३ वर्षांपासून बंधाºयाची बांधणी अत्यंत संथ गतीने हे काम सुरू आहे. हा बंधारा पूर्ण होऊन परिसरातील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल या अपेक्षेने जवळपास २५ गावांतील शेतकरी चातकाप्रमाणे बंधाºयाचे बांधकाम पूर्ण होण्याची वाट पाहत आहे. परंतु गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ सुस्तावलेल्या अवस्थेत असल्याने हे काम अत्यंत संथपणे सुरू आहे. हे काम गतीने करावी अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली.त्यामुळे गावक-यांनी तारूगव्हाण बंधाºयाचे काम त्वरित सुरू करावे, या मागणीसाठी गोदावरी पात्रातच सोमवार, ३ रोजी भर उन्हात धरणे आंदोलनाला सुरु वात केली. दरम्यान यावेळी माजीमंत्री सोळंके, धैर्यशील सोळंके, अमित नाटकर, संतोष देशमुख, अनंतराव डक, बाळासाहेब डाके, अनंतराव नायबळ, गोविंदराव झेटे प्रमुख नेत्यांचे २५ गावचे शेतकरी यावेळी आंदोलनस्थळी उपस्थित होते. दरम्यान, या वेळी माजीमंत्री प्रकाश सोळंके, धैर्यशील सोळंके यांनी जलसंपदा अधिका-यांना चांगलेच धारेवर धरले. तसेच आंदोलकांनी ही या कामाच्या दिरंगाईबद्दल अधीक्षक अभियंता नखाते, संबंधित बांधकाम कंत्राटदारास चांगलेच धारेवर धरले.

टॅग्स :BeedबीडgodavariगोदावरीagitationआंदोलनPrakash Solankeप्रकाश सोळंके