शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
3
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
4
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
5
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
6
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
7
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
8
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
9
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
10
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
11
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
12
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
13
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
14
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
15
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
16
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

‘नीट’ न देता मेडिकलला प्रवेश; विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:38 IST

अविनाश मुडेगावकर लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : ‘नीट’ची परीक्षा न देताही बारावीचे गुण ग्राह्य धरून वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश ...

अविनाश मुडेगावकर

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबाजोगाई : ‘नीट’ची परीक्षा न देताही बारावीचे गुण ग्राह्य धरून वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश देण्याचा धक्कादायक निर्णय तामिळनाडू सरकारने घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रात नीट परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसमोरही संभ्रम निर्माण झाला आहे. जर तामिळनाडू सरकार असा निर्णय घेत असेल तर महाराष्ट्रातील सरकारनेही असा निर्णय घेऊन राज्यातील विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी विद्यार्थी, पालकांमधून पुढे येत आहे.

वैद्यकीय प्रवेशासाठी होणाऱ्या ‘नीट’च्या राष्ट्रीय पातळीवरील प्रवेश परीक्षा या विरोधात तामिळनाडू सरकारने विधेयक सादर करून ही परीक्षा न देताही वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया राज्याद्वारेच करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे इतरही राज्ये आता याच कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करतील. केंद्रीय पातळीवर होणाऱ्या या परीक्षेबाबत यापूर्वीही अनेकदा वादविवाद निर्माण झाले. नीट परीक्षा यापूर्वी दोन वेळा बंद झाली होती. राज्याच्या सीईटीच्या माध्यमातून वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया झाली होती. मात्र पुन्हा नीट सुरळीत सुरू झाली. नीट परीक्षेपूर्वी केंद्र शासनाची एएमपीआयटी(AMPIT) या परीक्षेमार्फत ३० टक्के तर सीईटीमार्फत ७० टक्के वैद्यकीय शिक्षणाच्या जागा भरण्यात येत असत. याचा फायदा त्या त्या राज्यातील विद्यार्थ्यांना होत होता. मात्र सदैव संभ्रम निर्माण करणाऱ्या शिक्षण पद्धतीत वेगवेगळे बदल सातत्याने सुरूच असतात. याचा मोठा फटका विद्यार्थ्यांना सहन करावा लागतो. आता पुन्हा प्रत्येक राज्य काय निर्णय घेईल? याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

...

‘नीट’च्या माध्यमातून रिपीटर्सचीच चलती

नीट परीक्षा देणारे विद्यार्थी पहिल्या प्रयत्नात फार कमी वेळा गुणवत्ता प्राप्त करतात. मात्र ही परीक्षा रिपीट करणाऱ्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेश मिळतो. यासाठी रिपीटर्सची मोठी संख्या आहे. यासाठी शासनाने पहिल्यांदा फ्रेश परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ६० टक्के तर रिपीटर्ससाठी ४० टक्के प्रवेश क्षमता ठेवावी, अशी मागणी विद्यार्थी व पालकांमधून पुढे आली आहे.

....

काय आहे तामिळनाडू सरकारचा धक्कादायक निर्णय?

तामिळनाडूमध्ये नीट परीक्षेच्या १९ तास आधी एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचे तीव्र पडसाद संपूर्ण तामिळनाडूमध्ये उमटले. केंद्राची नीट परीक्षा नकोच, अशी मागणी विद्यार्थी, पालक आणि सत्ताधारी व विरोधी पक्षांनी केली. याचाच परिणाम म्हणून सोमवारी नीट परीक्षेतून राज्यातील विद्यार्थ्यांना सूट देणारे विधेयक तामिळनाडू विधानसभेत मांडले. ते संमतही झाले. विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेशासाठी केंद्रीय ‘नीट’ची गरज नाही. असाच या कायद्याचा अर्थ आहे.

या नवीन कायद्याच्या माध्यमातून वैद्यकीय पदवीच्या जागांसाठी विद्यार्थ्यांना बारावीच्या गुणांच्या आधारे प्रवेश दिले जातील. तसेच सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना ७.५ टक्के प्राधान्य असेल.

...