शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

जिल्हास्तरीय समितीची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 00:13 IST

जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी आत्महत्याबाबत जिल्हास्तरीय समितीची बैठक निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी आत्महत्याबाबत जिल्हास्तरीय समितीची बैठक निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज निला, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी सुभाष साळवे, कृषी उपसंचालक सी.डी. पाटील, जिल्हा निबंधक कार्यालयाचे सहायक निबंधक जी.के.परदेशी, पोलीस अधीक्षक कार्यालयाचे के.वाय. चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.बैठकीमध्ये जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येबाबतची एकूण २२ प्रकरणे ठेवण्यात आली. यात जिल्हास्तरीय समितीने निर्णय घेऊन पात्र ठरविलेल्या प्रकरणातील शेतकरी कुटुंबांना नियमानुसार योग्य तो लाभ देण्याच्या सूचना संबंधित विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच यापुर्वी लाभ मागितलेल्या शेतकरी कुटुंबांना मदत मिळाली का, याचा आढावा देखील यावेळी घेण्यात आला.मदत देण्याच्या संदर्भातील अडचणी जाणून घेतल्या तसेच तात्काळ मागणीप्रमाणे योजना देण्याच्या सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना परळीकर यांनी यावेळी दिल्या. तसेच शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने योग्य ती कार्यवाही व उपाययोजना केल्या जात असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

टॅग्स :droughtदुष्काळgovernment schemeसरकारी योजनाfarmer suicideशेतकरी आत्महत्या