शहरं
Join us  
Trending Stories
1
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
2
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
3
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नाही म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
4
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
5
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
6
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
7
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
8
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
9
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
11
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
12
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
14
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
15
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
16
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
17
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
18
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
19
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
20
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?

‘नीट’ न देता मेडिकलला प्रवेश; विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:38 IST

अविनाश मुडेगावकर लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : ‘नीट’ची परीक्षा न देताही बारावीचे गुण ग्राह्य धरून वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश ...

अविनाश मुडेगावकर

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबाजोगाई : ‘नीट’ची परीक्षा न देताही बारावीचे गुण ग्राह्य धरून वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश देण्याचा धक्कादायक निर्णय तामिळनाडू सरकारने घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रात नीट परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसमोरही संभ्रम निर्माण झाला आहे. जर तामिळनाडू सरकार असा निर्णय घेत असेल तर महाराष्ट्रातील सरकारनेही असा निर्णय घेऊन राज्यातील विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी विद्यार्थी, पालकांमधून पुढे येत आहे.

वैद्यकीय प्रवेशासाठी होणाऱ्या ‘नीट’च्या राष्ट्रीय पातळीवरील प्रवेश परीक्षा या विरोधात तामिळनाडू सरकारने विधेयक सादर करून ही परीक्षा न देताही वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया राज्याद्वारेच करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे इतरही राज्ये आता याच कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करतील. केंद्रीय पातळीवर होणाऱ्या या परीक्षेबाबत यापूर्वीही अनेकदा वादविवाद निर्माण झाले. नीट परीक्षा यापूर्वी दोन वेळा बंद झाली होती. राज्याच्या सीईटीच्या माध्यमातून वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया झाली होती. मात्र पुन्हा नीट सुरळीत सुरू झाली. नीट परीक्षेपूर्वी केंद्र शासनाची एएमपीआयटी(AMPIT) या परीक्षेमार्फत ३० टक्के तर सीईटीमार्फत ७० टक्के वैद्यकीय शिक्षणाच्या जागा भरण्यात येत असत. याचा फायदा त्या त्या राज्यातील विद्यार्थ्यांना होत होता. मात्र सदैव संभ्रम निर्माण करणाऱ्या शिक्षण पद्धतीत वेगवेगळे बदल सातत्याने सुरूच असतात. याचा मोठा फटका विद्यार्थ्यांना सहन करावा लागतो. आता पुन्हा प्रत्येक राज्य काय निर्णय घेईल? याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

...

‘नीट’च्या माध्यमातून रिपीटर्सचीच चलती

नीट परीक्षा देणारे विद्यार्थी पहिल्या प्रयत्नात फार कमी वेळा गुणवत्ता प्राप्त करतात. मात्र ही परीक्षा रिपीट करणाऱ्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेश मिळतो. यासाठी रिपीटर्सची मोठी संख्या आहे. यासाठी शासनाने पहिल्यांदा फ्रेश परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ६० टक्के तर रिपीटर्ससाठी ४० टक्के प्रवेश क्षमता ठेवावी, अशी मागणी विद्यार्थी व पालकांमधून पुढे आली आहे.

....

काय आहे तामिळनाडू सरकारचा धक्कादायक निर्णय?

तामिळनाडूमध्ये नीट परीक्षेच्या १९ तास आधी एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचे तीव्र पडसाद संपूर्ण तामिळनाडूमध्ये उमटले. केंद्राची नीट परीक्षा नकोच, अशी मागणी विद्यार्थी, पालक आणि सत्ताधारी व विरोधी पक्षांनी केली. याचाच परिणाम म्हणून सोमवारी नीट परीक्षेतून राज्यातील विद्यार्थ्यांना सूट देणारे विधेयक तामिळनाडू विधानसभेत मांडले. ते संमतही झाले. विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेशासाठी केंद्रीय ‘नीट’ची गरज नाही. असाच या कायद्याचा अर्थ आहे.

या नवीन कायद्याच्या माध्यमातून वैद्यकीय पदवीच्या जागांसाठी विद्यार्थ्यांना बारावीच्या गुणांच्या आधारे प्रवेश दिले जातील. तसेच सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना ७.५ टक्के प्राधान्य असेल.

...